शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
2
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
3
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
4
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मृत मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
5
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
6
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' सरकारी बँकेचे आणखी शेअर खरेदी केले, LIC चाही मोठा डाव; करतोय मालामाल!
9
गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान
10
Cough Syrup : "कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "
11
'या' अभिनेत्रीला आदर्श मानते 'सैयारा' गर्ल अनीत पड्डा; म्हणाली, "रिलीजनंतर १० मिनिटं तिच्याशी..."
12
भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास?
13
"मी माझ्या भावाचा मृतदेह स्वतःच्या हाताने बाहेर काढला", प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
14
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!
15
हरमनप्रीत कौरचे तेवर! नजरेने धाक दाखवणारी पाकिस्तानी खेळाडू खाली मान घालून पळाली (VIDEO)
16
Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी
17
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
18
Indian shot dead: "मित्रा, तू बरा आहेस ना?" मदतीसाठी आलेल्या भारतीय व्यक्तीचीच गोळी घालून हत्या
19
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
20
VIRAL : 'सर डोकं दुखतंय...', कर्मचारी आजारी तरीही मॅनेजर सुट्टी देईना! संतापलेल्या तरुणानं काय केलं बघाच  

हा ब्रह्मराक्षस बाटलीबंद होणे आता अशक्यच !

By संदीप प्रधान | Updated: October 6, 2025 09:20 IST

भारतासारख्या बेरोजगारांच्या देशात थोड्या पैशांकरिता ट्रोलिंग करणारे पायलीला पन्नास तयार असतात हे नेते, पक्ष यांना कळल्याने सोशल मीडिया बदनामीच्या पोस्टनी ठासून भरला.

- संदीप प्रधान, सहयाेगी संपादक

काँग्रेसचे जुने पदाधिकारी प्रकाश तथा मामा पगारे हे सोशल मीडिया उदयाला येण्यापूर्वीच्या पिढीचे गृहस्थ. सोशल मीडियावर पाहिलेली प्रत्येक गोष्ट फॉरवर्ड करायची नसते हा धडा त्यांना आता मिळाला असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतची आक्षेपार्ह पोस्ट त्यांनी फॉरवर्ड केली. ती पाहताच भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब व कार्यकर्त्यांचे पित्त खवळले व त्यांनी पगारे यांना भररस्त्यात गाठून साडी नेसवली. आता परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. एक गोष्ट निश्चित आहे की, सोशल मीडियावर परस्परांच्या बदनामीचा जो पूर आला आहे तो राजकीय, सामाजिक जीवनातील सौहार्द धुऊन टाकणारा आहे. एआय जसजसे विकसित होईल तसतसे नेत्यांचे फोटो, व्हिडीओ, आवाज यांचा वापर करून सध्या निर्माण होतोय त्यापेक्षा भयंकर बदनामीकारक, दंगल घडवणारा कन्टेंट निर्माण करण्याची क्षमता सर्वच पक्षांना, संघटनांना अल्पावधीत प्राप्त होणार आहे. परिणामी परस्परांच्या बदनामीचा भस्मासुर आता बाटलीबंद करणे अशक्य आहे.

२०१४ ची लोकसभा निवडणूक झाली त्यापूर्वी म्हणजे २०१२ पासून सोशल मीडियावरील राजकीय पोस्ट अधिक धारदार होऊ लागल्या. २०१४ मध्ये तर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासारख्या विद्वान व्यक्तीला काँग्रेस हायकमांडचे मिंधे असल्याचे दाखविण्याकरिता अत्यंत हिणकस पोस्ट व्हायरल केल्या गेल्या. देशभरात ३३ लाखांहून अधिक व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून हा काँग्रेसविरोधी प्रचार घरोघरी पोहोचला. मामा पगारे यांनी कदाचित त्यातील काही पोस्ट पाहिल्या असतील. त्यांचे पित्त तेव्हा खवळले असेल. या आक्रमणाचा मुकाबला कसा करायचा या विचाराने ते त्रस्त झाले असतील; मात्र अल्पावधीत अन्य राजकीय पक्षांनाही सोशल मीडियाचे शस्त्र कसे परजायचे हे उमजले. मग बॉलिवूडच्या चित्रपटात असते तशी देमार हाणामारी फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर, यू-ट्यूबवर सुरू झाली. नेत्यांच्या मागे ट्रोलर्सच्या टोळ्या सोडण्यात आल्या. ट्रोलर्सला नेमून दिलेल्या नेत्याने ट्वीट केले की, त्याखाली विचित्र नावाने, फोटोंसह रजिस्टर्ड अकाउंटवरून शिवराळ कमेंटचा पाऊस पडू लागला. फेसबुक लाइव्ह करताना काही नेत्यांना कमेंट पाहून पळ काढावा लागला. फेसबुकवरही धोतर फेडण्याची व लुगडी ओढण्याची स्पर्धा लागली.

भारतासारख्या बेरोजगारांच्या देशात थोड्या पैशांकरिता ट्रोलिंग करणारे पायलीला पन्नास तयार असतात हे नेते, पक्ष यांना कळल्याने सोशल मीडिया बदनामीच्या पोस्टनी ठासून भरला. सोशल मीडियाशी मुख्य धारेतील माध्यमांची स्पर्धा असल्याने वाहिन्यांनीही समाजातील गणंग गोळा करून अमुक विरुद्ध तमुक अशा भांडकुदळ जोड्यांच्या झुंजी लावल्या. मग कुणी बाइट देताना थुंकतोय, शिव्या घालतोय. कुणी कुणाच्या आई-वडिलांचा उद्धार करतोय, अशा उथळपणाला ऊत आला. यात पगारे यांचेच काय कुणाचेही माथे फिरणे स्वाभाविक आहे.

एआयचा वापर करून होणारी सोशल मीडियावरील निर्मिती हा तर महाब्रह्मराक्षस ठरणार आहे. नेत्यांचे व्हिडीओ, फोटो, आवाज याचा वापर करून पोर्नपासून दंगे भडकवणाऱ्या भाषणांचा शंभर टक्के बनावट मात्र अस्सल वाटणारा कन्टेंट तयार करता येईल. खरे आणि खोटे यातील सीमारेषा पुसली जाणार आहे. २०१४ मध्ये पेटलेली ही वात सारे काही भस्मसात केल्याखेरीज थांबणार नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Social media's genie of defamation can't be put back in bottle.

Web Summary : Social media's negativity, fueled by AI, threatens social harmony. Political rivalry has intensified, with rampant trolling and fake content creation. The line between truth and falsehood blurs, potentially inciting unrest.
टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस