शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

‘गुलाबी’ च्या वाटपावर अनिश्चिततेचे सावट; पालिकेच्या आवारातील रिक्षांना घातले पांघरुन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 17:03 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीमार्फत ८ मार्चच्या जागतिक महिला दिनावेळी शहरातील १० महिलांना गुलाबी रिक्षांचे वाटप करण्यात आले होते. परंतु, वाटपाचे धोरण व नोंदणी अभावी वाटप केलेल्या रिक्षा त्याच दिवशी काढून घेत त्या पालिका मुख्यालयात आणून उभ्या करण्यात आल्या आहेत.

- राजू काळे 

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीमार्फत ८ मार्चच्या जागतिक महिला दिनावेळी शहरातील १० महिलांना गुलाबी रिक्षांचे वाटप करण्यात आले होते. परंतु, वाटपाचे धोरण व नोंदणी अभावी वाटप केलेल्या रिक्षा त्याच दिवशी काढून घेत त्या पालिका मुख्यालयात आणून उभ्या करण्यात आल्या आहेत. यामुळे एकूण १०० रिक्षांच्या वाटपावर अनिश्चिततेचे सावट घोंगावू लागल्याने गेल्या २२ दिवसांपासून उभ्या असलेल्या रिक्षा खराब होऊ नये, यासाठी त्या झाकण्यात आल्या आहेत. यातून भाजपा सत्ताधाऱ्यांनी केलेला उतावीळपणा चव्हाट्यावर येऊ लागल्याने लाभार्थी महिलांमध्ये नाराजी पसरली आहे.

शहरातील दारिद्रय रेषेखालील महिलांना स्वयंरोजगार निर्माण करुन देण्यासाठी महिला व बाल कल्याण समितीने पालिकेच्या अनुदानातून  १०० गुलाबी रिक्षांचे मोफत वाटप करण्याचा निर्णय घेत तसा ठराव २० फेब्रुवारीच्या महासभेत मंजूर करण्यात आला. कालांतराने या रिक्षा मोफत नसून त्या लाभार्थी महिलांच्याच स्वखर्चातून वाटल्या जाणार असल्याचे उघड  झाले. पालिकेच्या समाजविकास विभागाकडून मोफत प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध असल्याने सुरुवातीच्या १० लाभार्थी महिलांकडून प्रशिक्षणाखेरीज लायसन्स, परमिटसह काही आवश्यक किरकोळ खर्चासाठी प्रत्येकी २५ हजार रुपये वसूल करण्यात आले. त्या लाभार्थी महिलांनी देखील रिक्षा मिळविण्यासाठी वाटपाअगोदरच प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षण पूर्ण झालेल्या त्या महिलांना ८ मार्चच्या जागतिक महिला दिनाला रिक्षांचे गाजतवाजत वाटप करण्यात आले. त्यावेळी त्या रिक्षांची नोंदणी प्रादेशिक परिवहन विभागात झाली नसल्याने वाटप केलेल्या रिक्षा त्याच दिवशी काढून घेण्यात आल्या. त्या पालिका मुख्यालयात गेल्या २२ दिवसांपासून धूळ खात उभ्या आहेत. त्या खराब होऊ नये, यासाठी त्या झाकण्यात आल्या आहेत. यामुळे महिला व बाल कल्याण समितीच्या उतावीळपणावर घालण्याची नामुष्की सत्ताधाय््राांवर ओढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. रिक्षांची नोंदणीच झाली नसताना त्यांच्या वाटपाची घाई का करण्यात आली, असा प्रश्न लाभार्थी महिलांकडून विचारला जात आहे. मात्र त्यात रिक्षा वाटपाचे धोरणच आडवे आल्याचे समोर आल्याने धूळ खात उभ्या असलेल्या १० रिक्षांसह उर्वरीत ९० रिक्षांच्या वाटपावर अनिश्चिततेचे सावट घोंगावू लागले आहे.

सुरुवातीला या रिक्षा पालिकेच्या खर्चातून वाटण्यासाठी प्रशासनाने तीव्र विरोध दर्शविला होता. त्यामुळे माफक व्याज दरात कर्ज उपलब्ध करुन देण्यासह पालिकेकडून अनुदान देण्यासाठी सत्ताधाय््राांमार्फत प्रयत्न सुरु करण्यात आले. त्याचे धोरणच अद्याप ठरले नसल्याने रिक्षा वाटपात अडसर निर्माण झाला आहे. अशातच खरेदी करण्यात आलेल्या १० रिक्षांची एकुण १७ लाख ५० हजार रुपयांची रक्कम पालिकेकडून अदा करण्यात आली असुन उर्वरीत रिक्षांच्या वाटपासाठी स्थायीने यंदाच्या अंदाजपत्रकात ५० लाखांची तरतूद केली आहे. परंतु, पालिकेच्या खर्चातून  खरेदी केलेल्या १० रिक्षा विनावापर धूळ खात उभ्या असल्याने पालिकेचा निधी वाया गेल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. 

प्रशासनासोबत लवकरात लवकर बैठक घेऊन धोरण ठरविण्यात येणार आहे. तसेच नोंदणी प्रक्रिया देखील त्वरित पार पाडून रिक्षांचे वाटप शक्य तेवढ्या लवकर केले जाणार आहे. - शानू गोहिल सभापती, महिला व बाल कल्याण समिती.

भाजपा सत्ताधाऱ्यांनी गतवर्षीच्या पालिका अंदाजपत्रकात रिक्षा वाटपासाठी कोणतीही तरतूद उपलब्ध नसतानाही केलेला उपद्वाप शहरातील गरजू महिलांची दिशाभूल करणारा ठरला आहे. लाभार्थी महिलांना सत्ताधाऱ्यांनी स्वयंरोजगाराचे दाखविलेले गाजर आणखी ताणून न धरता मंजूर ठरावानुसार रिक्षाचे वाटप लवकर करावे. -जुबेर इनामदार काँग्रेस, गटनेता 

 

टॅग्स :thaneठाणे