शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आला पावसाळा, पोट सांभाळा, बाहेरचे खाणे टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सर्वच भागांत जवळपास पावसाळा सक्रिय झाला आहे. अनेक दिवसांनंतर हॉटेलही उघडले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सर्वच भागांत जवळपास पावसाळा सक्रिय झाला आहे. अनेक दिवसांनंतर हॉटेलही उघडले आहेत. त्यामुळे अशा वातावरणात जिभेचे चोचलेदेखील वाढू लागतात; परंतु पावसाळ्यात उघड्यावरील खाणे टाळावे, तेलकट, मसालेदार, खाणे टाळावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यातही वातावरणात होणाऱ्या बदलामुळे पचनशक्तीवरदेखील परिणाम झालेला असतो. त्यामुळे शक्यतो घरीच बनविलेले अन्न खावे, असेही सांगण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्यात पावसाळी वातावरण झाले आहे. त्यामुळे आता खाण्याचेही बेत चांगलेच रंगत असतात. थंड वातावरणात गरमागरम खाण्याची प्रत्येकाची इच्छा होत असते. त्यामुळे उघड्यावर मिळणारे किंवा हॉटेलमध्ये जाऊन गरमागरम वडापाव, भजी, असे पदार्थ हमखास पावसाळ्यात प्रत्येकाच्या खाण्यात येत असतात. घरीदेखील तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ खाण्यासाठी प्रत्येकाची जीभ सज्ज असते; परंतु पावसाळ्यात वातावरण बदल होत असल्याने त्याचा मानवी शरीरावर म्हणजेच पचनसंस्थेवरदेखील परिणाम झालेला असतो. अशा वेळेस हे पदार्थ खाल्ल्यास ते पचण्यासाठी जड जातात. त्यातूनच आजाराला निमंत्रण मिळत असते. पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, टायफाइड, कावीळ हे आजार पसरत असतात. वातावरणात माशा पसरल्याने त्यातून अनेक आजार होत असतात. त्यामुळेच घरचे स्वच्छ अन्न आणि हलक्या स्वरूपाचे अन्नच खावे, असे आवाहन आहारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

पावसाळ्यात हे खायला हवे

अ - जून धान्य खावे

ब - जिल्ह्यात रानभाज्या उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे त्या भाज्या खाव्यात.

क - सूप प्यावे, सैंदव मीठ वापरावे.

ड - लाल भात, साकळेचा भात, हलके अन्न खावे.

पावसाळ्यात हे खाणे टाळायला हवे

अ - उघड्यावरील खाणे टाळावे, पालेभाज्या खाणे टाळावे, मेथी, शेपी, पालक आदी.

ब - समोसा, वडापाव, पाणीपुरी, पिझ्झा आदींसह इतर पदार्थ.

क - मसालेदार पदार्थ.

ड - तेलकट पदार्थ, काकडी, खरबूज, पनीर आदी टाळावे.

रस्त्यावरचे अन्न नकोच

पावसाळा सुरू झाल्याने वातावरण दमट असते. त्यामुळे माशांचे प्रमाण अशा काळात वाढत असते. याच माशा उघड्यावरील पदार्थांवर जाऊन बसतात आणि तेच पदार्थ आपण खात असतो. त्यातूनच आपण स्वत:हून विविध आजारांना निमंत्रण देत असतो. त्यामुळे उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावेच.

...........

पावसाळ्यात झालेल्या वातावरण बदलाचा परिणाम मानवाच्या पचन क्षमतेवरदेखील होत असतो. त्यामुळे तेलकट, मसालेदार किंवा उघड्यावरील पदार्थ खाल्ल्यास ते पचण्यासही जड जातात. त्यामुळे घरी बनविलेले स्वच्छ, हलके पदार्थच खावेत आणि आरोग्याची काळजी घ्यावी.

(डॉ. प्रिया गुरव - आहारतज्ज्ञ, जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे)

पावसाळ्यात वात वाढत असतो, पावसाचे पाणी जमिनीवर पडल्याने, ते दूषित होत असते. तेच पाणी न उकळता, गाळून न घेता, शरीरात गेल्यास, त्यामुळे भूक न लागणे, अजीर्ण, जुलाब, कावीळ, वाताचे आजारही पावसात होत असतात. यकृत विकार, ताप, सर्दी, खोकला, असे विकार वाढतात. त्यामुळे शक्यतो आपण नवीन अन्न म्हणजेच बाहेरचे खाणे टाळावे, पालेभाज्या उदाहरणार्थ मेथी, शेपू, पालक खाणे टाळावे. तेलकट मसालेदार पदार्थ खाणे टाळावे, थंड पदार्थ खाणे टाळावे, थंडी एसीत झोपू नये, दिवसा झोपणे टाळावे, अति व्यायाम करू नये, तर पावसाळ्यात जून धान्य खावे, लाल तांदूळ, साकेसाळीचा भात, गहू, ज्वारी, फुलके, उडीद, मूग खावे, सुके कपडे वापरावेत, अंगाला तेलाची मालिश करावी. उटण्याचा वापर करावा, उकळून गार केलेले पाणी प्यावे, कडक गरम पाण्याने अंघोळ करावी, अशी महत्त्वाची पथ्ये पाळावीत.

(डॉ. हर्षद भोसले, एम.डी. आयुर्वेद)