शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

कल्याणचा नवा पत्रीपूल ८४ मीटरचाच हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 01:04 IST

नव्याने आराखडा मागवला, एमएसआरडीसीसमोर नवा पेच, खर्च ३० टक्क्यांनी वाढणार

- अनिकेत घमंडी डोंबिवली : कल्याणचा ब्रिटिशकालीन उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो पाडण्याच्या हालचालींना वेग आला आहे; परंतु तो पाडल्यानंतरही नव्या पुलाचे काम करण्यासाठी मध्य रेल्वेचे तांत्रिक अडथळे पार करताना एमएसआरडीसीच्या नाकीनऊ आले आहेत. आधी ६० आणि नंतर ७२ मीटरचा पूल बांधण्याचा आराखडा एमएसआरडीसीने मध्य रेल्वेकडे मंजुरीसाठी पाठवला होता. मात्र ८४ मीटरच्या पुलाचा आराखडा पाठवला तरच नवा पत्री पूल मंजुरीसाठी विचाराधीन राहील, असे रेल्वे प्रशासनाने सोमवारी स्पष्ट केले. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च जवळपास ३0 टक्क्यांनी वाढणार आहे. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून प्रत्यक्ष काम सुरू होण्यास किमान महिनाभराचा अवधी लागेल, असे एमएसआरडीसीच्या सूत्रांनी सांगितले.आधीच्या नियोजनानुसार पूल बांधण्यासाठी १४ ते १५ कोटींचा खर्च अपेक्षित होता. रेल्वे प्रशासनाने ८४ मीटरच्या पुलाचा आराखडा पाठवण्याची सूचना केल्याने, त्यामध्ये सुमारे ५ कोटींची भर पडणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाची किंमत २० कोटींपर्यंत जाऊ शकते अशी माहिती एमएसआरडीसीच्या सूत्रांनी दिली. सोमवारी मध्यरेल्वेच्या सूचनेसंदर्भात माहिती मिळाली. त्यानुसार आगामी आठवडाभरात नव्या नियोजनाचा आराखडा रेल्वे प्रशासनाला पाठवण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे अभियंता अनिरुद्ध बोरडे यांनी दिली. ८४ मीटरचा पूल बांधताना एमएसआरडीसीसमोर काही अडचणी आहेत. केवळ पूल बांधणे हेच उद्दिष्ट नसते; सर्व शक्यतांचा विचार करावा लागतो.पुलाच्या जवळपास १५० ते २५० मीटर परिसरात इमारती नसणे आवश्यक असते. हा निकष तपासून काम करावे लागते. आपात्कालीन स्थितीत क्रेन किंवा अन्य यंत्रणांना पुरेसी जागा मिळावी, ही सर्वात महत्वाची बाब लक्षात घ्यावी लागत असल्याचेही बोरडे यांनी सांगितले.७२ मीटरवरून ८४ मीटरचा पूल बांधण्याचा प्रस्ताव आल्याने खर्चात वाढ होणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रेल्वे प्रशासनाच्या मागणीनुसार आठवडाभरात सुधारीत आराखडा पाठवण्यात येईल. त्यानंतर साधारण महिनाभरानंतर सर्व निकषांची तपासणी झाल्यावर रेल्वेची मंजुरी मिळेल. रेल्वेची मंजुरी प्राप्त झाल्यावरच अंतिम आराखडा बनवून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली जाईल, असेही बोरडे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :kalyanकल्याण