शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक तेढ निर्माण करण्याची मीरा भाईंदर प्रयोगशाळा आहे का? परिवहन मंत्र्यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 10:00 IST

मीरारोडच्या डाचकूल पाडा भागात रिक्षा चालकांनी केलेला हल्ला तेथील स्थानिक मतदाभेदावरून झाल्याचे व त्यात कोणताच हिंदू - मुस्लिम असा धार्मिक वाद नसल्याचे स्वतः पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मीरारोडच्या डाचकूल पाडा भागात रिक्षा चालकांनी केलेला हल्ला तेथील स्थानिक मतदाभेदावरून झाल्याचे व त्यात कोणताच हिंदू - मुस्लिम असा धार्मिक वाद नसल्याचे स्वतः पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तरी देखील बाहेरून नेते येऊन त्याला धार्मिक वळण देत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. धार्मिक तेढ निर्माण करण्याची मीरा भाईंदर ही प्रयोगशाळा आहे का?  असा संतप्त सवाल परिवहन मंत्री व स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. बाहेरून येऊन भडकाऊ वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांना रोखा आणि त्यांच्यावर कारवाई करा असे पोलिसांना सांगितल्याचे ते म्हणाले. 

मीरारोडच्या माशाचा पाडा भागात डाचकुल पाडा येथे मोठ्या संख्येने रिक्षाआडव्या तिडव्या लावून रस्त्यात अडथळा आणला जातो. त्यावरून रिक्षा चालक आणि रहिवाशी यांच्यात वाद सुरू होता. २१ ऑक्टोबरच्या पहाटे तेथील रिक्षा उभ्या केल्यावरून वादावादी झाली आणि तेथील सुमारे २५ रिक्षांच्या काचा फोडण्यात आल्या. त्यातून रिक्षा चालकांच्या टोळीने दांडे, शस्त्र सह येऊन तेथील चौघांना मारहाण केली. 

मारहाणीच्या घटनेनंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला. त्यावेळी रहिवाश्यांनी,  रिक्षावाल्यांनी स्वतःच रिक्षा फोडल्याचा आरोप केला. जखमी सुमित शाह याच्या फिर्यादीवरून काशिगाव पोलिसांनी ५५ ते ६५ रिक्षा चालक आदींवर गुन्हा दाखल करत ९ जणांना अटक केली. दरम्यान भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी येऊन हा लव्ह आणि लँड जिहादमधून झालेला प्रकार असून विशिष्ट गटाला लक्ष्य करत त्यांची अनधिकृत बांधकामे तोडण्याची आणि आरोपींवर कारवाईची मागणी केली. 

एमआयएमचे वारीस पठाण हे शुक्रवारी रात्री मीरारोड पोलीस उपायुक्त कार्यालयात मोठ्या संख्येने रिक्षावाल्यांसह जमले आणि त्यांनी रिक्षा फोडणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल केला नाही. राजकीय दबावा खाली एकतर्फी कारवाई केली गेली असा आरोप केला. तोडफोड करणाऱ्यांवर पण गुन्हा दाखल करा असे पठाण यांनी सांगितले. 

मंत्री सरनाईक यांनी सांगितले कि,  महापालिका निवडणुका असल्याने जाणीवपूर्वक काहीजण वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या येऊन काहीही बोलून जातात. एमआयएमचे वारीस पठाण आले त्यांचा शहराशी काय संबंध. या आधी जे पी संकुल प्रकरणी मंत्री नितेश राणे येऊन काहीपण बोलून गेले. सपाचे अबू आझमी येणार होते त्यावेळी आपण त्यांना कॉल करून येऊ नका सांगितले. या बाबत मुख्यमंत्री यांना सांगणार आहे की बाहेरून येऊन हे लोक शहरातील वातावरण बिघडवत आहेत. मीरा भाईंदरच्या नागरिकांना शांतता हवी आहे. मी आणि नरेंद्र मेहता असे दोन्ही शहरातील महायुतीचे आमदार शहर संभाळतोय. बाहेरच्यांनी येऊन वातावरण बिघडवण्याची गरज नाही. बाहेरून या पुढे कोणी आल्यास त्यांच्या भागात आम्हीपण जाऊ असा इशारा त्यांनी दिला आहे.

डाचकुल पाडा भागात आदिवासी, वन आदींच्या जमिनींवर काही भूमाफियांनी अनधिकृत बांधकामे केली व गरीब लोकांना फसवले. वीज कंपन्यांना हाताशी धरून वीज जोडण्या मिळवून दिल्या. बेकायदा बोअर काढून पाणी विकले जाते. पालिका आणि पोलिसांनी वेळीच कारवाई केली नाही म्हणून हे फोफावले. याला त्या भागातील स्थानिक काही नेते आणि पालिका अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी सतत केली आहे असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Mira Bhayandar: Lab for Religious Discord? Minister Questions Outsiders.

Web Summary : Minister Pratap Sarnaik questions if Mira Bhayandar is a lab for religious discord. He urges police to stop outsiders from inciting unrest after a clash between residents and rickshaw drivers was given a religious spin by visiting politicians. Sarnaik accuses them of disrupting the peace for political gain.
टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकmira roadमीरा रोडHinduहिंदूMuslimमुस्लीम