शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
5
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
6
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
7
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
8
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
9
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
10
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
11
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
12
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
13
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
14
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
15
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
16
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
17
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
18
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
19
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
20
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!

कल्याण-मुरबाड रेल्वेचे घोडे सर्वेक्षणावरच अडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 02:08 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग तयार करण्याची घोषणा केली. त्यासाठी राज्य सरकार ५० टक्के खर्चाचा भार उचलेल, असेही जाहीर केले.

- मुरलीधर भवारकल्याण  - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग तयार करण्याची घोषणा केली. त्यासाठी राज्य सरकार ५० टक्के खर्चाचा भार उचलेल, असेही जाहीर केले. या घोषणेला दोन वर्षे उलटूनही आतापर्यंत केवळ प्राथमिक सर्वेक्षणच झाले आहे. त्यापुढे केंद्र सरकारकडून काहीच हालचाल दिसत नसल्याने या मार्गाचे घोडे पुढे सरकणार तरी कधी, असा प्रश्न विचारला जात आहे.कल्याण-नगर हा मार्ग ब्रिटिशांच्या काळापासून रखडलेला आहे. त्याच्या मागणीसाठी १९९६ पासून रेटा सुरू आहे. हा मार्ग रखडल्याने कल्याणपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेले मुरबाड हे रेल्वेशी जोडले गेले नाही. मुरबाडमध्ये नागरीकरण वाढत असून शहराला नगरपंचायतीचा दर्जा आहे. त्यामुळे रेल्वे आवश्यक असून त्याचा फायदा शेतकरी, विद्यार्थी आणि कामगारांना होईल.कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाची मागणी उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाने २०११ साली केली होती. ४ डिसेंबर २०१६ रोजी मुख्यमंत्र्यांनी या मार्गाची घोषणा केली होती. भाजपा आमदार किसन कथोरे यांनी देखील ही मागणी लावून धरली होती. कल्याण-नगरमार्गासह कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचे प्राथमिक सर्वेक्षण झाले आहे. रेल्वेमार्गाची आखणी, स्थानके, त्यासाठीचा खर्च याविषयी अद्याप काहीच स्पष्टता नाही. प्राथमिक सर्वेक्षण अहवाल तयार केला असला, तरी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचा उपयुक्तता अहवाल प्रतिकूल असल्याची माहिती समोर येत आहे.प्राथमिक अहवालाला रेल्वे प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर तो रेल्वे बोर्डाच्या मान्यतेसाठी पाठवला जाईल. त्यांच्या मान्यतेनंतर हे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडे सोपवल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकते. या मार्गावर लहानमोठे पूल, एक बोगदा आणि तीन स्थानके प्रस्तावित आहेत. कांबा-वरप, गोवेलीनाका आणि त्यानंतर मुरबाड रेल्वेस्थानक असेल, असा ढोबळ अंदाज असल्याची माहिती उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाचे संस्थापकीय अध्यक्ष मनोहर शेलार यांनी दिली आहे. कल्याण-नगर हा रेल्वेमार्ग खाजगीकरणातून पूर्ण होऊ शकतो, अशी भूमिका दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांनी २००६ मध्ये मांडली होती.कल्याण-नाशिक लोकलसेवा लवकरच सुरू होणार आहे. या मार्गावर असलेल्या कसारा घाटात लोकलचे डबे कसे चढणार, असा तांत्रिक प्रश्न उपस्थित करून ही सेवा सुरू होणे कठीण असल्याचे बोलले जात होते. त्यासाठी विशिष्ट गाड्या तयार करून या अडचणीवर मात करण्यात आली असून त्या धावण्यासाठी सज्ज आहेत. कल्याण-नाशिक लोकलचा खडतर मार्ग प्रत्यक्षात येत असताना कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गही पूर्ण करावा, अशी मागणी महासंघाने केली आहे.३५० कोटींची लागणार तरतूद : रेल्वे प्रवासी संघटनेला माहितीच्या अधिकारामध्ये कल्याण-नगर रेल्वेमार्गासाठी पहिल्या टप्प्यात ७२१ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. हा खर्च गृहीत धरल्यास कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी ३५० कोटींची प्राथमिक तरतूद करावी लागणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेkalyanकल्याणmurbadमुरबाड