शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आजोबा जिवंत आहेत की गावाला गेलेत? निवडणूक आयोगाची जागोजागी शोध मोहीम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 13:29 IST

निवडणूक आयोगाने मतदारांना १९९९ मध्ये मतदार ओळखपत्रे दिली

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: नौपाडा भागातील इमारतीपाशी अंगणवाडी सेविकेने इमारतीतून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीला गाठून विचारले की, मधुकर तापस याच इमारतीत राहतात का? विश्वासराव जाधव ते येथेत राहतात ना? वयाची ८५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी घरून मतदान करावे, यासाठीच्या प्रयत्नांना लोकसभा निवडणुकीत अत्यल्प यश मिळाल्याने आता इमारती-चाळीतील आजोबा हुडकून काढण्याची मोहीम निवडणूक आयोगाने सुरू केली.

निवडणूक आयोगाने मतदारांना १९९९ मध्ये मतदार ओळखपत्रे दिली. त्यावेळी ज्यांचे वय ६० ते ६५ वर्षे होते, अशा व्यक्तींच्या नावाची यादी अंगणवाडी सेविकांना दिली आहे. त्यांनी वेगवेगळ्या विभागांत जाऊन ते मतदार त्याच पत्त्यावर वास्तव्यास असतील, तर त्यांचे घरून मतदानाचे अर्ज भरून घ्यायचे, असा द्राविडीप्राणायम आयोगाला करावा लागत आहे. ८५ व त्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना मतदान केंद्रावर येण्याचे कष्ट घ्यावे लागू नये, यासाठी अगोदर अर्ज भरावा लागतो.

ठाणे जिल्ह्यातील शहरांतील मंडळी नोकरी, व्यवसायात इतके व्यस्त असतात की, असा अर्ज भरायला घरातील कुणीही तरुण व्यक्ती जात नाही. अशावेळी वयोमानानुसार आजोबांचे मत फुकट जाते. गमतीचा भाग म्हणजे आयोगाने अंगणवाडी सेविकांना दिलेल्या यादीत अनेक नावांपुढे अंदाजे वय ८९, ९०, ९६ असे लिहिले आहे. प्रत्यक्षात काही आजोबांचे पंधरा ते वीस वर्षांपूर्वीच निधन झाले आहे.

जन्म-मृत्यू नोंदीचा तपशील आयोगाला द्यावा

गेल्या काही वर्षांत प्रत्येक व्यक्तीचे आधार व पॅनकार्ड बँक खात्याशी जोडण्याची मोहीम केंद्र सरकारने राबवली. याच धर्तीवर देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडील जन्म-मृत्यू नोंदणीचा डेटा जर निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांशी लिंक केला, तर कुठल्या मतदाराचा मृत्यू झाला याची आयोगाला माहिती मिळेल.

तरुणांचा नाव नोंदविण्याचा उत्साह

  • राजकीय पक्ष व वैयक्तिक पातळीवर सारेच तरुण मतदारांची नावे नोंदविण्याचा उत्साह दाखवतात. मात्र, घरातील व्यक्तीचे निधन झाल्यावर आयोगाला त्याबाबत सूचना देऊन मृत व्यक्तीचे नाव वगळण्याची तसदी कुणीही घेत नाही.
  • राजकीय पक्ष निवडणुकीपूर्वी नवी मतदार नोंदणी करण्याचा हुरूप दाखवतात. मात्र, आपल्या परिसरातील कोणत्या व्यक्तींचे निधन झाले, त्याची माहिती गोळा करून नावे वगळण्याबाबत त्यांच्या कुटुंबाकडून अर्ज भरून घेत नाही.
  • निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्याचे त्याच्या कुटुंबाने अर्ज करून कळवल्याखेरीज स्वत:हून आयोग नाव वगळू शकत नाही, अशी तरतूद आहे. आयोगाला जन्म-मृत्यू नोंदी उपलब्ध झाल्यावर ही तरतूद वगळावी लागेल.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thaneठाणेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग