शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपनी बळीराजाला लूटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:50 IST

कापणी सुरू झाली तरी पंचनामे नाही; महसूल, कृषी खात्याची साथ; भरपाई मिळणार कशी

- हितेन नाईक

पालघर : शेवटच्या टप्प्यात पावसाने दगा दिल्याने करपून गेलेल्या भातशेतीचे पंचनामे आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीने तातडीने न केल्याने व कृषी आणि महसूल खातेही याबाबत निष्क्रिय असल्याने विमा उतरवूनही या शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार नाही. कारण शेतकºयांनी भाताची कापणी सुरू केली आहे. कापणी केल्यानंतर वाया गेलेल्या पिकाचे पंचनामे होऊ शकणार नाहीत. आणि शेतकºयांना भरपाईही मिळू शकणार नाही. यातून विमा कंपनीचा करोडोंचा फायदा होईल. तर शेतकरी भरपाई मिळण्यास पात्र असूनही ती पासून वंचित राहतील. वास्तविक कृषी आणि महसूल खात्याने पिक करपताच विमा कंपनीला जागे करून या पिकांचे पंचनामे करणे आवश्यक होते. परंतु त्यांचीही मिलीजुली असल्याने ते निष्क्रिय राहीले त्यामुळे विमा उतरवून व त्याचे हप्ते भरूनही बळीराजा भरपाईपासून वंचित राहीला. तर विमा कंपनीचा कोट्यवधीचा फायदा झाला.जिल्ह्यात १ लाख ७ हजार १७६ हेक्टर एवढे क्षेत्र लागवडी खाली येत असून भातपिकाचे सरासरी लागवड क्षेत्र ७६ हजार ३८८ हेक्टर आहे. जून महिन्यात चांगला पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यात ७५ हजार ०२१.४४ हेक्टर क्षेत्रावर भातशेतीची पुनर्लागवड करण्यात आल्याचे कृषी अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. ह्यावर्षी जूनमध्ये ५२४.२ मिमी, जुलैमध्ये १५१९.४ मिमी, आॅगस्टमध्ये ३५२.२ मिमी, सप्टेंबरमध्ये ३९.९ मिमी असा एकूण २३१४.६ मिमी पाऊस झाला. जून महिन्यात लावलेली भातशेती चांगल्या पावसामुळे बहरली असतांना अचानक शेवटच्या दोन महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने पाण्या अभावी संपूर्ण हळवी व गरवी पिके करपून गेली.शेतकºयांनी खरीप हंगामासाठी सहकारी बँके कडून कर्ज घेतले. भात शेती करपल्याने हातात काहीच उत्पन्न पडणार नसल्याने या कर्जाची परतफेड कशी करावी असा प्रश्न शेतकºयांसमोर आ वासून उभा राहिला आहे. जिल्हाधिकाºयांनी विमा कंपनी सोबत बैठक घेण्याचे दिलेले आश्वासन अजूनही पूर्ण करण्यात आले नसल्याचे पालघर तालुका कृषी विकास सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष महेंद्र अधिकारी ह्यांनी लोकमतला सांगितले.जिल्ह्यात केंद्र शासनाच्या नॅशनल सेंटर फोर क्रॉप फॉरकास्टिंग संस्थे कडून गावातील पाण्याची सद्यस्थिती,पाण्याची पातळी,पिकाची परिस्थिती आदीचे उपग्रहाद्वारे सर्वेक्षण करून पालघर, तलासरी, विक्रमगड तालुक्यांना टंचाई सदृश्य गावे घोषित करण्यात आली होती.अशा १० टक्के गावांची पाहणी समितीने करून अहवाल पाठविल्या नंतर ही गावे दुष्काळ सदृश्य जाहीर केली आहेत. अशा जाहीरकेलेल्या गावांपैकी दांडी, नानिवली, सरावली, काटाळे, कोळगाव, दापोली आदी भागात भातशेतीची अत्यल्प प्रमाण असतानाहीत्यांचा समावेश करण्यात आल्याने उपग्रहाद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणाबाबत त्यांनी साशंकता व्यक्त केली आहे. त्यामुळे शासनाने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा,तालुक्यातील सर्व गावामध्ये पीक पाहणी करून पंचनामे करावेत,अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.कापणीनंतर पंचनामे होणार तरी कसे?पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्श्युरन्स लिमिटेड कंपनीने शेतकर्यांचे पिकविमे उतरविले असून ह्या टंचाईग्रस्त सदृश्य परिस्थिती नंतर तात्काळ पीक पाहणी करून पंचनामे करणे आवश्यक होते.मात्र अजूनही या कंपनीने पंचनामे सुरू केलेले नाहीत. काही शेतकºयांनी कापणीलाही सुरुवात केल्याने अशा शेतकºयांना भरपाईपासून वंचित राहण्याची पाळी उद्भवणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा