शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

उल्हासनगरमध्ये अनियमित पाणीपुरवठ्यामुळे टंचाईची झळ; ३० टक्के पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 10:35 IST

- सदानंद नाईक उल्हासनगर : उल्हासनगर मनपाकडे स्वतःची पाणीपुरवठा योजना नसल्याने पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागत आहे. एमआयडीसीचा लहरीपणा ...

- सदानंद नाईक

उल्हासनगर : उल्हासनगर मनपाकडे स्वतःची पाणीपुरवठा योजना नसल्याने पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागत आहे. एमआयडीसीचा लहरीपणा व मनपाचे दुर्लक्ष यामुळे शहरातील विविध विभागांना अनियमित पाणीपुरवठा होत आहे. परिणामी पाणीटंचाई भेडसावत आहे.

मनपा हद्दीतून बारामाही वाहणारी उल्हास नदी असतानाही मनपा स्वतःची पाणीपुरवठा योजना उभी करू शकली नाही. पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागत आहे. शहराची लोकसंख्या सहा लाख गृहीत धरल्यास, त्या प्रमाणात फक्त ९० ते ९५ एमएलडी पाण्याची गरज आहे. प्रत्यक्षात दररोज १६० एमएलडी पाणीपुरवठा शहराला मंजूर आहे. दररोज १३० ते १४० एमएलडी पाणीपुरवठा होतो. तरीही शहरात पाणीटंचाई भासत आहे.

शहरातील पाणीटंचाई, गळतीची समस्या सोडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने काही वर्षांपूर्वी ४५० कोटींची पाणीपुरवठा योजना राबविली. योजनेंतर्गत नवीन जलवाहिन्या टाकल्या असून, ११ उंच व एक भूमिगत जलकुंभ उभारले आहे, तसेच नियमित व समान पाणीपुरवठा होण्यासाठी पम्पिंग स्टेशन उभारले आहे. दरम्यान, शहाड गावठाण येथील एमआयडीसीचा पाणीपुरवठा पंप मशीन व साठवण टाक्या ताब्यात घेऊन तेथून शहराला पाणीपुरवठा करण्याच्या मागणीने जोर धरला होता. मात्र, त्यानंतर काहीच झाले नाही.

३० टक्के पाणी वाया

शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा, गळती थांबविण्यासाठी १२ वर्षांपूर्वी मनपाने केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने पाणीपुरवठा वितरण योजना राबविली. मात्र, आज जलवाहिन्यांना गळती लागली असून, ३० टक्के पाणी वाया जात आहे. कोट्यवधींची पाणी वितरण योजना राबविल्यानंतरही, नवीन जलवाहिन्या टाकण्यावर कोट्यवधींचा खर्च पालिका करीत आहे. पाणी बिलापोटी मनपा वर्षाला २५ कोटींचा खर्च करीत आहे.

५५ हजार पाणी मीटर गेले कुठे

शहरात ४५० कोटींची पाणीपुरवठा वितरण योजना राबविली असून, या योजनेत ५५ हजार पाणी मीटर बसविले, असा उल्लेख आहे. प्रत्यक्षात शहरात मीटरविना पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ५५ हजार मीटर गेले कुठे, अशी ओरड सुरू झाली. उच्चभ्रू वस्तीत दिवसाला दोन ते तीन वेळा, तर झोपडपट्टी भागात दिवसाआड पुरवठा होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणेwater shortageपाणीकपात