शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

अंतरिम आदेशांना पुढील तारखेपर्यंत ठाणे न्यायालयाची स्थगिती

By जितेंद्र कालेकर | Updated: June 10, 2020 23:54 IST

एकीकडे कोरोनामुळे ठाण्यातील जिल्हा न्यायालयातील कामकाजाला पुन्हा एकदा सुरुवात झाली झाली आहे. परंतू, वकील आणि पक्षकारांच्या सुरक्षेच्या कारणास्तव विविध खटल्यांमधील अंतरिम आदेशांना पुढील तारखेपर्यंत ठाणे जिल्हा न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे वकील आणि पक्षकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देठाण्यातील शेकडो पक्षकारांसह वकीलांना दिलासा जिल्हा प्रधान न्यायाधीशांचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे जिल्हयातील विविध प्रकरणांमधील अंतरिम आदेशांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील तारखेपर्यंत स्थगिती देण्याचे आदेश ठाण्याचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. जोशी यांनी दिले आहेत. त्यामुळे जामीन, बँकेची वसूली तसेच विविध बांधकामांच्या संबंधित शेकडो पक्षकार आणि वकीलांना दिलासा मिळाला आहे.ठाणे जिल्हा न्यायालयाचे कामकाज हे ८ जून पासून सकाळी १०.३० ते दुपारी १.३० आणि दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० अशा दोन सत्रांमध्ये सुरु झाले आहे. असे असले तरी कंटेनमेंट झोनमधील वकीलांना न्यायालयात येण्यास परवानगी नाही. कामकाज नेहमीप्रमाणे सुरु असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कामकाज सुुरु ठेवण्याला एकीकडे वकील संघटनांचा विरोध आहे. पूर्वीप्रमाणेच केवळ तातडीची आणि गंभीर स्वरुपाच्या प्रकरणांची सुनावणी एका सत्रामध्ये केली जावी, अशी मागणी वकील संघटनांनी प्रधान न्यायाधीशांकडे केली होती. यासह वकीलांना बसण्यासाठी बार रुम खुला करण्यात यावा, अशा काही प्रमुख मागण्या वकीलांनी केल्या होत्या. मात्र, दोन सत्रांमध्ये हे कामकाज सुरु करण्यात आले असून यापुढे सर्व प्रकारचे स्थगिती आदेश हे पुढील तारखेपर्यंत कायम करण्याचे (वाढविण्याचे) आदेश जिल्हा प्रधान न्यायाधीश जोशी यांनी मंगळवारी दिले. त्यामुळे वादग्रस्त बांधकामे, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून अनधिकृत बांधकामांवरील होणारी कारवाई तसेच वेगवेगळया खटल्यांमधील जामीनांवरील सुनावणी, बँकेमार्फत होणारी वसूली आदी विविध प्रकरणांमधील ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, वाडा, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, मुरबाड आणि नवी मुंबई आदी ठिकाणच्या अनेक पक्षकारांसह वकीलांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सोमवारपासून जरी न्यायालयाचे कामकाज हे नियमित सुरु झाले असले तरी ८ आणि ९ जून रोजी न्यायालयात अवघ्या १०० ते १५० वकीलांची उपस्थिती होती. मात्र, वकीलांच्या अनुपस्थितीअभावी कोणत्याही प्रकरणांमध्ये एकतर्फी आदेश देण्यात आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

‘‘ ठाणे न्यायालयाचे कामकाज हे नियमित दोन सत्रांमध्ये सुरु झाले आहे. ते पूर्वीप्रमाणेच एका सत्रात तीन तासांसाठी तसेच तातडीच्या आणि गंभीर प्रकरणांसाठी सुरु असावे. वकीलांना बसण्यासाठी बाररुम खुला करावा, अशी मागणी होती. मात्र हा बार रुम पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहे.’’प्रशांत कदम, अध्यक्ष, जिल्हा बार असोसिएशन, ठाणे. 

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCourtन्यायालय