शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Jayant Patil: काळू-शाई धरणाचे काम लवकरच होणार पूर्ण, जयंत पाटील यांची ग्वाही : प्रकल्पांचा घेतला आढावा, ठाणे जिल्ह्याची टंचाई दूर होण्याची चिन्हे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 06:26 IST

Jayant Patil: गेल्या काही दिवसांपासून पाटील ठाणे जिल्हा दौऱ्यावर आहेत.  त्यांनी सोमवारी सकाळी जिल्ह्यातील पाणीपुरवठ्यासह रखडलेल्या धरण प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते

ठाणे : न्यायप्रविष्ट असलेल्या काळू धरणाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यापाठोपाठ शाई धरणाचे काम लवकरच होती घेऊ. नवीन भूसंपादन कायद्यास अनुसरून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत आहे. त्यानुसरून शेतकऱ्यांशी संवाद साधून रखडलेले शाई व काळू धरणाचे काम लवकर पूर्ण करण्यात येईल, असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी स्पष्ट केले. यामुळे ठाणे शहरासह जिल्ह्यातील महापालिकांची पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.गेल्या काही दिवसांपासून पाटील ठाणे जिल्हा दौऱ्यावर आहेत.  त्यांनी सोमवारी सकाळी जिल्ह्यातील पाणीपुरवठ्यासह रखडलेल्या धरण प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्ह्यातील अनेक शहरांना दोन ते तीन दिवसांनी पाणीपुरवठा होतो. यामुळे काही ठिकाणी कमी पाणी मिळत आहे. यासाठी तातडीने उपाययोजना करून सध्याच्या प्रकल्पातून किती पाणीपुरवठा होणार आणि अतिरिक्त पाण्यासाठी काय करावे लागणार आदी विषयांवर आढावा बैठकीत चर्चा झाल्याचे पाटील यांनी सांगितले.

एमआयडीसीला एसटीपी प्लांटचे पाणी बंधनकारकजिल्ह्यातील महानगरपालिकांना पाण्याच्या रिसायकलिंगच्या प्रकल्पांची क्षमता वाढण्यास सांगितले. याशिवाय रिसायकल पाणी एमआयडीसीला वापर करण्यास भाग पाडले जाणार आहे. यांना पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई करावी लागणार आहे. एमआयडीसीला त्यांचे वाहून जाणारे पाणी एसटीपी प्लांटचा वापर करून रिसायकलिंग करून वापरणे बंधनकारक केले जाईल. यामुळे त्यांच्याकडून वापरण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा वापर ठिकठिकाणी असलेली पाणी समस्या दूर करण्यासाठी करता येईल. कोकणामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी मोठे प्रकल्प तातडीने पूर्ण करावे, असे नमूद केल्याचे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

टास्क फोर्सपाइपलाइन वेळीच जोडण्यासाठी पोलीस यंत्रणा तैनात करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आणि या विविध कामांना मार्गी लावण्यासाठी त्यांचा दैनंदिन आढावा घेण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येत आहे. त्यास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सहमती दिल्याचे ते म्हणाले.

येऊर बंधाऱ्याची दुरुस्ती येऊर येथील जुन्या बंधाऱ्याची दुरुस्ती करून त्यातील पाण्याचा वापर ठाण्याच्या काही भागाला होईल. मुंब्रा परिसरातील डोंगरातील वाहून जाणारे पाणी कोल्हापुरी बंधारे बांधून त्याचा वापर कळवा आणि मुंब्रा येथे करून पाणी समस्या कमी करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटील