शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

जव्हार, विक्रमगडला पावसाने झोडपले

By admin | Updated: June 2, 2017 04:55 IST

गुरुवारी वरूणराजाने जव्हार, विक्रमगड, मनोरला झोडपून काढले. ७ जूनला हजेरी लावणरा पाऊस जूनच्या पहिल्या तारखेलाच

हुसेन मेमन / लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : गुरुवारी वरूणराजाने जव्हार, विक्रमगड, मनोरला झोडपून काढले. ७ जूनला हजेरी लावणरा पाऊस जूनच्या पहिल्या तारखेलाच ढगांच्या गडगडाटासह दुपारी ४ च्या सुमारास बरसल्याने जव्हार शहरात सर्वत्र दाणादाण उडाली. दुपार पर्यत उन्हाचा कडका इतका जोरात होता की, लोक पाऊस कधी पडेल याची वाट बघत होते, मात्र दुपारी पावसाने जोर पकडून अचानक वर्षाव केला व ठिकठिकाणी पत्र्यांच्या, कौलांच्या, कुडामातीच्या घरांवर प्लॅस्टीक टाकण्याची गडबड सुरू झाली. दरम्यान बालचमूंनी पहिल्या पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला. बघता बघता नाले, गटारे, रस्ते वाहू लागले, अचानक पडलेल्या पावसामुळे मोटारसायकलस्वार व पादचाऱ्यांचे छत्री व रेनकोट नसल्यामुळे मोठे हाल झाले. थोड्याच वेळात शहरात आल्हाददायक वातवरण निर्माण होऊन गारवा निर्माण झाला. मात्र नेहमीप्रमाणे पाऊस सुरू होताच वीज गुल झाली. त्यामुळेही हाल झाले. पावसाची संततधार तासाभर सुरू होती. पालघर जिल्ह्यातील सुप्रसिध्द थंड हवेचे ठिकाण म्हणून जव्हारचा खास उल्लेख करण्यात येतो. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या गावाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या परिसरात अनेक धबधबे आहेत. तालुक्याच्या आजूबाजूला दाभोसा धबधबा, काळमांडवी सारखे मोठे मोठे धबधबे असल्यामुळे येथे दरवर्षी पाऊस सुरू झाल्यावर पर्यटकांची गर्दी होते.विक्र मगडमध्ये ; वादळी वारे-विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसविक्र मगड : केरळ मधे मान्सूनचे आगमन झाल्याच्या पाठोपाठ गुरूवारी विक्र मगड मध्ये जोरदार वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने दणका दिल्याने बेसावध असलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पाऊस ७ जून नंतर येणार या समजात असलेल्या अनेकांनी आपल्या घरांची शाकारणी, कौले चाळणे, डांबर भरणे, प्लॅस्टिक अंथरणे अशी कामे केलेली नव्हती. त्यांची आज एकच धांदल उडाली. मात्र या पावसाचा आगमनाने शेतकरी वर्ग आनंदीत झाला आहे. गेली दोन वर्षे अनियमित बरसणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले होते. परंतु या वर्षी मान्सूनने वेळेत बरसण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुढचे चार महीने देखील अशीच परिस्थिती राहावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. वादळी वाऱ्यासह अचानक मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे वीटभट्टी व्यावसाईक, गवतपावली व्यावसायिक याचा माल भिजला. ही बाब त्यांचासाठी चिंतेची ठरली आहे. तर निसर्गाच्या लहरीपणामुळे लांबलेल्या आंबा हंगामामुळे बागायतदारांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.पावसामुळे हवेत गरवा निर्माण झाल्याने उन व उकाड्याने त्रासलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर पावसाचे आगमन होताच महावितरणचा भोंगळ कारभार सुरु झाला असून वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.