शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

जितेंद्र आव्हाड दुतोंडी साप; नरेश म्हस्के याची टीका

By अजित मांडके | Updated: January 4, 2024 16:00 IST

आव्हाडांना सांभाळून घ्या ते आपल्यात येणार आहेत. असे उध्दव ठाकरे सांगायचे म्हस्केंचे खळबळजनक विधान.

अजित मांडके, ठाणे :राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आव्हाड हे दुतोंडी साप असल्याची जहरी टीका करताना उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लक्ष केले आहे. तसेच आव्हाड यांच्या विरोधात जेव्हा आम्ही आंदोलन घ्यायचो तेव्हा आम्हाला मातोश्रीवरून आव्हाड यांना सांभाळून घ्या असे फोन यायचे, ते आपल्यातच येणार आहेत असे सांगितले जायचं असेही खळबळजनक उद्गार म्हस्के यांनी केले आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाशी मातोश्री आणि संजय राऊत सहमत आहात का? संजय राऊत आता काय मूग गिळून शांत बसले आहेत का? हेच का तुमचं हिंदुत्व असा टोला म्हस्के यांनी ठाण्यातील आनंदआश्रमामधून प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला आहे. याशिवाय लोकांची माथी भडकवण्याच काम करून दंगली भडकवण्याचा आव्हाडांचा कट असल्याने याबाबत सरकारने चौकशी करावी अशी मागणी म्हस्के यांनी केली आहे.

पुढे बोलताना म्हस्के यांनी, आव्हाड रात्रीचे ट्विट करतात, आणि सकाळी ते डिलीट करतात.  रात्री त्यांची अवस्था काय असते, हे त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांना विचारा असे म्हटले. तसेकंग नेहमीप्रमाणे त्यांनी आता खंत व्यक्त केली आहे, कदाचित ते त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत त्या अवस्थेतून निघाले नसतील असे म्हस्के यांनी म्हटले आहे. आव्हाड यांच्या विरोधात जेव्हा आम्ही आंदोलन घ्यायचो, तेव्हा आम्हाला मातोश्रीवरून जितेंद्र आव्हाड यांना सांभाळून घ्या असे फोन यायचे, ते आपल्यातच येणार आहेत असं सांगितलं जायचं, एवढा मातोश्रीला जितेंद्र आव्हाड यांच्या विषयी प्रेम होत. तसेच कळवा शिवसेना शाखा तोडण्याचा पुरावा आम्ही मातोश्रीला दिला होता. तरी देखील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिल्या असा सवाल म्हस्के यांनी करत, आव्हाड यांच्या विधानाशी मातोश्री संजय राऊत सहमत आहात का? संजय राऊत आता काय मूग गिळून शांत बसले आहेत का? हेच का तुमचं हिंदुत्व आहे असा प्रश्न म्हस्के यांनी विचारत, खुर्चीसाठी मातोश्री ने हिंदुत्व सोडलेलं आहे, त्यांनी त्यांच्या आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल बोलावं आणि भूमिका मांडावी असे आवाहन केले आहे.

पुढे बोलताना, एकीकडे आव्हाड हिंदू देवतांबद्दल बोलतात आणि रात्रीचे बुवा आणि मांत्रिकांच्या मध्ये बसलेले असतात, स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणतात आणि वेगवेगळ्या बुवा बाबांचे गंडेदोरे बांधतात ही बाब ही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. आव्हाडांचा कुठला आणि कसला अभ्यास, यापूर्वी ऋषी मुनींनी केलेला अभ्यास हा फेल आहे का, राज्य घटनेत सर्व जाती धर्माचा आदर करा असं म्हटलं आहे. महाराष्ट्र हिंदुस्थानातील लोकांची माथी भडकवण्याच काम जितेंद्र आव्हाड करत आहे, दंगली भडकवण्याचा  त्यांचा कट आहे.याची सरकारने चौकशी करावी असे ही म्हटले आहे.

 तर शरद पवार, सुप्रिया सुळे हे देखील या बद्दल बोलत नसतील तर त्यांनी वक्तव्याला समर्थन दिल आहे असं मानतो असेही म्हस्के यांनी म्हटले आहे.

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड