शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

कल्याण विहीर दुर्घटना: ‘तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने गेला भाऊ, पुतण्या’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 00:15 IST

विहिरीतील प्रदूषणाविषयी, येथील सांडपाण्याच्या अर्धवट पडलेल्या कामाविषयी वारंवार पाठपुरावा केला. कुणीही आमचे ऐकले नाही. आता पाचजणांचे जीव गेल्यावर तरी जागे व्हा, असे गिरीगोस्वामी संतापाच्या सुरात बोलले.

- मुरलीधर भवार कल्याण : चक्कीनाका परिसरातील भीमाशंकर मंदिराची पूजा गिरीगोस्वामी बंधू गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. माझा भाऊ शंकराची पूजा करायचा. त्याने कोणाचे काय वाकडे केले होते की, आमच्या कुटुंबावर हा प्रसंग आला. माझा भाऊ गुणवंत व पुतण्या राहुल गेला. दुश्मनावरही असा प्रसंग येऊ नये... हसमुख गिरीगोस्वामी एकीकडे धाय मोकलून रडत होते आणि दुसरीकडे पोटतिडकीने बोलत होते. या विहिरीतील प्रदूषणाविषयी, येथील सांडपाण्याच्या अर्धवट पडलेल्या कामाविषयी वारंवार पाठपुरावा केला. कुणीही आमचे ऐकले नाही. आता पाचजणांचे जीव गेल्यावर तरी जागे व्हा, असे गिरीगोस्वामी संतापाच्या सुरात बोलले.हसमुख यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबात चौघे भाऊ. हेमंत, मनसुख, गुणवंत आणि हसमुख. चारही भावांची घरे भीमाशंकर मंदिराला लागूनच आहेत. देवाची सेवा करणे, हेच त्यांचे काम आहे. गुणवंत हे मंदिरात पूजेचे काम करायचे. मुलगा राहुल हादेखील त्यांच्या मदतीला होता. राहुलचे पुढच्या वर्षी लग्न करायचे होते. मात्र, काळाने वडिलांसह त्याच्यावर घाला घातला. दिवाळीच्या आधीच आमच्या घरातील दोन दिवे मालवले आणि अंधार पसरला... हसमुख यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. मृत्यूचा हा आघात इतका भीषण आहे की, काय करायचे तेच सुचत नाही. गुणवंत यांच्या पत्नीला जबर मानसिक धक्का बसला आहे. विहिरीतील प्रदूषणाच्या त्रासामुळे हसमुख यांना दोन वेळा हृदयविकाराचा झटका येऊन गेला, असे ते सांगतात. त्यांचे भाऊ गुणवंत यांच्याही हृदयावर प्रदूषणाच्या त्रासामुळे विपरित परिणाम झाल्याने शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यातून ते कसेबसे बचावले होते. मात्र, आज त्यांना मृत्यूने गाठलेच. राहुल यांच्यासह गुणवंत यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर त्यांच्यावर गुजरातमधील भावनगर येथील मांडवी गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टॅग्स :kalyanकल्याणAccidentअपघात