शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील पाणी टंचाईवर संयुक्त समिती, महापालिका उभारणार स्वतःचे पाणी स्रोत 

By सदानंद नाईक | Updated: August 25, 2023 16:58 IST

तसेच शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदी किनारे स्वतःचे पाणी स्त्रोत निर्माण करण्यालाही मंजुरी देण्यात आली आहे.

 उल्हासनगर : शहरातील पाणी टंचाईची समस्या निकाली काढण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मुंबई दालनात झालेल्या बैठकीत महापालिका, एमआयडीसी व महावितरण यांची संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदी किनारे स्वतःचे पाणी स्त्रोत निर्माण करण्यालाही मंजुरी देण्यात आली आहे.

 उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचे पाणी स्रोत नसल्याने, पाण्यासाठी एमआयडीसी यांच्यावर अवलंबून राहावे लागते. एमआयडीसी पाणी सोडले, त्याच वेळी वीज गुल झाल्यास, शहरातील विविध पाणी टंचाई निर्माण होत असल्याचे उघड झाले. शहरातील पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी उधोगमंत्री उदय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली गुरवारी एक बैठक पार पाडली. एमआयडीसीच्या माध्यमांतून शहरवासियांना मुबलक पाणी पुरवठा करणे आणि स्वतंत्र पाण्याचे स्रोत उभारण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.

 शहरातील पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी एमआयडीसी, महावितरण आणि उल्हासनगर महापालिका प्रशासन यांची एकत्रितरित्या महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात यावी. याबाबत बैठकीत उद्योगमंत्री महोदयांनी आदेश दिले. पाणी पुरवठ्याचे वितरण वेळी वीज पुरवठा खंडित होऊ नये. याकडे लक्ष देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या अमृत योजनेच्या टप्पा क्रं-२ अंतर्गत महापालिका स्वतःचे पाण्याचे स्रोत उभारणार आहे. यासाठी महापालिकेने सविस्तर प्रस्ताव यापूर्वीच शासन दरबारी पाठविला असल्याची माहिती महापालिका पाणी पुरावठा विभागाने पाठविली आहे. 

टॅग्स :Ulhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणुक 2022Waterपाणीwater shortageपाणीकपात