शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

‘कल्याण-डोंबिवलीतील रसिक उत्तम, पण रस्ते थर्ड क्लास!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 05:44 IST

कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची दुर्दशा झाल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची दुर्दशा झाल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. या सामान्य नागरिकांच्या समस्येला काही दिवसांपूर्वी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी वाचा फोडली होती. त्यानंतर, आता सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनीही रस्त्यांच्या दुर्दशेवर रविवारी फेसबुकवर टीका केली. केवळ कल्याणातील खड्ड्यांमुळे प्रवासात अधिक वेळ गेल्याची खंत त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाच्या प्रयोगासाठी शनिवारी प्रशांत दामले आले होते. त्यावेळी त्यांनी येथील खड्ड्यांचा अनुभव घेतल्यानंतर रविवारी फेसबुकवरून टीका केली. कल्याणातील नाट्यरसिक उत्तम आहेत, पण रस्ते थर्डक्लास असल्याची पोस्ट त्यांनी फेसबुकवर टाकताच ती व्हायरल झाली. इतक ी वर्षे मी रंगभूमीवर काम करीत आहे. रस्त्यांवर खड्डे का पडतात, हा संशोधनाचा विषय आहे. स्वातंत्र्योत्तर काळात दादरच्या टिळक पुलावर टाकलेले डांबर गेली ७५ वर्षे तसेच आहेत. त्यावर खड्डे पडले नाहीत. म्हणजे, आपण उत्तम रस्ते बनवू शकतो. काही ठिकाणी उत्तम रस्ते आहेतही, पण कल्याणमध्ये उत्तम रस्ते नाहीत. याचा अभ्यास करायला हवा. याचा अर्थ इच्छाशक्तीचा अभाव, हे एकमेव कारण असल्याचे दिसत आहे. त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे. कल्याणनाका ते अत्रे नाट्यगृह येथे येण्यासाठी नेहमी अर्धा तास लागतो. त्याऐवजी रविवारी एक तास लागला. हा वेळ खड्ड्यांमुळे लागला. मनुष्याचा वेळ, इंधन सगळेच वाया जाते. आम्हाला प्रयोगाला उशीर झाला नाही. कारण, तसा वेळ हातात ठेवूनच आम्ही निघत असतो. परंतु, काल लागलेला वेळ म्हणजे कहरच होता, असे दामले यांनी सांगितले.

टॅग्स :Prashant Damleप्रशांत दामलेPotholeखड्डे