शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

विमा कंपनी बळीराजाला लूटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:50 IST

कापणी सुरू झाली तरी पंचनामे नाही; महसूल, कृषी खात्याची साथ; भरपाई मिळणार कशी

- हितेन नाईक

पालघर : शेवटच्या टप्प्यात पावसाने दगा दिल्याने करपून गेलेल्या भातशेतीचे पंचनामे आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीने तातडीने न केल्याने व कृषी आणि महसूल खातेही याबाबत निष्क्रिय असल्याने विमा उतरवूनही या शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार नाही. कारण शेतकºयांनी भाताची कापणी सुरू केली आहे. कापणी केल्यानंतर वाया गेलेल्या पिकाचे पंचनामे होऊ शकणार नाहीत. आणि शेतकºयांना भरपाईही मिळू शकणार नाही. यातून विमा कंपनीचा करोडोंचा फायदा होईल. तर शेतकरी भरपाई मिळण्यास पात्र असूनही ती पासून वंचित राहतील. वास्तविक कृषी आणि महसूल खात्याने पिक करपताच विमा कंपनीला जागे करून या पिकांचे पंचनामे करणे आवश्यक होते. परंतु त्यांचीही मिलीजुली असल्याने ते निष्क्रिय राहीले त्यामुळे विमा उतरवून व त्याचे हप्ते भरूनही बळीराजा भरपाईपासून वंचित राहीला. तर विमा कंपनीचा कोट्यवधीचा फायदा झाला.जिल्ह्यात १ लाख ७ हजार १७६ हेक्टर एवढे क्षेत्र लागवडी खाली येत असून भातपिकाचे सरासरी लागवड क्षेत्र ७६ हजार ३८८ हेक्टर आहे. जून महिन्यात चांगला पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यात ७५ हजार ०२१.४४ हेक्टर क्षेत्रावर भातशेतीची पुनर्लागवड करण्यात आल्याचे कृषी अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. ह्यावर्षी जूनमध्ये ५२४.२ मिमी, जुलैमध्ये १५१९.४ मिमी, आॅगस्टमध्ये ३५२.२ मिमी, सप्टेंबरमध्ये ३९.९ मिमी असा एकूण २३१४.६ मिमी पाऊस झाला. जून महिन्यात लावलेली भातशेती चांगल्या पावसामुळे बहरली असतांना अचानक शेवटच्या दोन महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने पाण्या अभावी संपूर्ण हळवी व गरवी पिके करपून गेली.शेतकºयांनी खरीप हंगामासाठी सहकारी बँके कडून कर्ज घेतले. भात शेती करपल्याने हातात काहीच उत्पन्न पडणार नसल्याने या कर्जाची परतफेड कशी करावी असा प्रश्न शेतकºयांसमोर आ वासून उभा राहिला आहे. जिल्हाधिकाºयांनी विमा कंपनी सोबत बैठक घेण्याचे दिलेले आश्वासन अजूनही पूर्ण करण्यात आले नसल्याचे पालघर तालुका कृषी विकास सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष महेंद्र अधिकारी ह्यांनी लोकमतला सांगितले.जिल्ह्यात केंद्र शासनाच्या नॅशनल सेंटर फोर क्रॉप फॉरकास्टिंग संस्थे कडून गावातील पाण्याची सद्यस्थिती,पाण्याची पातळी,पिकाची परिस्थिती आदीचे उपग्रहाद्वारे सर्वेक्षण करून पालघर, तलासरी, विक्रमगड तालुक्यांना टंचाई सदृश्य गावे घोषित करण्यात आली होती.अशा १० टक्के गावांची पाहणी समितीने करून अहवाल पाठविल्या नंतर ही गावे दुष्काळ सदृश्य जाहीर केली आहेत. अशा जाहीरकेलेल्या गावांपैकी दांडी, नानिवली, सरावली, काटाळे, कोळगाव, दापोली आदी भागात भातशेतीची अत्यल्प प्रमाण असतानाहीत्यांचा समावेश करण्यात आल्याने उपग्रहाद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणाबाबत त्यांनी साशंकता व्यक्त केली आहे. त्यामुळे शासनाने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा,तालुक्यातील सर्व गावामध्ये पीक पाहणी करून पंचनामे करावेत,अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.कापणीनंतर पंचनामे होणार तरी कसे?पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्श्युरन्स लिमिटेड कंपनीने शेतकर्यांचे पिकविमे उतरविले असून ह्या टंचाईग्रस्त सदृश्य परिस्थिती नंतर तात्काळ पीक पाहणी करून पंचनामे करणे आवश्यक होते.मात्र अजूनही या कंपनीने पंचनामे सुरू केलेले नाहीत. काही शेतकºयांनी कापणीलाही सुरुवात केल्याने अशा शेतकºयांना भरपाईपासून वंचित राहण्याची पाळी उद्भवणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा