शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

कल्याण - मुंबई प्रवास ११ तासांचा, गार्ड गोरख पाटील यांचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 23:46 IST

रविवारी रात्री झालेल्या पावसाने सोमवारी दिवसभर चाकरमान्यांना एकतर लोकलमध्ये कैद केले किंवा रेल्वे मार्गातून तीन ते चार तास पायपीट करण्यास भाग पाडले.

- अनिकेत घमंडीडोंबिवली : सोमवारी रात्री कल्याण रेल्वे स्थानकातून ११.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे निघालेली कसारा जलद लोकल मंगळवारी सकाळी १०.४० वाजता आपल्या नियोजित स्थळी तब्बल ११ तासानंतर पोहोचली. त्या लोकलचे गार्ड गोरख पाटील, मोटारमन आणि मोजकेच ३०० प्रवासी यांनी संपूर्ण रात्र कांजूरमार्ग ते माटुंगा दरम्यान रुळावर साचलेल्या पाच फूट पाण्यातून कूर्मगतीने प्रवास करीत काढली.रविवारी रात्री झालेल्या पावसाने सोमवारी दिवसभर चाकरमान्यांना एकतर लोकलमध्ये कैद केले किंवा रेल्वे मार्गातून तीन ते चार तास पायपीट करण्यास भाग पाडले. सोमवारी रात्री पुन्हा सुरु झालेल्या मुसळधार पावसाने लोकल सेवेची दाणादाण उडवली. जलद लोकलने कल्याण ते सीएसएमटी प्रवासासाठी एरव्ही एक ते सव्वा तास लागतो. पण कांजुरमार्ग, सायन मार्गावर पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या कल्याण ते सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या जलद लोकलला हे अंतर कापण्याकरिता तब्बल ११ तास लागले. या लोकलचे गार्ड गोरख पाटील यांनी सांगितले की, भांडूप ते कांजूर, घाटकोपर प्रवासासाठी दोन तास आणि पुढे घाटकोपर ते सायन प्रवासाठी पाच तास लागले. सोमवारची रात्र अजिबात विसरू शकत नाही. ११ तासांचा न संपणारा, कंटाळवाणा, जीवघेणा प्रवास कधीच विसरता येणार नाही. पाटील सोमवारी संध्याकाळी सीएसएमटी येथून ६.२५ वाजताची कसारा लोकल घेऊन कसारा स्थानकात रात्री ८.३० वाजता पोहोचले. त्यानंतर रात्री ९ वाजून ३१ मिनिटांनी ते लोकल घेऊन सीएसएमटीकडे निघाले. लोकल पावणे बाराच्या सुमारास कल्याणपर्यंत आली, परंतु त्यानंतर लोकल सर्वत्र रखडली. कल्याण ते ठाणे प्रवासासाठी रात्रीचे १२.२५ वाजले. मुलुंडनंतर लोकलच्या रांगा लागल्या होत्या. कासवगतीने लोकल पुढे सरकत होती, अर्धाअर्धा तास एका ठिकाणी उभी राहत होती. सतत हॉर्न दे, बेल दे यामुळे हातपाय दुखायला लागले होते. भांडुप ते घाटकोपर हे अंतर कापण्याकरिता मध्यरात्रीचे २.३५ वाजले. घाटकोपर स्थानकातून पहाटे ४.५० वाजता निघालेली लोकल सायन स्थानकात पोहोचायला सकाळचे १० वाजले होते. कांजुरमार्ग ते सायन हा अवघा १० ते १५ मिनिटांचा प्रवास पण पाणी रुळांवर साचल्याने ७ तास २५ मिनिटांचा वेळ लागला.आजुबाजूला प्रचंड पाणी, रात्रीचा मिट्ट अंधार अशा वातावरणात गार्ड केबिनमध्ये बसून रात्र काढावी लागली. त्या पाण्याच्या प्रवाहातून रात्रभर लोकल कशी चालवली असेल याची कल्पनाच करवत नाही, असे ते म्हणाले. सकाळ झाली, पुन्हा स्थानकावर नव्या दमाने नोकरीला जाण्याकरिता आलेल्यांची गर्दी झाली. आम्ही डोळ््याला डोळा न लावता रात्र पावसाच्या पूरात काढल्याची त्यांना कल्पनाही नसेल. अखेर सकाळी १० वाजता सायन स्थानक सोडले आणि लोकल १० वाजून ४० मिनिटांनी सीएसएमटी स्थानकात पोहोचल्यानंतर पाटील यांची ड्युटी संपली.घडले माणुसकीचे दर्शनया कठीण प्रसंगातही घाटकोपर, कांजुर, सायन भागामध्ये जेथे लोकल थांबल्या त्या सर्व ठिकाणी आजूबाजूच्या मोजक्याच नागरिकांनी आस्थेने विचारपूस केली. काहींनी चहा, बिस्किटांची सोय केली. केवळ आम्हीच नाही तर अनेक स्थानकात अडकून पडलेल्यांची रात्र पावसा-पाण्यात गेली. पाटील यांनीही त्यांच्याजवळील खाद्यपदार्थ सहप्रवाशांना दिले.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊसMumbai Localमुंबई लोकल