शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

काशीगावचा ओसाड बाजार बनला मद्यपींचा अड्डा , पालिकेचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 2:23 AM

मीरा-भार्इंदर महापालिकेने फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी काही वर्षांपूर्वी काशीगाव येथे दुमजली इमारत बांधली. तिच्या तळ मजल्यावर बाजार सुरू होणार असतानाच फेरीवाल्यांनी तेथे जाण्यास नकार दिला. त्यामुळे अनेक वर्षांपासून ओसाड पडलेला हा बाजार सध्या मद्यपींचा अड्डा झाला आहे.

भार्इंदर  - मीरा-भार्इंदर महापालिकेने फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी काही वर्षांपूर्वी काशीगाव येथे दुमजली इमारत बांधली. तिच्या तळ मजल्यावर बाजार सुरू होणार असतानाच फेरीवाल्यांनी तेथे जाण्यास नकार दिला. त्यामुळे अनेक वर्षांपासून ओसाड पडलेला हा बाजार सध्या मद्यपींचा अड्डा झाला आहे.शहरात चार वर्षांपूर्वी पाच हजार फेरीवाले होते. सध्या त्यांची संख्या हजारोंच्या पटीने वाढली आहे. दरम्यान, या फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पालिकेने भार्इंदर पश्चिमेकडील मॅक्सस मॉलमागे कस्तुरी गार्डन रोडवर तसेच काशीगाव येथील सिल्व्हर सरिता गृहसंकुलासमोर एक व दोन मजली इमारती बांधल्या. या इमारतींच्या तळ मजल्यावर फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याचा हेतू होता. परंतु, त्यात व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांनी नकार दिला.भार्इंदर येथील इमारतीत स्थानिक संस्था कराचे मुख्यालय थाटण्यात आले व काशीगाव येथील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बेघरांसाठी रात्रनिवारा सुरू केला. रात्रनिवाऱ्यात मूळ लाभार्थी वंचित राहू लागले. याखेरीज, एका लघुचित्रपट दिग्दर्शकाने तेथेच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने रात्रनिवारा बंद केला. दोन वर्षे ही इमारत ओसाड पडली होती. स्थानिक संस्था कर बंद झाल्यानंतरही भार्इंदर पश्चिमेकडील इमारतीत अद्याप फेरीवाल्यांना सामावून घेतलेले नाही. तूर्तास इमारतीबाहेर दररविवारी शेतकºयांना बाजार लावण्यासाठी मुभा दिली आहे.काशीगाव इमारतीत रात्रनिवारा सुरू नसला, तरी त्याच्या तळ मजल्यावर पालिकेने खाजगी सुरक्षारक्षकांचा निवारा मात्र सुरू केल्याचे दिसून येते. हे सुरक्षारक्षक पालिकेला कंत्राटी सेवा देत असून त्यांच्या निवाºयाची जबाबदारी पालिकेची नाही. ती कंत्राटदाराची असतानाही पालिकेने त्या इमारतीच्या तळ मजल्यावर खाजगी सुरक्षारक्षकांना राहण्याची सोय केली आहे.रात्री मद्याची पार्टी झोडली जाते. पार्टी संपल्यानंतर मद्याने भरलेले ग्लास, खाद्यपदार्थ व बाटल्यांचे वेष्टन तेथेच टाकण्यात येतात.पालिका इमारतीत मद्यपींचा धिंगाणा चालत असल्याच्या तक्रारी अनेकदा प्रशासनाकडे करूनही त्याला अद्याप आळा बसलेला नाही. यामुळे आसपासच्या रहिवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेने हा प्रकार त्वरित बंद करावा.- अरुण सातपुते, रहिवासीइमारतीत रात्री मद्यपी येत असल्याची तसेच खाजगी सुरक्षारक्षक बेकायदा तेथे राहत असल्याबाबत आस्थापना विभागाकडे तीनवेळा पत्रव्यवहार केला आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणली जाणार आहे.- दीपक खांबित, कार्यकारी अभियंता

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर