शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

कल्याण लोकसभा मतदारसंघ: मनसे कार्यकर्त्यांना आदेशाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 00:41 IST

निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक

- मुरलीधर भवारकल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते उत्सुक आहेत; मात्र पक्षाकडून आदेश मिळाला नसल्याने कार्यकर्त्यांची कोंडी होत आहे. मनसे २० मार्च रोजी लोकसभा निवडणुकीबाबतची भूमिका स्पष्ट करणार आहे. तोपर्यंत कार्यकर्त्यांना धीरानेच घ्यावे लागणार आहे.राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी विरोधी पक्षात आहे; मात्र विरोधकाची भूमिका खऱ्या अर्थाने मनसेनेच बजावली. भाजपासोबत सत्तेत असतानाही शिवसेना नेहमीच विरोध करत राहिली; मात्र निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपाची युती झाली. त्यामुळे खऱ्या अर्थाने मनसे हाच भाजपाचा मुख्य विरोधी पक्ष राहिला. मनसेने निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. त्यात मोदी सरकारला व राज्यातील भाजपा सरकारला नामोहरम करा, असे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले. निवडणुकीसाठी पक्षाने चांगली तयारी केली असल्याचे सांगण्यात येत होते.कल्याण-डोंबिवलीवर ठाकरे यांचे जास्त प्रेम आहे. २००९ मध्ये मनसेने येथे प्रथमच विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी कल्याण पश्चिम व ग्रामीण मतदारसंघातून पक्षाचे दोन आमदार निवडून आले होते. राज्यातून या पक्षाचे १३ आमदार निवडून आले होते. कल्याण लोकसभा मतदारसंघातून २००९ मध्ये वैशाली दरेकर आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातून डी.के. म्हात्रे यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी दोघांचा विजय झाला नसला, तरी त्यांना प्रत्येकी एक लाख मते पडली होती. २०१४ मध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना राजू पाटील यांनी जवळपास एक लाख ४० हजार मते मिळवली. त्यांचा पराभव झाला; मात्र पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी बरीच मेहनत घेतली होती. यावेळीही शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासमोर ते सक्षम उमेदवार ठरू शकतात, असे कार्यकर्त्यांचे मत आहे. मनसेचे लोकसभा निवडणूक लढवणे निश्चित नव्हते. मात्र, पक्षप्रमुखांचा आदेश असेल तर नक्की लढवू. त्यासाठी आमची तयारी असल्याचे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी सांगितले.‘एकला चलो रे’ची भूमिकाच योग्यडोंबिवली : मनसे हा शिवसेनेतून फुटून उभा राहिलेला स्वतंत्र पक्ष आहे. या पक्षात बहुतांश शिवसैनिक, हिंदुत्वाला मानणारे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. अशा स्थितीत लोकसभेसाठी आघाडीला साथ देणे योग्य नसून ही एक प्रकारे राजकीय आत्महत्याच म्हणावी लागेल, असा सूर कल्याण-डोंबिवलीतील मनसैनिकांमधून व्यक्त होत आहेत. मनसेचा पूर्वीपासूनचा ‘एकला चलो रे’चा नारा योग्य असून या निवडणुकीतही पक्षाने तेच धोरण कायम ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेचे १० नगरसेवक आहेत, त्याआधी २७ होते. आता पक्षश्रेष्ठींनी आघाडीसोबत जाण्याचा विचार केला, तर आगामी विधानसभा आणि त्यापाठोपाठ येणाºया महापालिका निवडणुकीत मतदारांसमोर जाताना स्थानिक उमेदवारांसमोर मोठा पेच होऊ शकतो. मुळातच कल्याण-डोंबिवली हा जनसंघाचा बालेकिल्ला आहे. सद्य:स्थितीला येथे युतीचे चार आमदार असून विद्यमान खासदारही युतीचेच आहेत. अशा स्थितीत मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आदी भागांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असून तिथे मनसेला अच्छे दिन आलेले आहेत. लोकसभेत सहभाग न घेण्याचा पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णयही स्वागतार्ह आहे. पण, आघाडीला साथ देण्याचा निर्णय घेऊ नये, असे मत कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.मनसेच्या नगरसेवकांचा त्यांच्या प्रभागांमध्ये पक्षापेक्षाही स्वत:चा ठसा जास्त असल्याने ते निवडून आल्याची पक्षांतर्गत चर्चा आहे. त्यामुळे आघाडीसोबत जाऊन पुढील निवडणुकीत स्वत:चे स्थान डळमळीत करणे पक्षाच्या नगरसेवकांनाही मान्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याऐवजी तटस्थ भूमिका घेऊन विधानसभेमध्ये योग्य तो निर्णय घेणे महत्त्वाचे असल्याची त्यांची भावना आहे.स्थानिक पातळीवर पक्षामध्ये गटातटांचे राजकारण सुरू आहे. त्यामुळेही पक्षामध्ये धुसफूस सुरू असताना पक्षश्रेष्ठींच्या निर्णयामुळे गोंधळ वाढू शकतो. त्याचा फटकादेखील पक्षालाच बसणार असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMNSमनसे