शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
5
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
6
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
7
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
9
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
10
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
11
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
12
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
13
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
14
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
15
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
16
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
17
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
18
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
19
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
20
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक तेढ निर्माण करण्याची मीरा भाईंदर प्रयोगशाळा आहे का? परिवहन मंत्र्यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 10:00 IST

मीरारोडच्या डाचकूल पाडा भागात रिक्षा चालकांनी केलेला हल्ला तेथील स्थानिक मतदाभेदावरून झाल्याचे व त्यात कोणताच हिंदू - मुस्लिम असा धार्मिक वाद नसल्याचे स्वतः पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मीरारोडच्या डाचकूल पाडा भागात रिक्षा चालकांनी केलेला हल्ला तेथील स्थानिक मतदाभेदावरून झाल्याचे व त्यात कोणताच हिंदू - मुस्लिम असा धार्मिक वाद नसल्याचे स्वतः पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तरी देखील बाहेरून नेते येऊन त्याला धार्मिक वळण देत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. धार्मिक तेढ निर्माण करण्याची मीरा भाईंदर ही प्रयोगशाळा आहे का?  असा संतप्त सवाल परिवहन मंत्री व स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. बाहेरून येऊन भडकाऊ वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांना रोखा आणि त्यांच्यावर कारवाई करा असे पोलिसांना सांगितल्याचे ते म्हणाले. 

मीरारोडच्या माशाचा पाडा भागात डाचकुल पाडा येथे मोठ्या संख्येने रिक्षाआडव्या तिडव्या लावून रस्त्यात अडथळा आणला जातो. त्यावरून रिक्षा चालक आणि रहिवाशी यांच्यात वाद सुरू होता. २१ ऑक्टोबरच्या पहाटे तेथील रिक्षा उभ्या केल्यावरून वादावादी झाली आणि तेथील सुमारे २५ रिक्षांच्या काचा फोडण्यात आल्या. त्यातून रिक्षा चालकांच्या टोळीने दांडे, शस्त्र सह येऊन तेथील चौघांना मारहाण केली. 

मारहाणीच्या घटनेनंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला. त्यावेळी रहिवाश्यांनी,  रिक्षावाल्यांनी स्वतःच रिक्षा फोडल्याचा आरोप केला. जखमी सुमित शाह याच्या फिर्यादीवरून काशिगाव पोलिसांनी ५५ ते ६५ रिक्षा चालक आदींवर गुन्हा दाखल करत ९ जणांना अटक केली. दरम्यान भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी येऊन हा लव्ह आणि लँड जिहादमधून झालेला प्रकार असून विशिष्ट गटाला लक्ष्य करत त्यांची अनधिकृत बांधकामे तोडण्याची आणि आरोपींवर कारवाईची मागणी केली. 

एमआयएमचे वारीस पठाण हे शुक्रवारी रात्री मीरारोड पोलीस उपायुक्त कार्यालयात मोठ्या संख्येने रिक्षावाल्यांसह जमले आणि त्यांनी रिक्षा फोडणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल केला नाही. राजकीय दबावा खाली एकतर्फी कारवाई केली गेली असा आरोप केला. तोडफोड करणाऱ्यांवर पण गुन्हा दाखल करा असे पठाण यांनी सांगितले. 

मंत्री सरनाईक यांनी सांगितले कि,  महापालिका निवडणुका असल्याने जाणीवपूर्वक काहीजण वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या येऊन काहीही बोलून जातात. एमआयएमचे वारीस पठाण आले त्यांचा शहराशी काय संबंध. या आधी जे पी संकुल प्रकरणी मंत्री नितेश राणे येऊन काहीपण बोलून गेले. सपाचे अबू आझमी येणार होते त्यावेळी आपण त्यांना कॉल करून येऊ नका सांगितले. या बाबत मुख्यमंत्री यांना सांगणार आहे की बाहेरून येऊन हे लोक शहरातील वातावरण बिघडवत आहेत. मीरा भाईंदरच्या नागरिकांना शांतता हवी आहे. मी आणि नरेंद्र मेहता असे दोन्ही शहरातील महायुतीचे आमदार शहर संभाळतोय. बाहेरच्यांनी येऊन वातावरण बिघडवण्याची गरज नाही. बाहेरून या पुढे कोणी आल्यास त्यांच्या भागात आम्हीपण जाऊ असा इशारा त्यांनी दिला आहे.

डाचकुल पाडा भागात आदिवासी, वन आदींच्या जमिनींवर काही भूमाफियांनी अनधिकृत बांधकामे केली व गरीब लोकांना फसवले. वीज कंपन्यांना हाताशी धरून वीज जोडण्या मिळवून दिल्या. बेकायदा बोअर काढून पाणी विकले जाते. पालिका आणि पोलिसांनी वेळीच कारवाई केली नाही म्हणून हे फोफावले. याला त्या भागातील स्थानिक काही नेते आणि पालिका अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी सतत केली आहे असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Mira Bhayandar: Lab for Religious Discord? Minister Questions Outsiders.

Web Summary : Minister Pratap Sarnaik questions if Mira Bhayandar is a lab for religious discord. He urges police to stop outsiders from inciting unrest after a clash between residents and rickshaw drivers was given a religious spin by visiting politicians. Sarnaik accuses them of disrupting the peace for political gain.
टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकmira roadमीरा रोडHinduहिंदूMuslimमुस्लीम