शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत पावणे दहा लाखाचा पानमसाला जप्त, भाईंदर पोलिसांनी केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 18:32 IST

काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत बेकायदा पानमसालाचे मोठे गोदाम सुरु असल्याने ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांच्या आदेशाने भार्इंदर पोलिसांनी सदर गोदामावर धाड टाकुन पावणे दहा लाखांचा बेकायदा पानमसाल्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी ती कार पोलीसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

मीरारोड :  काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत बेकायदा पानमसालाचे मोठे गोदाम सुरु असल्याने ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांच्या आदेशाने भार्इंदर पोलिसांनी सदर गोदामावर धाड टाकुन पावणे दहा लाखांचा बेकायदा पानमसाल्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी ती कार पोलीसांनी ताब्यात घेतल्या आहेत.काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील माशाचा पाडा दर्ग्याजवळ मोठा प्रमाणात अनधिकृत बांधकामे पालिका अधिकारी व स्थानिक नगरसेवकांच्या आशिर्वादाने झाली आहेत. आदिवासींच्या तसेच ना विकास क्षेत्रातील या जमीनींवर झालेल्या बेकायदा बांधकामामधून बेकायदा धंदे वाढीस लागल्याचे समोर येत आहे.सदर ठिकाणी मीना घाटाळ यांच्या एका बेकायदा बांधकामात मोठ्या प्रमाणात गुटखा सृदश बंदी असलेल्या पानमसाल्याचा साठा केला जात असल्याने व सदरचा माल चोरुन खाजगी कार मधुन मुंबई, ठाणे आदी भागात पुरवठा केला असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांच्या निदर्शनास आली होती.त्या अनुषंगाने पाटील यांनी भार्इंदर पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक एस.एच.बिस्वास व त्यांच्या पथकास कारवाईचे आदेश दिले होते. मंगळवारी रात्री बिस्वास व पथकाने धाड टाकली असता तेथे तब्बल ६० गोण्यां मध्ये भरलेला मोठा साठा आढळुन आला. त्याची किंमत ९ लाख ६४ हजार इतकी आहे. सदर साठा जप्त करुन पोलीसांनी वाहतुकीसाठी वापरल्या जाणारया ३ कार जप्त केल्या आहेत. तर येथुन संतोष शंभुनाथ थटेरा (३८) , संदिप बनारसी थटेरा (२९) व निलेश राजेंद्रप्रसाद गुप्ता (३१) सर्व रा. भास्कर भवन, भाजी मार्केट, बाळाराम पाटील मार्ग, भार्इंदर या तीघा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांची नोंद करण्यात आली.अन्न निरीक्षक यांनी जप्त बेकायदा पानमसाल्याचा साठा ताब्यात घेऊन त्याची नोंद केली असुन नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. अहवाल आल्यावर सदर साठा नष्ट करण्यात येईल. त्या नंतर सबंधित तीघां विरोधात खटला दाखल केला जाईल असे अन्न व औषध प्रशासनाच्या सुत्रां कडुन सांगण्यात आले.सदरचा बेकायदा पानमसाला गुटखा सृदश असुन सदर गोदामात तो गुजरात व अन्य ठिकाणां वरुन चोरुन टॅम्पो वा ट्रकने आणला जायचा. व नंतर येथुन सर्वत्र त्याचा पुरवठा कार ने केला जायचा. 

टॅग्स :Crimeगुन्हा