शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कल्याणचा नवा पत्रीपूल ८४ मीटरचाच हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 01:04 IST

नव्याने आराखडा मागवला, एमएसआरडीसीसमोर नवा पेच, खर्च ३० टक्क्यांनी वाढणार

- अनिकेत घमंडी डोंबिवली : कल्याणचा ब्रिटिशकालीन उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो पाडण्याच्या हालचालींना वेग आला आहे; परंतु तो पाडल्यानंतरही नव्या पुलाचे काम करण्यासाठी मध्य रेल्वेचे तांत्रिक अडथळे पार करताना एमएसआरडीसीच्या नाकीनऊ आले आहेत. आधी ६० आणि नंतर ७२ मीटरचा पूल बांधण्याचा आराखडा एमएसआरडीसीने मध्य रेल्वेकडे मंजुरीसाठी पाठवला होता. मात्र ८४ मीटरच्या पुलाचा आराखडा पाठवला तरच नवा पत्री पूल मंजुरीसाठी विचाराधीन राहील, असे रेल्वे प्रशासनाने सोमवारी स्पष्ट केले. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च जवळपास ३0 टक्क्यांनी वाढणार आहे. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून प्रत्यक्ष काम सुरू होण्यास किमान महिनाभराचा अवधी लागेल, असे एमएसआरडीसीच्या सूत्रांनी सांगितले.आधीच्या नियोजनानुसार पूल बांधण्यासाठी १४ ते १५ कोटींचा खर्च अपेक्षित होता. रेल्वे प्रशासनाने ८४ मीटरच्या पुलाचा आराखडा पाठवण्याची सूचना केल्याने, त्यामध्ये सुमारे ५ कोटींची भर पडणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाची किंमत २० कोटींपर्यंत जाऊ शकते अशी माहिती एमएसआरडीसीच्या सूत्रांनी दिली. सोमवारी मध्यरेल्वेच्या सूचनेसंदर्भात माहिती मिळाली. त्यानुसार आगामी आठवडाभरात नव्या नियोजनाचा आराखडा रेल्वे प्रशासनाला पाठवण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे अभियंता अनिरुद्ध बोरडे यांनी दिली. ८४ मीटरचा पूल बांधताना एमएसआरडीसीसमोर काही अडचणी आहेत. केवळ पूल बांधणे हेच उद्दिष्ट नसते; सर्व शक्यतांचा विचार करावा लागतो.पुलाच्या जवळपास १५० ते २५० मीटर परिसरात इमारती नसणे आवश्यक असते. हा निकष तपासून काम करावे लागते. आपात्कालीन स्थितीत क्रेन किंवा अन्य यंत्रणांना पुरेसी जागा मिळावी, ही सर्वात महत्वाची बाब लक्षात घ्यावी लागत असल्याचेही बोरडे यांनी सांगितले.७२ मीटरवरून ८४ मीटरचा पूल बांधण्याचा प्रस्ताव आल्याने खर्चात वाढ होणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रेल्वे प्रशासनाच्या मागणीनुसार आठवडाभरात सुधारीत आराखडा पाठवण्यात येईल. त्यानंतर साधारण महिनाभरानंतर सर्व निकषांची तपासणी झाल्यावर रेल्वेची मंजुरी मिळेल. रेल्वेची मंजुरी प्राप्त झाल्यावरच अंतिम आराखडा बनवून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली जाईल, असेही बोरडे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :kalyanकल्याण