शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘गुलाबी’ च्या वाटपावर अनिश्चिततेचे सावट; पालिकेच्या आवारातील रिक्षांना घातले पांघरुन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 17:03 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीमार्फत ८ मार्चच्या जागतिक महिला दिनावेळी शहरातील १० महिलांना गुलाबी रिक्षांचे वाटप करण्यात आले होते. परंतु, वाटपाचे धोरण व नोंदणी अभावी वाटप केलेल्या रिक्षा त्याच दिवशी काढून घेत त्या पालिका मुख्यालयात आणून उभ्या करण्यात आल्या आहेत.

- राजू काळे 

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीमार्फत ८ मार्चच्या जागतिक महिला दिनावेळी शहरातील १० महिलांना गुलाबी रिक्षांचे वाटप करण्यात आले होते. परंतु, वाटपाचे धोरण व नोंदणी अभावी वाटप केलेल्या रिक्षा त्याच दिवशी काढून घेत त्या पालिका मुख्यालयात आणून उभ्या करण्यात आल्या आहेत. यामुळे एकूण १०० रिक्षांच्या वाटपावर अनिश्चिततेचे सावट घोंगावू लागल्याने गेल्या २२ दिवसांपासून उभ्या असलेल्या रिक्षा खराब होऊ नये, यासाठी त्या झाकण्यात आल्या आहेत. यातून भाजपा सत्ताधाऱ्यांनी केलेला उतावीळपणा चव्हाट्यावर येऊ लागल्याने लाभार्थी महिलांमध्ये नाराजी पसरली आहे.

शहरातील दारिद्रय रेषेखालील महिलांना स्वयंरोजगार निर्माण करुन देण्यासाठी महिला व बाल कल्याण समितीने पालिकेच्या अनुदानातून  १०० गुलाबी रिक्षांचे मोफत वाटप करण्याचा निर्णय घेत तसा ठराव २० फेब्रुवारीच्या महासभेत मंजूर करण्यात आला. कालांतराने या रिक्षा मोफत नसून त्या लाभार्थी महिलांच्याच स्वखर्चातून वाटल्या जाणार असल्याचे उघड  झाले. पालिकेच्या समाजविकास विभागाकडून मोफत प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध असल्याने सुरुवातीच्या १० लाभार्थी महिलांकडून प्रशिक्षणाखेरीज लायसन्स, परमिटसह काही आवश्यक किरकोळ खर्चासाठी प्रत्येकी २५ हजार रुपये वसूल करण्यात आले. त्या लाभार्थी महिलांनी देखील रिक्षा मिळविण्यासाठी वाटपाअगोदरच प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षण पूर्ण झालेल्या त्या महिलांना ८ मार्चच्या जागतिक महिला दिनाला रिक्षांचे गाजतवाजत वाटप करण्यात आले. त्यावेळी त्या रिक्षांची नोंदणी प्रादेशिक परिवहन विभागात झाली नसल्याने वाटप केलेल्या रिक्षा त्याच दिवशी काढून घेण्यात आल्या. त्या पालिका मुख्यालयात गेल्या २२ दिवसांपासून धूळ खात उभ्या आहेत. त्या खराब होऊ नये, यासाठी त्या झाकण्यात आल्या आहेत. यामुळे महिला व बाल कल्याण समितीच्या उतावीळपणावर घालण्याची नामुष्की सत्ताधाय््राांवर ओढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. रिक्षांची नोंदणीच झाली नसताना त्यांच्या वाटपाची घाई का करण्यात आली, असा प्रश्न लाभार्थी महिलांकडून विचारला जात आहे. मात्र त्यात रिक्षा वाटपाचे धोरणच आडवे आल्याचे समोर आल्याने धूळ खात उभ्या असलेल्या १० रिक्षांसह उर्वरीत ९० रिक्षांच्या वाटपावर अनिश्चिततेचे सावट घोंगावू लागले आहे.

सुरुवातीला या रिक्षा पालिकेच्या खर्चातून वाटण्यासाठी प्रशासनाने तीव्र विरोध दर्शविला होता. त्यामुळे माफक व्याज दरात कर्ज उपलब्ध करुन देण्यासह पालिकेकडून अनुदान देण्यासाठी सत्ताधाय््राांमार्फत प्रयत्न सुरु करण्यात आले. त्याचे धोरणच अद्याप ठरले नसल्याने रिक्षा वाटपात अडसर निर्माण झाला आहे. अशातच खरेदी करण्यात आलेल्या १० रिक्षांची एकुण १७ लाख ५० हजार रुपयांची रक्कम पालिकेकडून अदा करण्यात आली असुन उर्वरीत रिक्षांच्या वाटपासाठी स्थायीने यंदाच्या अंदाजपत्रकात ५० लाखांची तरतूद केली आहे. परंतु, पालिकेच्या खर्चातून  खरेदी केलेल्या १० रिक्षा विनावापर धूळ खात उभ्या असल्याने पालिकेचा निधी वाया गेल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. 

प्रशासनासोबत लवकरात लवकर बैठक घेऊन धोरण ठरविण्यात येणार आहे. तसेच नोंदणी प्रक्रिया देखील त्वरित पार पाडून रिक्षांचे वाटप शक्य तेवढ्या लवकर केले जाणार आहे. - शानू गोहिल सभापती, महिला व बाल कल्याण समिती.

भाजपा सत्ताधाऱ्यांनी गतवर्षीच्या पालिका अंदाजपत्रकात रिक्षा वाटपासाठी कोणतीही तरतूद उपलब्ध नसतानाही केलेला उपद्वाप शहरातील गरजू महिलांची दिशाभूल करणारा ठरला आहे. लाभार्थी महिलांना सत्ताधाऱ्यांनी स्वयंरोजगाराचे दाखविलेले गाजर आणखी ताणून न धरता मंजूर ठरावानुसार रिक्षाचे वाटप लवकर करावे. -जुबेर इनामदार काँग्रेस, गटनेता 

 

टॅग्स :thaneठाणे