शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

मते मिळाली नाही म्हणून पाणी बंद करण्याचे घाणेरडे राजकारण कधीच केले नाही- जितेंद्र आव्हाड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 22:28 IST

पाण्याच्या विषयावर कधीच राजकारण केले नाही. करीतही नाही. पण पाण्याच्या टाकीसाठी निधी जागा आपण मिळविल्यानंतर त्याचे श्रेय जर कोणी केवळ महापालिकेत आपली सत्ता आहे, म्हणून घेणार असेल तर जनता अशा बाबींवर विश्वास ठेवत नसते,

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: पाण्याच्या विषयावर कधीच राजकारण केले नाही. करीतही नाही. पण पाण्याच्या टाकीसाठी निधी जागा आपण मिळविल्यानंतर त्याचे श्रेय जर कोणी केवळ महापालिकेत आपली सत्ता आहे, म्हणून घेणार असेल तर जनता अशा बाबींवर विश्वास ठेवत नसते, असा हल्लाबोल राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचे नाव न घेता केला. 

कळव्यातील वाघोबानगरमधील कारगिल परिसरात २० लाख लीटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे उद्धाटन राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते रविवारी रात्री झाले. येत्या महिन्याभरात या परिसरातील सर्व भागांमध्ये पाण्याचा पुरवठा होईल, अशी ग्वाही आव्हाड यांनी यावेळी दिली.

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल तसेच या टाकीसाठी जागा देणारे आदिवासी, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि सध्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्यासह पालिकेचे अभियंता गोसावी यांचेही आव्हाड यांनी विशेष आभार मानले. वाघोबानगरवासियांनी पहिल्याच वेळी आपल्याला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणले. त्यामुळेच या भागातील विकास कामांकडे लक्ष देणे आपले कर्तव्य असल्याचेही ते म्हणाले. या भागातील रहिवाशांसाठी पाणी, रस्ते अशा सर्वच मुलभूत सुविधा पुरविल्या जातील. त्यामुळे तुमच्या घरांच्या किंमती निश्चितच वाढतील, परंतू आपली घरे विकून पुन्हा दूसरीकडे झोपडया बांधू नका, असा कळकळीचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तुमच्याकडे येत्या महिनाभरात पाणी येईल, फक्त आशिर्वादाचा हात असू द्या, असे आवाहन त्यांनी केले. 

केवळ विकासाचे काममते मिळाली नाही म्हणून पाणी बंद करण्याचे घाणोरडे राजकारण आपण कधीच केले नाही. परंतू, असे प्रकार भास्करनगर, पौंडपाडा भागात घडतात. पाण्याचे वॉल्व बंद करुन आणि शौचालयांना लॉक लावण्याचे राजकारण कधीच केले नाही. लोक घाबरुन मते देतीलही परंतू, त्यांचे आशिर्वाद मिळणार नाहीत, असेही ते म्हणाले. आता असे व्हॉल्व बंद होणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या शिवसैनिकांनी केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेशशिवसेनेचे शाखाप्रमुख अंकुश गुरव, अक्षय अंकुश गुरव, उपशाखाप्रमुख रामआवतार यादव, संजय चौगुले, इस्माईल हक, दिलीप रजक, राहूल सिंग, संदीप शर्मा, नितेश गौड, राहूल दुबे आणि दीपक राजभर आणि राजेश राजभर या शिवसैनिकांनी आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

गणेश भगत यांचा विशेष सत्कारपाण्याच्या टाकीसाठी जागा देणारे गणेश भगत यांचाही यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेस