शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

जव्हार, विक्रमगडला पावसाने झोडपले

By admin | Updated: June 2, 2017 04:55 IST

गुरुवारी वरूणराजाने जव्हार, विक्रमगड, मनोरला झोडपून काढले. ७ जूनला हजेरी लावणरा पाऊस जूनच्या पहिल्या तारखेलाच

हुसेन मेमन / लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : गुरुवारी वरूणराजाने जव्हार, विक्रमगड, मनोरला झोडपून काढले. ७ जूनला हजेरी लावणरा पाऊस जूनच्या पहिल्या तारखेलाच ढगांच्या गडगडाटासह दुपारी ४ च्या सुमारास बरसल्याने जव्हार शहरात सर्वत्र दाणादाण उडाली. दुपार पर्यत उन्हाचा कडका इतका जोरात होता की, लोक पाऊस कधी पडेल याची वाट बघत होते, मात्र दुपारी पावसाने जोर पकडून अचानक वर्षाव केला व ठिकठिकाणी पत्र्यांच्या, कौलांच्या, कुडामातीच्या घरांवर प्लॅस्टीक टाकण्याची गडबड सुरू झाली. दरम्यान बालचमूंनी पहिल्या पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला. बघता बघता नाले, गटारे, रस्ते वाहू लागले, अचानक पडलेल्या पावसामुळे मोटारसायकलस्वार व पादचाऱ्यांचे छत्री व रेनकोट नसल्यामुळे मोठे हाल झाले. थोड्याच वेळात शहरात आल्हाददायक वातवरण निर्माण होऊन गारवा निर्माण झाला. मात्र नेहमीप्रमाणे पाऊस सुरू होताच वीज गुल झाली. त्यामुळेही हाल झाले. पावसाची संततधार तासाभर सुरू होती. पालघर जिल्ह्यातील सुप्रसिध्द थंड हवेचे ठिकाण म्हणून जव्हारचा खास उल्लेख करण्यात येतो. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या गावाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या परिसरात अनेक धबधबे आहेत. तालुक्याच्या आजूबाजूला दाभोसा धबधबा, काळमांडवी सारखे मोठे मोठे धबधबे असल्यामुळे येथे दरवर्षी पाऊस सुरू झाल्यावर पर्यटकांची गर्दी होते.विक्र मगडमध्ये ; वादळी वारे-विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसविक्र मगड : केरळ मधे मान्सूनचे आगमन झाल्याच्या पाठोपाठ गुरूवारी विक्र मगड मध्ये जोरदार वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने दणका दिल्याने बेसावध असलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पाऊस ७ जून नंतर येणार या समजात असलेल्या अनेकांनी आपल्या घरांची शाकारणी, कौले चाळणे, डांबर भरणे, प्लॅस्टिक अंथरणे अशी कामे केलेली नव्हती. त्यांची आज एकच धांदल उडाली. मात्र या पावसाचा आगमनाने शेतकरी वर्ग आनंदीत झाला आहे. गेली दोन वर्षे अनियमित बरसणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले होते. परंतु या वर्षी मान्सूनने वेळेत बरसण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुढचे चार महीने देखील अशीच परिस्थिती राहावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. वादळी वाऱ्यासह अचानक मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे वीटभट्टी व्यावसाईक, गवतपावली व्यावसायिक याचा माल भिजला. ही बाब त्यांचासाठी चिंतेची ठरली आहे. तर निसर्गाच्या लहरीपणामुळे लांबलेल्या आंबा हंगामामुळे बागायतदारांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.पावसामुळे हवेत गरवा निर्माण झाल्याने उन व उकाड्याने त्रासलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर पावसाचे आगमन होताच महावितरणचा भोंगळ कारभार सुरु झाला असून वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.