शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

पोलिसांच्या भीतीने नियम पाळणे ही दुर्दैवाची बाब! गिरीश ओक यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 01:00 IST

Traffic News : वाहतुकीचे नियम स्वतःच्या सुरक्षेसाठी असले, तरी अनेक जण पोलिसांच्या भीतिपोटी नियम पाळतात. नियमांच्या अगोदर स्वतःची सुरक्षा महत्त्वाची आहे.

ठाणे - वाहतुकीचे नियम स्वतःच्या सुरक्षेसाठी असले, तरी अनेक जण पोलिसांच्या भीतिपोटी नियम पाळतात. नियमांच्या अगोदर स्वतःची सुरक्षा महत्त्वाची आहे. परदेशात गेल्यावर आपण तिथले वाहतूक नियम स्वतःहून पाळतो, पण आपल्या देशात मात्र नियमांकडे दुर्लक्ष करतो. रस्त्यावर पोलीस दिसल्यावर पटकन हेल्मेट परिधान करून नंतर पुढे गेल्यावर लगेचच काढतो, हा प्रकार दुर्दैवी असल्याची खंत ज्येष्ठ अभिनेते डॉ.गिरीश ओक यांनी व्यक्त केली.ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने ३२व्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान कार्यक्रमानिमित्त महिला पुरुष बाइकरॅलीचे आयोजन केले होत. त्यावेळी बोलताना डॉ.गिरीश ओक यांनी वाहतुकीचे नियम पाळणे किती महत्त्वाचे, यावर भाष्य केले. यावेळी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून ते स्वत: सामील झाले होते. शनिवारी सकाळी ८.३०च्या सुमारास रॅलीला सुरुवात झाली. मर्फी येथील आरटीओ कार्यालय येथून रॅलीला प्रारंभ झाला पुढे, नितीन जंक्शन, कोर्ट नाका, तलावपाळी, तीनहात नाका, पासपोर्ट ऑफिस, उपवन, हिरानंदानी इस्टेटमार्गे मर्फी ऑफिस असा ३० किलोमीटरचा टप्पा या रॅलीने पार केला.२०० दुचाकीस्वारांनी घेतला सहभागरॅलीत सुमारे २०० दुचाकीस्वार सहभागी झाले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे यांनी दिली. रस्ते सुरक्षा अभियान हे केवळ ठरावीक कालावधीपुरते नसून, ते आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळूनच कायम वाहने चालविली पाहिजेत, असा संदेश या रॅलीदरम्यान दिल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील म्हणाले. 

टॅग्स :thaneठाणेroad safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडीGirish oakगिरिश ओक