शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
2
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
3
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
4
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
5
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
6
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
7
Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
8
बॅंक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
9
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
10
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
11
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
12
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
13
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
14
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
15
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
16
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
17
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
18
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
19
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
20
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

उल्हासनगरमध्ये अनियमित पाणीपुरवठ्यामुळे टंचाईची झळ; ३० टक्के पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 10:35 IST

- सदानंद नाईक उल्हासनगर : उल्हासनगर मनपाकडे स्वतःची पाणीपुरवठा योजना नसल्याने पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागत आहे. एमआयडीसीचा लहरीपणा ...

- सदानंद नाईक

उल्हासनगर : उल्हासनगर मनपाकडे स्वतःची पाणीपुरवठा योजना नसल्याने पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागत आहे. एमआयडीसीचा लहरीपणा व मनपाचे दुर्लक्ष यामुळे शहरातील विविध विभागांना अनियमित पाणीपुरवठा होत आहे. परिणामी पाणीटंचाई भेडसावत आहे.

मनपा हद्दीतून बारामाही वाहणारी उल्हास नदी असतानाही मनपा स्वतःची पाणीपुरवठा योजना उभी करू शकली नाही. पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागत आहे. शहराची लोकसंख्या सहा लाख गृहीत धरल्यास, त्या प्रमाणात फक्त ९० ते ९५ एमएलडी पाण्याची गरज आहे. प्रत्यक्षात दररोज १६० एमएलडी पाणीपुरवठा शहराला मंजूर आहे. दररोज १३० ते १४० एमएलडी पाणीपुरवठा होतो. तरीही शहरात पाणीटंचाई भासत आहे.

शहरातील पाणीटंचाई, गळतीची समस्या सोडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने काही वर्षांपूर्वी ४५० कोटींची पाणीपुरवठा योजना राबविली. योजनेंतर्गत नवीन जलवाहिन्या टाकल्या असून, ११ उंच व एक भूमिगत जलकुंभ उभारले आहे, तसेच नियमित व समान पाणीपुरवठा होण्यासाठी पम्पिंग स्टेशन उभारले आहे. दरम्यान, शहाड गावठाण येथील एमआयडीसीचा पाणीपुरवठा पंप मशीन व साठवण टाक्या ताब्यात घेऊन तेथून शहराला पाणीपुरवठा करण्याच्या मागणीने जोर धरला होता. मात्र, त्यानंतर काहीच झाले नाही.

३० टक्के पाणी वाया

शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा, गळती थांबविण्यासाठी १२ वर्षांपूर्वी मनपाने केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने पाणीपुरवठा वितरण योजना राबविली. मात्र, आज जलवाहिन्यांना गळती लागली असून, ३० टक्के पाणी वाया जात आहे. कोट्यवधींची पाणी वितरण योजना राबविल्यानंतरही, नवीन जलवाहिन्या टाकण्यावर कोट्यवधींचा खर्च पालिका करीत आहे. पाणी बिलापोटी मनपा वर्षाला २५ कोटींचा खर्च करीत आहे.

५५ हजार पाणी मीटर गेले कुठे

शहरात ४५० कोटींची पाणीपुरवठा वितरण योजना राबविली असून, या योजनेत ५५ हजार पाणी मीटर बसविले, असा उल्लेख आहे. प्रत्यक्षात शहरात मीटरविना पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ५५ हजार मीटर गेले कुठे, अशी ओरड सुरू झाली. उच्चभ्रू वस्तीत दिवसाला दोन ते तीन वेळा, तर झोपडपट्टी भागात दिवसाआड पुरवठा होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणेwater shortageपाणीकपात