शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

आला पावसाळा, पोट सांभाळा, बाहेरचे खाणे टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सर्वच भागांत जवळपास पावसाळा सक्रिय झाला आहे. अनेक दिवसांनंतर हॉटेलही उघडले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सर्वच भागांत जवळपास पावसाळा सक्रिय झाला आहे. अनेक दिवसांनंतर हॉटेलही उघडले आहेत. त्यामुळे अशा वातावरणात जिभेचे चोचलेदेखील वाढू लागतात; परंतु पावसाळ्यात उघड्यावरील खाणे टाळावे, तेलकट, मसालेदार, खाणे टाळावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यातही वातावरणात होणाऱ्या बदलामुळे पचनशक्तीवरदेखील परिणाम झालेला असतो. त्यामुळे शक्यतो घरीच बनविलेले अन्न खावे, असेही सांगण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्यात पावसाळी वातावरण झाले आहे. त्यामुळे आता खाण्याचेही बेत चांगलेच रंगत असतात. थंड वातावरणात गरमागरम खाण्याची प्रत्येकाची इच्छा होत असते. त्यामुळे उघड्यावर मिळणारे किंवा हॉटेलमध्ये जाऊन गरमागरम वडापाव, भजी, असे पदार्थ हमखास पावसाळ्यात प्रत्येकाच्या खाण्यात येत असतात. घरीदेखील तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ खाण्यासाठी प्रत्येकाची जीभ सज्ज असते; परंतु पावसाळ्यात वातावरण बदल होत असल्याने त्याचा मानवी शरीरावर म्हणजेच पचनसंस्थेवरदेखील परिणाम झालेला असतो. अशा वेळेस हे पदार्थ खाल्ल्यास ते पचण्यासाठी जड जातात. त्यातूनच आजाराला निमंत्रण मिळत असते. पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, टायफाइड, कावीळ हे आजार पसरत असतात. वातावरणात माशा पसरल्याने त्यातून अनेक आजार होत असतात. त्यामुळेच घरचे स्वच्छ अन्न आणि हलक्या स्वरूपाचे अन्नच खावे, असे आवाहन आहारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

पावसाळ्यात हे खायला हवे

अ - जून धान्य खावे

ब - जिल्ह्यात रानभाज्या उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे त्या भाज्या खाव्यात.

क - सूप प्यावे, सैंदव मीठ वापरावे.

ड - लाल भात, साकळेचा भात, हलके अन्न खावे.

पावसाळ्यात हे खाणे टाळायला हवे

अ - उघड्यावरील खाणे टाळावे, पालेभाज्या खाणे टाळावे, मेथी, शेपी, पालक आदी.

ब - समोसा, वडापाव, पाणीपुरी, पिझ्झा आदींसह इतर पदार्थ.

क - मसालेदार पदार्थ.

ड - तेलकट पदार्थ, काकडी, खरबूज, पनीर आदी टाळावे.

रस्त्यावरचे अन्न नकोच

पावसाळा सुरू झाल्याने वातावरण दमट असते. त्यामुळे माशांचे प्रमाण अशा काळात वाढत असते. याच माशा उघड्यावरील पदार्थांवर जाऊन बसतात आणि तेच पदार्थ आपण खात असतो. त्यातूनच आपण स्वत:हून विविध आजारांना निमंत्रण देत असतो. त्यामुळे उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावेच.

...........

पावसाळ्यात झालेल्या वातावरण बदलाचा परिणाम मानवाच्या पचन क्षमतेवरदेखील होत असतो. त्यामुळे तेलकट, मसालेदार किंवा उघड्यावरील पदार्थ खाल्ल्यास ते पचण्यासही जड जातात. त्यामुळे घरी बनविलेले स्वच्छ, हलके पदार्थच खावेत आणि आरोग्याची काळजी घ्यावी.

(डॉ. प्रिया गुरव - आहारतज्ज्ञ, जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे)

पावसाळ्यात वात वाढत असतो, पावसाचे पाणी जमिनीवर पडल्याने, ते दूषित होत असते. तेच पाणी न उकळता, गाळून न घेता, शरीरात गेल्यास, त्यामुळे भूक न लागणे, अजीर्ण, जुलाब, कावीळ, वाताचे आजारही पावसात होत असतात. यकृत विकार, ताप, सर्दी, खोकला, असे विकार वाढतात. त्यामुळे शक्यतो आपण नवीन अन्न म्हणजेच बाहेरचे खाणे टाळावे, पालेभाज्या उदाहरणार्थ मेथी, शेपू, पालक खाणे टाळावे. तेलकट मसालेदार पदार्थ खाणे टाळावे, थंड पदार्थ खाणे टाळावे, थंडी एसीत झोपू नये, दिवसा झोपणे टाळावे, अति व्यायाम करू नये, तर पावसाळ्यात जून धान्य खावे, लाल तांदूळ, साकेसाळीचा भात, गहू, ज्वारी, फुलके, उडीद, मूग खावे, सुके कपडे वापरावेत, अंगाला तेलाची मालिश करावी. उटण्याचा वापर करावा, उकळून गार केलेले पाणी प्यावे, कडक गरम पाण्याने अंघोळ करावी, अशी महत्त्वाची पथ्ये पाळावीत.

(डॉ. हर्षद भोसले, एम.डी. आयुर्वेद)