शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कल्याण-बदलापूर रस्त्यासाठी आयुक्तांना घातले साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:57 IST

उल्हासनगर पालिका : चार वर्षांपासून रखडले आहे काम

उल्हासनगर : पुनर्बांधणीविना चार वर्षापासून रखडलेला कल्याण ते बदलापूर रस्त्यासाठी व्यापारी, सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्त सुधाकर शिंदे यांच्याशी मंगळवारी चर्चा केली. बाधित दुकानदारांना पर्यायी जागा दिल्यानंतरच रस्त्याच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा होणार असल्याचे व्यापारी व सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्तांना सांगितले.

उल्हासनगरमधून जाणाऱ्या कल्याण ते बदलापूर रस्त्याचे १०० फुटी रूंदीकरण तत्कालिन आयुक्त मनोहर हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ४ वर्षापूर्वी झाले. रस्ता रूंदीकरणापूर्वी प्रथम पर्यायी जागा द्या, नंतरच दुकानांवर कारवाई करा अशी भूमिका घेऊन काही दुकानदारांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्याचा अद्यापही निर्णय लागला नाही. न्यायालयात गेलेल्या दुकानादांराना पर्यायी जागा दिल्यावरच, रस्ता पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा होणार असल्याची प्रतिक्रीया माजी आमदार कुमार आयलानी यांनी दिली. रस्ता रूंदीकरणात पूर्णत: बाधित झालेल्या व्यापाऱ्यांना पालिकेच्या इंदिरा गांधी भाजीमार्केट या ठिकाणी २०० चौरस मीटर व्यापारी गाळे देण्याचा ठराव त्यावेळी महासभेत मंजूर झाला. मात्र पालिकेने कारवाई केली नाही. न्यायालयात पर्यायी जागेसाठी दार ठोठावलेल्या दुकानदारांसोबत सर्वपक्षीय नेते व तत्कालिन आयुक्तांनी बैठक घेऊन रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी न्यायालयातून माघार घेण्याचे आश्वासन व्यापाºयांना दिले होते.मात्र त्यानंतर पालिकेने पुढाकार घेतलेला नाही. व्यापाºयांसह सर्वपक्षीय नेत्यांनी पुन्हा आयुक्तांना साकडे घातले आहे. शिष्टमंडळामध्ये आयलानी, भाजपचे प्रदेश सचिव प्रकाश माखिजा, गटनेते जमनुदास पुरस्वानी, लाल पंजाबी, प्रदीप रामचंदानी तसेच व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.२२ कोटी पडूनशहरातून जाणाºया कल्याण-बदलापूर रस्त्यासाठी एमएमआरडीएने २२ कोटीच्या निधीला मंजुरी दिली होती. चार वर्षापासून निधी पडून असून महापालिकेने रस्ता पुनर्बांधणीतील अडसर दूर करण्याचे आदेश एमएमआरडीएने पालिकेला दिले होेते, तसेच निधी परत घेण्याचा इशाराही दिला होता. महापालिकेने पर्यायी जागेसाठी न्यायालयात गेलेल्या व्यापाºयांची वेळीच समजूत काढली नाहीतर हा निधी परत जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kalyanकल्याणbadlapurबदलापूर