शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये अनियमित पाणीपुरवठ्यामुळे टंचाईची झळ; ३० टक्के पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 10:35 IST

- सदानंद नाईक उल्हासनगर : उल्हासनगर मनपाकडे स्वतःची पाणीपुरवठा योजना नसल्याने पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागत आहे. एमआयडीसीचा लहरीपणा ...

- सदानंद नाईक

उल्हासनगर : उल्हासनगर मनपाकडे स्वतःची पाणीपुरवठा योजना नसल्याने पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागत आहे. एमआयडीसीचा लहरीपणा व मनपाचे दुर्लक्ष यामुळे शहरातील विविध विभागांना अनियमित पाणीपुरवठा होत आहे. परिणामी पाणीटंचाई भेडसावत आहे.

मनपा हद्दीतून बारामाही वाहणारी उल्हास नदी असतानाही मनपा स्वतःची पाणीपुरवठा योजना उभी करू शकली नाही. पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागत आहे. शहराची लोकसंख्या सहा लाख गृहीत धरल्यास, त्या प्रमाणात फक्त ९० ते ९५ एमएलडी पाण्याची गरज आहे. प्रत्यक्षात दररोज १६० एमएलडी पाणीपुरवठा शहराला मंजूर आहे. दररोज १३० ते १४० एमएलडी पाणीपुरवठा होतो. तरीही शहरात पाणीटंचाई भासत आहे.

शहरातील पाणीटंचाई, गळतीची समस्या सोडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने काही वर्षांपूर्वी ४५० कोटींची पाणीपुरवठा योजना राबविली. योजनेंतर्गत नवीन जलवाहिन्या टाकल्या असून, ११ उंच व एक भूमिगत जलकुंभ उभारले आहे, तसेच नियमित व समान पाणीपुरवठा होण्यासाठी पम्पिंग स्टेशन उभारले आहे. दरम्यान, शहाड गावठाण येथील एमआयडीसीचा पाणीपुरवठा पंप मशीन व साठवण टाक्या ताब्यात घेऊन तेथून शहराला पाणीपुरवठा करण्याच्या मागणीने जोर धरला होता. मात्र, त्यानंतर काहीच झाले नाही.

३० टक्के पाणी वाया

शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा, गळती थांबविण्यासाठी १२ वर्षांपूर्वी मनपाने केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने पाणीपुरवठा वितरण योजना राबविली. मात्र, आज जलवाहिन्यांना गळती लागली असून, ३० टक्के पाणी वाया जात आहे. कोट्यवधींची पाणी वितरण योजना राबविल्यानंतरही, नवीन जलवाहिन्या टाकण्यावर कोट्यवधींचा खर्च पालिका करीत आहे. पाणी बिलापोटी मनपा वर्षाला २५ कोटींचा खर्च करीत आहे.

५५ हजार पाणी मीटर गेले कुठे

शहरात ४५० कोटींची पाणीपुरवठा वितरण योजना राबविली असून, या योजनेत ५५ हजार पाणी मीटर बसविले, असा उल्लेख आहे. प्रत्यक्षात शहरात मीटरविना पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ५५ हजार मीटर गेले कुठे, अशी ओरड सुरू झाली. उच्चभ्रू वस्तीत दिवसाला दोन ते तीन वेळा, तर झोपडपट्टी भागात दिवसाआड पुरवठा होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणेwater shortageपाणीकपात