शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण लोकसभा मतदारसंघ: मनसे कार्यकर्त्यांना आदेशाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 00:41 IST

निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक

- मुरलीधर भवारकल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते उत्सुक आहेत; मात्र पक्षाकडून आदेश मिळाला नसल्याने कार्यकर्त्यांची कोंडी होत आहे. मनसे २० मार्च रोजी लोकसभा निवडणुकीबाबतची भूमिका स्पष्ट करणार आहे. तोपर्यंत कार्यकर्त्यांना धीरानेच घ्यावे लागणार आहे.राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी विरोधी पक्षात आहे; मात्र विरोधकाची भूमिका खऱ्या अर्थाने मनसेनेच बजावली. भाजपासोबत सत्तेत असतानाही शिवसेना नेहमीच विरोध करत राहिली; मात्र निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपाची युती झाली. त्यामुळे खऱ्या अर्थाने मनसे हाच भाजपाचा मुख्य विरोधी पक्ष राहिला. मनसेने निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. त्यात मोदी सरकारला व राज्यातील भाजपा सरकारला नामोहरम करा, असे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले. निवडणुकीसाठी पक्षाने चांगली तयारी केली असल्याचे सांगण्यात येत होते.कल्याण-डोंबिवलीवर ठाकरे यांचे जास्त प्रेम आहे. २००९ मध्ये मनसेने येथे प्रथमच विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी कल्याण पश्चिम व ग्रामीण मतदारसंघातून पक्षाचे दोन आमदार निवडून आले होते. राज्यातून या पक्षाचे १३ आमदार निवडून आले होते. कल्याण लोकसभा मतदारसंघातून २००९ मध्ये वैशाली दरेकर आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातून डी.के. म्हात्रे यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी दोघांचा विजय झाला नसला, तरी त्यांना प्रत्येकी एक लाख मते पडली होती. २०१४ मध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना राजू पाटील यांनी जवळपास एक लाख ४० हजार मते मिळवली. त्यांचा पराभव झाला; मात्र पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी बरीच मेहनत घेतली होती. यावेळीही शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासमोर ते सक्षम उमेदवार ठरू शकतात, असे कार्यकर्त्यांचे मत आहे. मनसेचे लोकसभा निवडणूक लढवणे निश्चित नव्हते. मात्र, पक्षप्रमुखांचा आदेश असेल तर नक्की लढवू. त्यासाठी आमची तयारी असल्याचे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी सांगितले.‘एकला चलो रे’ची भूमिकाच योग्यडोंबिवली : मनसे हा शिवसेनेतून फुटून उभा राहिलेला स्वतंत्र पक्ष आहे. या पक्षात बहुतांश शिवसैनिक, हिंदुत्वाला मानणारे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. अशा स्थितीत लोकसभेसाठी आघाडीला साथ देणे योग्य नसून ही एक प्रकारे राजकीय आत्महत्याच म्हणावी लागेल, असा सूर कल्याण-डोंबिवलीतील मनसैनिकांमधून व्यक्त होत आहेत. मनसेचा पूर्वीपासूनचा ‘एकला चलो रे’चा नारा योग्य असून या निवडणुकीतही पक्षाने तेच धोरण कायम ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेचे १० नगरसेवक आहेत, त्याआधी २७ होते. आता पक्षश्रेष्ठींनी आघाडीसोबत जाण्याचा विचार केला, तर आगामी विधानसभा आणि त्यापाठोपाठ येणाºया महापालिका निवडणुकीत मतदारांसमोर जाताना स्थानिक उमेदवारांसमोर मोठा पेच होऊ शकतो. मुळातच कल्याण-डोंबिवली हा जनसंघाचा बालेकिल्ला आहे. सद्य:स्थितीला येथे युतीचे चार आमदार असून विद्यमान खासदारही युतीचेच आहेत. अशा स्थितीत मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आदी भागांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असून तिथे मनसेला अच्छे दिन आलेले आहेत. लोकसभेत सहभाग न घेण्याचा पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णयही स्वागतार्ह आहे. पण, आघाडीला साथ देण्याचा निर्णय घेऊ नये, असे मत कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.मनसेच्या नगरसेवकांचा त्यांच्या प्रभागांमध्ये पक्षापेक्षाही स्वत:चा ठसा जास्त असल्याने ते निवडून आल्याची पक्षांतर्गत चर्चा आहे. त्यामुळे आघाडीसोबत जाऊन पुढील निवडणुकीत स्वत:चे स्थान डळमळीत करणे पक्षाच्या नगरसेवकांनाही मान्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याऐवजी तटस्थ भूमिका घेऊन विधानसभेमध्ये योग्य तो निर्णय घेणे महत्त्वाचे असल्याची त्यांची भावना आहे.स्थानिक पातळीवर पक्षामध्ये गटातटांचे राजकारण सुरू आहे. त्यामुळेही पक्षामध्ये धुसफूस सुरू असताना पक्षश्रेष्ठींच्या निर्णयामुळे गोंधळ वाढू शकतो. त्याचा फटकादेखील पक्षालाच बसणार असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMNSमनसे