शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
4
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
5
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
6
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
7
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
8
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
9
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
10
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
11
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
12
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
13
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
14
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
15
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
16
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
17
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
18
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
19
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
20
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित

मते मिळाली नाही म्हणून पाणी बंद करण्याचे घाणेरडे राजकारण कधीच केले नाही- जितेंद्र आव्हाड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 22:28 IST

पाण्याच्या विषयावर कधीच राजकारण केले नाही. करीतही नाही. पण पाण्याच्या टाकीसाठी निधी जागा आपण मिळविल्यानंतर त्याचे श्रेय जर कोणी केवळ महापालिकेत आपली सत्ता आहे, म्हणून घेणार असेल तर जनता अशा बाबींवर विश्वास ठेवत नसते,

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: पाण्याच्या विषयावर कधीच राजकारण केले नाही. करीतही नाही. पण पाण्याच्या टाकीसाठी निधी जागा आपण मिळविल्यानंतर त्याचे श्रेय जर कोणी केवळ महापालिकेत आपली सत्ता आहे, म्हणून घेणार असेल तर जनता अशा बाबींवर विश्वास ठेवत नसते, असा हल्लाबोल राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचे नाव न घेता केला. 

कळव्यातील वाघोबानगरमधील कारगिल परिसरात २० लाख लीटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे उद्धाटन राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते रविवारी रात्री झाले. येत्या महिन्याभरात या परिसरातील सर्व भागांमध्ये पाण्याचा पुरवठा होईल, अशी ग्वाही आव्हाड यांनी यावेळी दिली.

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल तसेच या टाकीसाठी जागा देणारे आदिवासी, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि सध्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्यासह पालिकेचे अभियंता गोसावी यांचेही आव्हाड यांनी विशेष आभार मानले. वाघोबानगरवासियांनी पहिल्याच वेळी आपल्याला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणले. त्यामुळेच या भागातील विकास कामांकडे लक्ष देणे आपले कर्तव्य असल्याचेही ते म्हणाले. या भागातील रहिवाशांसाठी पाणी, रस्ते अशा सर्वच मुलभूत सुविधा पुरविल्या जातील. त्यामुळे तुमच्या घरांच्या किंमती निश्चितच वाढतील, परंतू आपली घरे विकून पुन्हा दूसरीकडे झोपडया बांधू नका, असा कळकळीचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तुमच्याकडे येत्या महिनाभरात पाणी येईल, फक्त आशिर्वादाचा हात असू द्या, असे आवाहन त्यांनी केले. 

केवळ विकासाचे काममते मिळाली नाही म्हणून पाणी बंद करण्याचे घाणोरडे राजकारण आपण कधीच केले नाही. परंतू, असे प्रकार भास्करनगर, पौंडपाडा भागात घडतात. पाण्याचे वॉल्व बंद करुन आणि शौचालयांना लॉक लावण्याचे राजकारण कधीच केले नाही. लोक घाबरुन मते देतीलही परंतू, त्यांचे आशिर्वाद मिळणार नाहीत, असेही ते म्हणाले. आता असे व्हॉल्व बंद होणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या शिवसैनिकांनी केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेशशिवसेनेचे शाखाप्रमुख अंकुश गुरव, अक्षय अंकुश गुरव, उपशाखाप्रमुख रामआवतार यादव, संजय चौगुले, इस्माईल हक, दिलीप रजक, राहूल सिंग, संदीप शर्मा, नितेश गौड, राहूल दुबे आणि दीपक राजभर आणि राजेश राजभर या शिवसैनिकांनी आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

गणेश भगत यांचा विशेष सत्कारपाण्याच्या टाकीसाठी जागा देणारे गणेश भगत यांचाही यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेस