शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
3
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
4
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
5
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
6
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
7
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
8
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
9
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
10
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
11
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
12
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
13
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
14
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
15
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
16
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
17
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
18
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
19
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
20
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

झाडांच्या कत्तलीसाठीच आरेमध्ये ‘पोलीसराज’ - जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 04:15 IST

एखादी भीषण दंगल झाल्यानंतर जसे तणावपूर्ण वातावरण असते, तसे वातावरण शनिवारी आरेच्या जंगलामध्ये होते.

ठाणे : मेट्रोच्या कारशेडसाठी आरेतील हजारो झाडांची कत्तल करता यावी, यासाठी आरेमध्ये संचारबंदी जाहीर करून हा परिसर पोलिसांच्या हवाली करण्यात आला आहे. त्यामुळे आरेत पोलीसराज निर्माण झाल्याचे चित्र दिसत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी केला.एखादी भीषण दंगल झाल्यानंतर जसे तणावपूर्ण वातावरण असते, तसे वातावरण शनिवारी आरेच्या जंगलामध्ये होते. संचारबंदी लागू झालेली, जागोजागी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, येणाऱ्या-जाणाऱ्यांची ओळखपत्रांसह तपासणी करत प्रत्येकाची कसून चौकशी पोलीस करीत होते. कॉलेजमधून परत आलेल्या एका मुलीजवळ आधार कार्ड नव्हते. त्यामुळे तिचे आदिवासी वडील आपल्या पाड्यातून तिचे आधार कार्ड घेऊन येईपर्यंत पोलिसांनी तिला अडकवून ठेवले होते. फरक इतकाच की, आरेमध्ये दंगल-हत्याकांड सरकारच करत होते. झाडांची बेसुमार कत्तल चालली होती आणि ती थांबविण्यासाठी जे कोणी पुढे येतील, त्यांना अडविण्यासाठी हा पोलीस बंदोबस्त होता. सदासर्वकाळ पर्यावरणाचे गोडवे गाणारे सरकार स्वत: पर्यावरणाचा विध्वंस करत होते, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.आव्हाड शनिवारी दुपारी ३ वा.च्या सुमारास आरेमध्ये पोहोचले. तेव्हा काही केल्या पोलीस आपल्याला आरे जंगलात प्रवेश देणार नाहीत, याची खात्री त्यांना पटली. आमदारकीचा तोरा मिरविण्यात अर्थ नव्हता. पोलीस ‘वरून’ आलेल्या हुकुमाला बांधिल होते. नशिबाने त्या वेळी जंगलातल्या आदिवासीपाड्यात राहणारी एक महिला त्यांच्या मदतीला धावली. जंगलातील चोरवाटांची तिला खडा अन् खडा माहिती होती. पोलिसांची नजर चुकवून आडवळणाच्या वाटेने तिच्या मदतीने आव्हाड यांनी जंगलात प्रवेश केला. काही अंतर दुचाकीने पार केले. जिथे झाडं कापली जात होती, तिथपर्यंतचे साधारण नऊ किलोमीटरचे अंतर त्यांनी पायी कापले. ही वृक्षछाटणी स्वत:च्या डोळ्यांनी पाहायची, असा निर्धार त्यांनी केला होता. त्यामुळे एक प्रकारचा गनिमी कावा करत आरेमध्ये प्रवेश करण्याचा एक चित्तथरारक अनुभव आपण घेतल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.‘प्राणवायू देणारी झाडे निष्प्राण झाली’तिथे पोहोचल्यानंतर जे दृश्य दिसले, ते हृदयद्रावक होते. कंत्राटदारांचे शेकडो मजूर त्यांच्या यांत्रिक करवतींनी सपासप झाडे छाटत होते. साधारणपणे दोन मिनिटांत ७०/८० वर्षांचे झाड भुईसपाट होत होते. पर्यावरणाचा विध्वंस इतक्या वेगाने होऊ शकतो, यावर विश्वास बसत नव्हता. आम्ही जमतील तितके व्हिडीओ काढायचा प्रयत्न केला. एका झाडाच्या कलेवरापाशी उभा राहिलो, तेव्हा डोळ्यांत पाणी आले. मुंबई, ठाण्याला अथकपणे प्राणवायू देणारा तो जीव स्वत:च निष्प्राण होऊन पडला होता. अशा अनेक प्रेतांचा खच तिथे पडला होता. तेवढ्यात पोलिसांना सुगावा लागला. मला आणि माझ्या सहकाºयांना त्यांनी दंडाला धरून बाहेर काढल्याचे आव्हाड यांनी सांगितले.‘...तर मुंबईचे गोरखपूर होईल’नवरात्रात दांडिया खेळावा इतक्या सहजपणे सरकारने आरेतील झाडांवर करवती चालविल्या. आॅक्सिजनच्या अभावाने गोरखपूरमध्ये शेकडो बालकांचा बळी गेला. अडीच हजार झाडांची कत्तल करून महाराष्ट्र सरकार आता मुंबईचे गोरखपूर करायच्या वाटेवर आहे, असे या घटनेचे वर्णन आव्हाड यांनी केले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडAarey Coloneyआरे