शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवली महापौर निवडणूक : शिवसेनेत जातीवरून भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 06:32 IST

ज्या आगरी कार्डाभोवती कल्याण-डोंबिवलीचे राजकारण फिरते, त्या समाजाला महापौर, उपमहापौर निवडणुकीत स्थान न मिळाल्याची नाराजी बुधवारी शिवसेनेतून उफाळून आली.

कल्याण - ज्या आगरी कार्डाभोवती कल्याण-डोंबिवलीचे राजकारण फिरते, त्या समाजाला महापौर, उपमहापौर निवडणुकीत स्थान न मिळाल्याची नाराजी बुधवारी शिवसेनेतून उफाळून आली. त्याचे बाचाबाचीत रूपांतर झाल्याने शिवसेनेत जातीपातील, गटबाजीला थारा नाही, अशी समज अखेर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीररित्या द्यावी लागली.महापौर व उमहापौरपदाची बिनविरोध निवड घोषणा होताच शिवसेनेच्या काही नगरसेविकांनी आगरी समजाला पक्षाने न्याय दिला नाही, अशी कडवट टीका करत आपल्या नाराजीला मोकळी वाट करून दिली. त्यावरून नगरसेविका शालिनी वायले आणि वैजयंती घोलप यांच्यात शाब्दिक चकमक झडली. शिवसेनेत जातीभेदाच्या राजकारणाला थारा नाही. त्यामुळे शब्द मागे घ्या, असा आग्रह करत घोलप प्रचंड संतापल्या. एकंदर वातावरण पाहून ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी ‘जे काही झाले आहे, ते योग्यच झाले आहे. त्यामुळे शांततेने घ्या,’ असे आवाहन केले. तेव्हा कुठे घोलप यांचा पारा उतरला.या वादाविषयी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पत्रकारांनी विचारले असता असा कोणता वाद झाल्याचे मला माहीत नाही, असे त्यांनी सांगितले.नंतर तेथे आलेले पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची या घटनेवर प्रतिक्रिया विचारल्यावर त्यांनी शिवसेनेत जातीपातीला व गटबाजीला थारा नाही, असे सांगत हा मुद्दा उपस्थित करणाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. यंदाचे महापौरपद खुल्या गटातील महिलेसाठी आरक्षित होते. त्यानुसार राणे यांना महापौरपद दिले आहे, असे सांगत त्यांनी पक्षाच्या या निर्णयाचे समर्थन केले.नेत्यांतील मनोमीलनाची रंगली चर्चाठाणे जिल्ह्यातील अन्य महापालिका किंवा नगरपालिकांत शिवसेना-भाजपामध्ये जेवढे मधूर संबंध नाहीत, तेवढे कल्याण-डोंबिवलीत दिसून येत आहेत. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातील ट्युनिंग याला कारणीभूत असल्याचे मानले जाते. वस्तुत: या महापालिका निवडणुकीच्या प्रचारात दोन्ही पक्षांतील संबंध ताणले गेले होते.शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ढाण्या वाघाच्या उपमेतून भाजपावर हल्ला केल्याने मुख्यमंत्र्यांनी वाघाच्या जबड्यात हात घालणारी आमची सिंहाची जात असल्याचे प्रत्त्युत्तर दिले होते. नंतरही भाजपाकडे खास करून मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या गृहखात्याकडून पोलिसांचा वापर करून शिवसेनेला टार्गेट केले जात असल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे यांनी मंत्रीपद सोडल्याची भावनिक घोषणा करून शिवसैनिकांत चैतन्य जागवले होते. मात्र नंतर सत्तेसाठी दोन्ही पक्ष एकत्र आले.परस्परांवर कुरघोडीची एकही संधी दोन्ही पक्ष सोडत नसले, तरी ठरल्यानुसार त्यांनी आजवर परस्परांना सत्तेतील पदे दिली आहेत. उल्हासनगरमध्ये भाजपातील कुरबुरी वाढल्याने शिवसेनेने सोबत यावे यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू होते. तेथील सत्तेची गणिते जुळवण्यासाठी भाजपाने महापौरपद सोडल्याने शिवसेनेच्या गोटात सध्या आनंदाचे वातावरण आहे. त्यातही गेल्या अडीच वर्षांतील आर्थिक कोंडी दूर होऊन आता निधी येण्याचा मार्ग खुला होणार असल्याने हा आनंद द्विगुणित झाला आहे.मी हाय कोली...उपमहापौरपदी बिनविरोध निवड झालेल्या भोईर या कोळी समाजाच्या आहेत. त्यामुळे त्यांची दोन मुले, तसेच महिला, पुरुष कार्यकर्ते कोळी समाजाच्या पारंपरिक वेषभूषेत आले होते. त्यांनी सर्वांना लाल टोपी घातली. मुलांच्या शर्टावर ‘मी हाय कोली,’ असे लिहिलेले होेते.भाजपाच्या मनीषा धात्रक नाराजसत्तेच्या करारानुसार भाजपाला यावेळी महापौरपदाची आस होती. भाजपाच्या नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन महापौरपदावरील दावा सोडला. त्यामुळे भाजपामधून इच्छुक असलेल्या मनीषा धात्रक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाने अडीच वर्षांत त्यांना कोणतेही पद दिलेले नाही. धात्रक यांची नगरसेविकापदाची ही दुसरी टर्म आहे.२७ गावांतील पाणीप्रश्नसोडवणार : विनीता राणे२०१५ मध्ये महापालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्यापासून मी २७ गावांतील पाणीप्रश्नाविषयी ऐकत आहे. हा प्रश्न सोडवण्यास मी प्राधान्य देणार आहे. तसेच शहरात विविध विकासकामे करणार आहे. प्रलंबित असलेले प्रकल्प मार्गी लावण्यावर भर दिला जाईल. सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचा मानस नवनिर्वाचित महापौर विनीता राणे यांनी व्यक्त केला.टिटवाळ्याच्या विकासाला प्राधान्य : उपेक्षा भोईर२७ गावांतील पाणीप्रश्न गंभीर आहेच. मात्र, माझ्या मांडा-टिटवाळा परिसराकडे आजवर महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. या परिसराच्या समस्या सोडवण्यास मी प्रथम प्राधान्य देणार आहे, असे नवनिर्वाचित उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी सांगितले.राणे १३ व्या महापौरमहापालिकेत १९९५ पासून आजपर्यंत १२ जणांनी महापौरपद भूषवले आहे. राणे या १३ व्या महापौर आहेत. यापूर्वी आरती मोकल, शरयू प्रधान, अनिता दळवी, मंगल शिंदे, वैजयंती घोलप आणि कल्याणी पाटील या महिलांनी महापौरपद भूषवले आहे. या सर्व नगरसेविका शिवसेनेच्या होत्या. आता पुन्हा शिवसेनेच्या नगरसेविका विनीता राणे यांना महापौरपद मिळाले आहे.दोन्ही पदे महिलांकडेभाजपाने यापूर्वी २००१ मध्ये वनिता पाटील यांना उपमहापौरपदाची संधी दिली होती. त्यानंतर नगरसेविकेचा उपमहापौरपदासाठी विचार झाला नव्हता. १५ वर्षांनी उपमहापौरपदाची संधी भाजपाच्या उपेक्षा भोईर यांना मिळाली आहे. यापूर्वी महापौर व उपमहापौर ही दोन्ही पदे ही एकाच वेळी महिलांकडे नव्हती. तो योग यावेळी जुळून आला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाnewsबातम्याShiv Senaशिवसेना