शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

आजोबा जिवंत आहेत की गावाला गेलेत? निवडणूक आयोगाची जागोजागी शोध मोहीम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 13:29 IST

निवडणूक आयोगाने मतदारांना १९९९ मध्ये मतदार ओळखपत्रे दिली

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: नौपाडा भागातील इमारतीपाशी अंगणवाडी सेविकेने इमारतीतून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीला गाठून विचारले की, मधुकर तापस याच इमारतीत राहतात का? विश्वासराव जाधव ते येथेत राहतात ना? वयाची ८५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी घरून मतदान करावे, यासाठीच्या प्रयत्नांना लोकसभा निवडणुकीत अत्यल्प यश मिळाल्याने आता इमारती-चाळीतील आजोबा हुडकून काढण्याची मोहीम निवडणूक आयोगाने सुरू केली.

निवडणूक आयोगाने मतदारांना १९९९ मध्ये मतदार ओळखपत्रे दिली. त्यावेळी ज्यांचे वय ६० ते ६५ वर्षे होते, अशा व्यक्तींच्या नावाची यादी अंगणवाडी सेविकांना दिली आहे. त्यांनी वेगवेगळ्या विभागांत जाऊन ते मतदार त्याच पत्त्यावर वास्तव्यास असतील, तर त्यांचे घरून मतदानाचे अर्ज भरून घ्यायचे, असा द्राविडीप्राणायम आयोगाला करावा लागत आहे. ८५ व त्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना मतदान केंद्रावर येण्याचे कष्ट घ्यावे लागू नये, यासाठी अगोदर अर्ज भरावा लागतो.

ठाणे जिल्ह्यातील शहरांतील मंडळी नोकरी, व्यवसायात इतके व्यस्त असतात की, असा अर्ज भरायला घरातील कुणीही तरुण व्यक्ती जात नाही. अशावेळी वयोमानानुसार आजोबांचे मत फुकट जाते. गमतीचा भाग म्हणजे आयोगाने अंगणवाडी सेविकांना दिलेल्या यादीत अनेक नावांपुढे अंदाजे वय ८९, ९०, ९६ असे लिहिले आहे. प्रत्यक्षात काही आजोबांचे पंधरा ते वीस वर्षांपूर्वीच निधन झाले आहे.

जन्म-मृत्यू नोंदीचा तपशील आयोगाला द्यावा

गेल्या काही वर्षांत प्रत्येक व्यक्तीचे आधार व पॅनकार्ड बँक खात्याशी जोडण्याची मोहीम केंद्र सरकारने राबवली. याच धर्तीवर देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडील जन्म-मृत्यू नोंदणीचा डेटा जर निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांशी लिंक केला, तर कुठल्या मतदाराचा मृत्यू झाला याची आयोगाला माहिती मिळेल.

तरुणांचा नाव नोंदविण्याचा उत्साह

  • राजकीय पक्ष व वैयक्तिक पातळीवर सारेच तरुण मतदारांची नावे नोंदविण्याचा उत्साह दाखवतात. मात्र, घरातील व्यक्तीचे निधन झाल्यावर आयोगाला त्याबाबत सूचना देऊन मृत व्यक्तीचे नाव वगळण्याची तसदी कुणीही घेत नाही.
  • राजकीय पक्ष निवडणुकीपूर्वी नवी मतदार नोंदणी करण्याचा हुरूप दाखवतात. मात्र, आपल्या परिसरातील कोणत्या व्यक्तींचे निधन झाले, त्याची माहिती गोळा करून नावे वगळण्याबाबत त्यांच्या कुटुंबाकडून अर्ज भरून घेत नाही.
  • निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्याचे त्याच्या कुटुंबाने अर्ज करून कळवल्याखेरीज स्वत:हून आयोग नाव वगळू शकत नाही, अशी तरतूद आहे. आयोगाला जन्म-मृत्यू नोंदी उपलब्ध झाल्यावर ही तरतूद वगळावी लागेल.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thaneठाणेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग