शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कल्याण विहीर दुर्घटना: विहिरीच्या सफाईकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; गोस्वामी कुटुंबीयांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 04:36 IST

भीमाशंकर मंदिराच्या शेजारील विहिरीत बुडून गुरुवारी पाच जणांचा मृत्यू झाला. याच विहिरीशेजारी एक नाला आहे. या नाल्यातील रसायनयुक्त सांडपाणी विहिरीत मिसळले जाते.

कल्याण : पूर्वेतील भीमाशंकर मंदिराच्या शेजारील विहिरीत बुडून गुरुवारी पाच जणांचा मृत्यू झाला. याच विहिरीशेजारी एक नाला आहे. या नाल्यातील रसायनयुक्त सांडपाणी विहिरीत मिसळले जाते. त्याची सफाई करण्यात यावी, यासाठी गेली तीन वर्षे गोस्वामी कुटुंब महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते. मात्र, याकडे प्रशासनाने कानाडोळा केल्याचा आरोप गोस्वामी कुटुंबीयांनी केला.या विहिरीच्या सफाईसाठी सफाई कामगार कमलेश यादव दुपारी २च्या सुमारास उतरला होता. तो बराच वेळ होऊनही वर न आल्याने मंदिर परिसरातील राहुल गोस्वामी विहिरीत उतरला. सफाई कामगार, त्यापाठोपाठ राहुलही बराच वेळ बाहेर न आल्याने राहुलचे वडील गुणवंत उर्फ गुणाभाई विहिरीत उतरले. मात्र, तेही बेपत्ता झाले. विजेचा धक्का लागल्याने हे तिघे बुडाल्याचा अंदाज होता. त्यामुळे खबरदारी म्हणून विद्युतपुरवठा खंडित केला.माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमनचे जवान घटनास्थळी पोहोचले. दलातील अनंत शेलार हे विहिरीत उतरत असतानाच विषारी वायूमुळे चक्कर येऊन विहिरीत कोसळले. त्यांना पडल्याचे पाहून अग्निशमन दलाचे प्रमोद वाघचौरे हे विहिरीत उतरले. मात्र, प्रमोदला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात विषारी वायूमुळे तेही विहिरीत पडले. बराच वेळ होऊनही पाचपैकी एकही जण वर न आल्याने खळबळ उडाली.अधिकाऱ्याची प्रकृती खालावलीबचावकार्यामध्ये आघाडीवर असणारे फायर अधिकारी नामदेव चौधरी यांना प्रदूषित वायूचा त्रास झाल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना उपचारासाठी खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी स्थानिक रहिवासी, पोलीस, अधिकारी आणि पत्रकार यांनादेखील दूषित वायूमुळे त्रास झाला.खबरदारी म्हणून घटनास्थळी सुरक्षापट्टा लावण्यात आला आहे. अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य सुरू केले. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. विहिरीतले पाणी ढवळल्याने त्यातून विषारी वायू मोठ्या प्रमाणात बाहेर आला आणि त्यामुळे पाच जण गुदमरले. अग्निशमन दलाला विहिरीतल्या विषारी वायूच्या तीव्रतेचा अंदाज आला नाही.

टॅग्स :kalyanकल्याणAccidentअपघात