शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

झाडांच्या कत्तलीसाठीच आरेमध्ये ‘पोलीसराज’ - जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 04:15 IST

एखादी भीषण दंगल झाल्यानंतर जसे तणावपूर्ण वातावरण असते, तसे वातावरण शनिवारी आरेच्या जंगलामध्ये होते.

ठाणे : मेट्रोच्या कारशेडसाठी आरेतील हजारो झाडांची कत्तल करता यावी, यासाठी आरेमध्ये संचारबंदी जाहीर करून हा परिसर पोलिसांच्या हवाली करण्यात आला आहे. त्यामुळे आरेत पोलीसराज निर्माण झाल्याचे चित्र दिसत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी केला.एखादी भीषण दंगल झाल्यानंतर जसे तणावपूर्ण वातावरण असते, तसे वातावरण शनिवारी आरेच्या जंगलामध्ये होते. संचारबंदी लागू झालेली, जागोजागी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, येणाऱ्या-जाणाऱ्यांची ओळखपत्रांसह तपासणी करत प्रत्येकाची कसून चौकशी पोलीस करीत होते. कॉलेजमधून परत आलेल्या एका मुलीजवळ आधार कार्ड नव्हते. त्यामुळे तिचे आदिवासी वडील आपल्या पाड्यातून तिचे आधार कार्ड घेऊन येईपर्यंत पोलिसांनी तिला अडकवून ठेवले होते. फरक इतकाच की, आरेमध्ये दंगल-हत्याकांड सरकारच करत होते. झाडांची बेसुमार कत्तल चालली होती आणि ती थांबविण्यासाठी जे कोणी पुढे येतील, त्यांना अडविण्यासाठी हा पोलीस बंदोबस्त होता. सदासर्वकाळ पर्यावरणाचे गोडवे गाणारे सरकार स्वत: पर्यावरणाचा विध्वंस करत होते, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.आव्हाड शनिवारी दुपारी ३ वा.च्या सुमारास आरेमध्ये पोहोचले. तेव्हा काही केल्या पोलीस आपल्याला आरे जंगलात प्रवेश देणार नाहीत, याची खात्री त्यांना पटली. आमदारकीचा तोरा मिरविण्यात अर्थ नव्हता. पोलीस ‘वरून’ आलेल्या हुकुमाला बांधिल होते. नशिबाने त्या वेळी जंगलातल्या आदिवासीपाड्यात राहणारी एक महिला त्यांच्या मदतीला धावली. जंगलातील चोरवाटांची तिला खडा अन् खडा माहिती होती. पोलिसांची नजर चुकवून आडवळणाच्या वाटेने तिच्या मदतीने आव्हाड यांनी जंगलात प्रवेश केला. काही अंतर दुचाकीने पार केले. जिथे झाडं कापली जात होती, तिथपर्यंतचे साधारण नऊ किलोमीटरचे अंतर त्यांनी पायी कापले. ही वृक्षछाटणी स्वत:च्या डोळ्यांनी पाहायची, असा निर्धार त्यांनी केला होता. त्यामुळे एक प्रकारचा गनिमी कावा करत आरेमध्ये प्रवेश करण्याचा एक चित्तथरारक अनुभव आपण घेतल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.‘प्राणवायू देणारी झाडे निष्प्राण झाली’तिथे पोहोचल्यानंतर जे दृश्य दिसले, ते हृदयद्रावक होते. कंत्राटदारांचे शेकडो मजूर त्यांच्या यांत्रिक करवतींनी सपासप झाडे छाटत होते. साधारणपणे दोन मिनिटांत ७०/८० वर्षांचे झाड भुईसपाट होत होते. पर्यावरणाचा विध्वंस इतक्या वेगाने होऊ शकतो, यावर विश्वास बसत नव्हता. आम्ही जमतील तितके व्हिडीओ काढायचा प्रयत्न केला. एका झाडाच्या कलेवरापाशी उभा राहिलो, तेव्हा डोळ्यांत पाणी आले. मुंबई, ठाण्याला अथकपणे प्राणवायू देणारा तो जीव स्वत:च निष्प्राण होऊन पडला होता. अशा अनेक प्रेतांचा खच तिथे पडला होता. तेवढ्यात पोलिसांना सुगावा लागला. मला आणि माझ्या सहकाºयांना त्यांनी दंडाला धरून बाहेर काढल्याचे आव्हाड यांनी सांगितले.‘...तर मुंबईचे गोरखपूर होईल’नवरात्रात दांडिया खेळावा इतक्या सहजपणे सरकारने आरेतील झाडांवर करवती चालविल्या. आॅक्सिजनच्या अभावाने गोरखपूरमध्ये शेकडो बालकांचा बळी गेला. अडीच हजार झाडांची कत्तल करून महाराष्ट्र सरकार आता मुंबईचे गोरखपूर करायच्या वाटेवर आहे, असे या घटनेचे वर्णन आव्हाड यांनी केले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडAarey Coloneyआरे