शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

Jayant Patil: काळू-शाई धरणाचे काम लवकरच होणार पूर्ण, जयंत पाटील यांची ग्वाही : प्रकल्पांचा घेतला आढावा, ठाणे जिल्ह्याची टंचाई दूर होण्याची चिन्हे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 06:26 IST

Jayant Patil: गेल्या काही दिवसांपासून पाटील ठाणे जिल्हा दौऱ्यावर आहेत.  त्यांनी सोमवारी सकाळी जिल्ह्यातील पाणीपुरवठ्यासह रखडलेल्या धरण प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते

ठाणे : न्यायप्रविष्ट असलेल्या काळू धरणाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यापाठोपाठ शाई धरणाचे काम लवकरच होती घेऊ. नवीन भूसंपादन कायद्यास अनुसरून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत आहे. त्यानुसरून शेतकऱ्यांशी संवाद साधून रखडलेले शाई व काळू धरणाचे काम लवकर पूर्ण करण्यात येईल, असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी स्पष्ट केले. यामुळे ठाणे शहरासह जिल्ह्यातील महापालिकांची पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.गेल्या काही दिवसांपासून पाटील ठाणे जिल्हा दौऱ्यावर आहेत.  त्यांनी सोमवारी सकाळी जिल्ह्यातील पाणीपुरवठ्यासह रखडलेल्या धरण प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्ह्यातील अनेक शहरांना दोन ते तीन दिवसांनी पाणीपुरवठा होतो. यामुळे काही ठिकाणी कमी पाणी मिळत आहे. यासाठी तातडीने उपाययोजना करून सध्याच्या प्रकल्पातून किती पाणीपुरवठा होणार आणि अतिरिक्त पाण्यासाठी काय करावे लागणार आदी विषयांवर आढावा बैठकीत चर्चा झाल्याचे पाटील यांनी सांगितले.

एमआयडीसीला एसटीपी प्लांटचे पाणी बंधनकारकजिल्ह्यातील महानगरपालिकांना पाण्याच्या रिसायकलिंगच्या प्रकल्पांची क्षमता वाढण्यास सांगितले. याशिवाय रिसायकल पाणी एमआयडीसीला वापर करण्यास भाग पाडले जाणार आहे. यांना पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई करावी लागणार आहे. एमआयडीसीला त्यांचे वाहून जाणारे पाणी एसटीपी प्लांटचा वापर करून रिसायकलिंग करून वापरणे बंधनकारक केले जाईल. यामुळे त्यांच्याकडून वापरण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा वापर ठिकठिकाणी असलेली पाणी समस्या दूर करण्यासाठी करता येईल. कोकणामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी मोठे प्रकल्प तातडीने पूर्ण करावे, असे नमूद केल्याचे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

टास्क फोर्सपाइपलाइन वेळीच जोडण्यासाठी पोलीस यंत्रणा तैनात करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आणि या विविध कामांना मार्गी लावण्यासाठी त्यांचा दैनंदिन आढावा घेण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येत आहे. त्यास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सहमती दिल्याचे ते म्हणाले.

येऊर बंधाऱ्याची दुरुस्ती येऊर येथील जुन्या बंधाऱ्याची दुरुस्ती करून त्यातील पाण्याचा वापर ठाण्याच्या काही भागाला होईल. मुंब्रा परिसरातील डोंगरातील वाहून जाणारे पाणी कोल्हापुरी बंधारे बांधून त्याचा वापर कळवा आणि मुंब्रा येथे करून पाणी समस्या कमी करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटील