शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

देशात पोलिसांच्या भीतीने नियम पाळणे हे दुदैव, डॉ. गिरीश ओक यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 12:43 IST

ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने ३२ व्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान कार्यक्रमा निमित्त महिला पुरुष बाईकरॅलीचे आयोजन केल होत. त्यावेळी बोलताना डॉ गिरीश ओक यांनी वाहतुकीचे नियम पाळणे किती महत्वाचे यावर भाष्य केले

ठाणे :  वाहतुकीचे नियम स्वतःच्या सुरक्षेसाठी असले तरी अनेकजण पोलिसांच्या भीतीपोटी नियम पाळतात. नियमांच्या अगोदर स्वतःची सुरक्षा महत्वाची आहे. परदेशात गेल्यावर आपण तिथले वाहूतुकीचे नियम स्वतःहुन पाळतो. पण  आपल्या देशात मात्र नियमाकडे दुर्लक्ष करतो.रस्त्यावर पोलीस दिसल्यावर पटकन हेल्मेट परिधान करतो आणि नंतर पुढे गेल्यावर लगेचच काढतो हा प्रकार दुर्दैवी असल्याची खंत ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी व्यक्त केली. 

ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने ३२ व्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान कार्यक्रमा निमित्त महिला पुरुष बाईकरॅलीचे आयोजन केल होत. त्यावेळी बोलताना डॉ गिरीश ओक यांनी वाहतुकीचे नियम पाळणे किती महत्वाचे यावर भाष्य केले. यावेळी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून डॉ. गिरीश ओक यांनी स्वतः रॅलीत सामील झाले होते.  शनिवारी सकाळी ८.३० च्या सुमारास रॅलीला सुरुवात झाली. मर्फी येथील आरटीओ कार्यालय येथून रॅलीला प्रारंभ झाला पुढे, नितीन जंक्शन, कोर्टनाका, तलावपाळी, तिनहात नाका, पासपोर्ट ऑफिस, उपवन, हिरानंदानी इस्टेट मार्गे मर्फी ऑफिस असा ३० किलोमीटरचा टप्पा या रॅलीने  पार केला. या रॅलीत सुमारे 200 दुचाकीस्वार सहभागी झाले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वभंर शिंदे यांनी दिली.

रस्ते सुरक्षा अभियान हे केवळ ठराविक कालावधीपुरते नसून ते आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाने वाहतुक़ीचे नियम पाळूनच कायम वाहने चालविली पाहिजेत असा संदेश या रॅली दरम्यान देण्यात आला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील म्हणाले.

टॅग्स :Girish oakगिरिश ओकthaneठाणेPoliceपोलिस