शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

कल्याण डोंबिवली : पाणी दरवाढीच्या कचाट्यातून निवासी नागरिकांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 21:29 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवासी पाणी दरात तीन रुपये वाढ प्रस्तावित करण्यात आली होती. ही दरवाढ स्थायी समितीच्या बुधवारी पार पडलेल्या सभेत फेटाळून लावण्यात आली आहे.

कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवासी पाणी दरात तीन रुपये वाढ प्रस्तावित करण्यात आली होती. ही दरवाढ स्थायी समितीच्या बुधवारी पार पडलेल्या सभेत फेटाळून लावण्यात आली आहे. मात्र हॉटेल्स, परमीटरुम, लॉजिंग बोर्डिंग, मंगल कार्यालये यांच्या पाणी दरात ९ रुपयांनी वाढ करण्यास समितीने मंजूरी दिली आहे.निवासी आणि वाणिज्य वापराच्या पाणी दरात वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर मंजूरीसाठी मांडण्यात आला होता. या विषयाचे विवेचन करताना पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी सांगितले की, महापालिकेच्या मोहिली, नेतीवली जलशुद्धीकरण केंद्रातून ४०० दश लक्ष लिटर पाण्यावर शुद्धतेची प्रक्रिया करुन ते पुरविण्याची क्षमताा महापालिकेकडे आहे. कच्चे पाणी, त्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करणे, त्यासाठी लागणारी वीज, रसायने, आस्थापना खर्च, देखभाल दुरुस्तीचा खर्च, योजनेसाठी घेतलेले कर्जाची परतफेड पाहता पाणी दरात वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. तीन हजार लिटर पाण्यासाठी महापालिका सध्या सात रुपये दर आकारते. त्यात तीन रुपये दरवाढ सुचविण्यात आली. तीन हजारापेक्षा जास्त पाण्याचा वापर करणाºयांना सात रुपये ऐवजी २० रुपये दर आकारण्याचे प्रस्तावित होते. तसेच वाणिज्य वापरासाठी विविध स्वरुपात पाणी दरवाढ प्रस्तावित केली होती. नागरीक किती पाणी वापरात. शहरातील प्रत्येक घराला मीटरींग झाले आहे. मोजन मापून पाणी देतो का हे प्रश्न सदस्य निलेश शिंदे, माधुरी काळे, दीपेश म्हात्रे यांनी उपस्थित केला. तसेच सदस्या छाया वाघमारे यांनी नागरीकांना पाणी न देता त्यांच्या पाण्याच्या दरात वाढ करणे कितपत योग्य आहे. त्यामुळे नागरीकांचा महापालिकेच्या विरोधात वाढणार आहे. याचा सारासार विचार झाला पाहिजे या मुद्याकडे सदस्यांनी लक्ष वेधल्याने सभापती राहूल दामले यांनी निवासी पाणी दरात सुचविलेली तीन रुपायंची दरवाढ फेटाळून लावली आहे. मात्र हॉटेल्स, परमीट रुम, लॉजिंग बोर्डिंग, मंगल कार्यालयाना तीन हजार लिटर पाणी ३६ रुपये दराने दिले जाते. त्यात ९ रुपये वाढ करण्याचे सदस्यांनी सूचित केले. त्यानुसार सभापतीने ९ रुपये दरवाढीस मान्यता दिली. त्यामुळे या मंडळीना आत्ता तीन हजार लिटर पाण्यासाठी ४५ रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ १ एप्रील २०१८ पासून लागू होणार आहे.चौकट-बेकायदा नळ जोडण्या केवळ ४५० ?मालमत्ता सर्वेक्षणाचे काम कोलब्रो कंपनीला दिले होते. या कंपनीने ८० टक्के काम पूर्ण करुन केवळ मालमत्ताचा शोध घ्यायचा नव्हता तर बेकायदा नळ जोडण्याही शोधायच्या होत्या. त्या कंपनीने केवळ ४५० बेकायदा नळ जोडण्या शोधल्याची माहिती कार्यकारी अभियंता पाठक यांनी यावेळी दिली. मग या कंपनीला आठ कोटीचे बिल कशाच्या आधारे दिले असा सवाल सदस्यांनी उपस्थीत केला. कंपनीने आठ कोटी लागून केवळ ४५० बेकायदा नळ जोडण्या शोधल्याने हा शोध हास्यास्पद असून महापालिकेची दिशाभूल करणारा आहे.चौकट-मीटर किती लावले ?ज्या सोसायट्यांच्या तळ आणि गच्चीवर पाण्याच्या टाक्या आहेत. अशा २१ हजार ८०० सोसायट्यांना मिटर लावले आहेत. हे काम २००१ ते २००३ या कालावधीत झाले आहे. पुन्हा २००९ ते २०१४ या कालावधीत केंद्र्र सरकारच्या योजने अंतर्गत मीटरींग करण्यासाठी काम हाती घेतले. त्यापैकी ७० हजार ९२२ नळ जोडण्यांना मीटर लावले आहे. पाच हजार मीटर जोडण्याना मीटर लावणे बाकी आहे. हे शिल्लक राहिलेले काम महापालिकेच्या माध्यमातून केले जाणार आहे. महापालिकेने २०१४ साली बेकायदा नळ जोडण्या नियमीत करण्याचा ठराव मंजूर केला होता. या ठरावानुसार ६ हजार ८०० बेकायदा नळ जोडण्याना २.५ पट्टीने दंड आकारुन नियमीत करण्यात आले आहे. त्यातून महापालिकेच्या तिजोरीत एक कोटी २२ लाख रुपये जमा झालेले आहेत.

टॅग्स :Waterपाणी