शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

देशात पोलिसांच्या भीतीने नियम पाळणे हे दुदैव, डॉ. गिरीश ओक यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 12:43 IST

ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने ३२ व्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान कार्यक्रमा निमित्त महिला पुरुष बाईकरॅलीचे आयोजन केल होत. त्यावेळी बोलताना डॉ गिरीश ओक यांनी वाहतुकीचे नियम पाळणे किती महत्वाचे यावर भाष्य केले

ठाणे :  वाहतुकीचे नियम स्वतःच्या सुरक्षेसाठी असले तरी अनेकजण पोलिसांच्या भीतीपोटी नियम पाळतात. नियमांच्या अगोदर स्वतःची सुरक्षा महत्वाची आहे. परदेशात गेल्यावर आपण तिथले वाहूतुकीचे नियम स्वतःहुन पाळतो. पण  आपल्या देशात मात्र नियमाकडे दुर्लक्ष करतो.रस्त्यावर पोलीस दिसल्यावर पटकन हेल्मेट परिधान करतो आणि नंतर पुढे गेल्यावर लगेचच काढतो हा प्रकार दुर्दैवी असल्याची खंत ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी व्यक्त केली. 

ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने ३२ व्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान कार्यक्रमा निमित्त महिला पुरुष बाईकरॅलीचे आयोजन केल होत. त्यावेळी बोलताना डॉ गिरीश ओक यांनी वाहतुकीचे नियम पाळणे किती महत्वाचे यावर भाष्य केले. यावेळी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून डॉ. गिरीश ओक यांनी स्वतः रॅलीत सामील झाले होते.  शनिवारी सकाळी ८.३० च्या सुमारास रॅलीला सुरुवात झाली. मर्फी येथील आरटीओ कार्यालय येथून रॅलीला प्रारंभ झाला पुढे, नितीन जंक्शन, कोर्टनाका, तलावपाळी, तिनहात नाका, पासपोर्ट ऑफिस, उपवन, हिरानंदानी इस्टेट मार्गे मर्फी ऑफिस असा ३० किलोमीटरचा टप्पा या रॅलीने  पार केला. या रॅलीत सुमारे 200 दुचाकीस्वार सहभागी झाले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वभंर शिंदे यांनी दिली.

रस्ते सुरक्षा अभियान हे केवळ ठराविक कालावधीपुरते नसून ते आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाने वाहतुक़ीचे नियम पाळूनच कायम वाहने चालविली पाहिजेत असा संदेश या रॅली दरम्यान देण्यात आला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील म्हणाले.

टॅग्स :Girish oakगिरिश ओकthaneठाणेPoliceपोलिस