शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

जव्हार, विक्रमगडला पावसाने झोडपले

By admin | Updated: June 2, 2017 04:55 IST

गुरुवारी वरूणराजाने जव्हार, विक्रमगड, मनोरला झोडपून काढले. ७ जूनला हजेरी लावणरा पाऊस जूनच्या पहिल्या तारखेलाच

हुसेन मेमन / लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : गुरुवारी वरूणराजाने जव्हार, विक्रमगड, मनोरला झोडपून काढले. ७ जूनला हजेरी लावणरा पाऊस जूनच्या पहिल्या तारखेलाच ढगांच्या गडगडाटासह दुपारी ४ च्या सुमारास बरसल्याने जव्हार शहरात सर्वत्र दाणादाण उडाली. दुपार पर्यत उन्हाचा कडका इतका जोरात होता की, लोक पाऊस कधी पडेल याची वाट बघत होते, मात्र दुपारी पावसाने जोर पकडून अचानक वर्षाव केला व ठिकठिकाणी पत्र्यांच्या, कौलांच्या, कुडामातीच्या घरांवर प्लॅस्टीक टाकण्याची गडबड सुरू झाली. दरम्यान बालचमूंनी पहिल्या पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला. बघता बघता नाले, गटारे, रस्ते वाहू लागले, अचानक पडलेल्या पावसामुळे मोटारसायकलस्वार व पादचाऱ्यांचे छत्री व रेनकोट नसल्यामुळे मोठे हाल झाले. थोड्याच वेळात शहरात आल्हाददायक वातवरण निर्माण होऊन गारवा निर्माण झाला. मात्र नेहमीप्रमाणे पाऊस सुरू होताच वीज गुल झाली. त्यामुळेही हाल झाले. पावसाची संततधार तासाभर सुरू होती. पालघर जिल्ह्यातील सुप्रसिध्द थंड हवेचे ठिकाण म्हणून जव्हारचा खास उल्लेख करण्यात येतो. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या गावाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या परिसरात अनेक धबधबे आहेत. तालुक्याच्या आजूबाजूला दाभोसा धबधबा, काळमांडवी सारखे मोठे मोठे धबधबे असल्यामुळे येथे दरवर्षी पाऊस सुरू झाल्यावर पर्यटकांची गर्दी होते.विक्र मगडमध्ये ; वादळी वारे-विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसविक्र मगड : केरळ मधे मान्सूनचे आगमन झाल्याच्या पाठोपाठ गुरूवारी विक्र मगड मध्ये जोरदार वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने दणका दिल्याने बेसावध असलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पाऊस ७ जून नंतर येणार या समजात असलेल्या अनेकांनी आपल्या घरांची शाकारणी, कौले चाळणे, डांबर भरणे, प्लॅस्टिक अंथरणे अशी कामे केलेली नव्हती. त्यांची आज एकच धांदल उडाली. मात्र या पावसाचा आगमनाने शेतकरी वर्ग आनंदीत झाला आहे. गेली दोन वर्षे अनियमित बरसणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले होते. परंतु या वर्षी मान्सूनने वेळेत बरसण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुढचे चार महीने देखील अशीच परिस्थिती राहावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. वादळी वाऱ्यासह अचानक मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे वीटभट्टी व्यावसाईक, गवतपावली व्यावसायिक याचा माल भिजला. ही बाब त्यांचासाठी चिंतेची ठरली आहे. तर निसर्गाच्या लहरीपणामुळे लांबलेल्या आंबा हंगामामुळे बागायतदारांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.पावसामुळे हवेत गरवा निर्माण झाल्याने उन व उकाड्याने त्रासलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर पावसाचे आगमन होताच महावितरणचा भोंगळ कारभार सुरु झाला असून वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.