शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

‘कल्याण-डोंबिवलीतील रसिक उत्तम, पण रस्ते थर्ड क्लास!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 05:44 IST

कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची दुर्दशा झाल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.

कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची दुर्दशा झाल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. या सामान्य नागरिकांच्या समस्येला काही दिवसांपूर्वी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी वाचा फोडली होती. त्यानंतर, आता सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनीही रस्त्यांच्या दुर्दशेवर रविवारी फेसबुकवर टीका केली. केवळ कल्याणातील खड्ड्यांमुळे प्रवासात अधिक वेळ गेल्याची खंत त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाच्या प्रयोगासाठी शनिवारी प्रशांत दामले आले होते. त्यावेळी त्यांनी येथील खड्ड्यांचा अनुभव घेतल्यानंतर रविवारी फेसबुकवरून टीका केली. कल्याणातील नाट्यरसिक उत्तम आहेत, पण रस्ते थर्डक्लास असल्याची पोस्ट त्यांनी फेसबुकवर टाकताच ती व्हायरल झाली. इतक ी वर्षे मी रंगभूमीवर काम करीत आहे. रस्त्यांवर खड्डे का पडतात, हा संशोधनाचा विषय आहे. स्वातंत्र्योत्तर काळात दादरच्या टिळक पुलावर टाकलेले डांबर गेली ७५ वर्षे तसेच आहेत. त्यावर खड्डे पडले नाहीत. म्हणजे, आपण उत्तम रस्ते बनवू शकतो. काही ठिकाणी उत्तम रस्ते आहेतही, पण कल्याणमध्ये उत्तम रस्ते नाहीत. याचा अभ्यास करायला हवा. याचा अर्थ इच्छाशक्तीचा अभाव, हे एकमेव कारण असल्याचे दिसत आहे. त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे. कल्याणनाका ते अत्रे नाट्यगृह येथे येण्यासाठी नेहमी अर्धा तास लागतो. त्याऐवजी रविवारी एक तास लागला. हा वेळ खड्ड्यांमुळे लागला. मनुष्याचा वेळ, इंधन सगळेच वाया जाते. आम्हाला प्रयोगाला उशीर झाला नाही. कारण, तसा वेळ हातात ठेवूनच आम्ही निघत असतो. परंतु, काल लागलेला वेळ म्हणजे कहरच होता, असे दामले यांनी सांगितले.

टॅग्स :Prashant Damleप्रशांत दामलेPotholeखड्डे