शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

500 रुपयांऐवजी 5000 बील येतंय, महावितरण कार्यालयावर आमदाराची धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 13:42 IST

महावितरणने तातडीने नागरिकांना दिलासा द्यावा. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करा, तोडगा काढा. महावितरणने दादागिरी करू नये , बिल भरा असा तगादा लावणे चुकीचे आहे.

डोंबिवली : वाढीव वीजबिल, सतत वीज खंडित होणे यामुळे नागरिक त्रस्त आहेत, ग्राहकांना त्रास देणे योग्य नाहीत, त्यामुळे आम्हाला आंदोलन करायला भाग पडू नका, एखादी चांगली योजना करणे गरजेचे आहे. ज्याला 500 रुपये बिल येत होते त्यांना आता 5 हजार बिल येत आहे हे योग्य नाही. दिल्ली पटर्न राबवणे गरजेचे आहे. पत्र पाठवली पण उत्तर नाही ही शोकांतिका आहे. आम्हाला इतिवृत्त हवे आहे, एमएआरसी कडे आम्ही जाऊच नाही अशी भूमिका महावीतरणची आहे, हे योग्य नाही, अशी भूमिका आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. 

महावितरणने तातडीने नागरिकांना दिलासा द्यावा. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करा, तोडगा काढा. महावितरणने दादागिरी करू नये , बिल भरा असा तगादा लावणे चुकीचे आहे. खंबालपाडा, कंचनगाव येथे दिवसातून 6 वेळा लाईट जाते. 7 किमी मध्ये इस्यु येत आहे. पण राज्यमंत्री असताना मेरी गो राउंड पद्धतीने आम्ही सर्व व्यवस्था केली, पण त्याची अमलबजावणी होत नाही. महावितरणचे अधिकारी दादागिरी करत असतील तर ते योग्य नाही, वीज खंडित होण्याचा अहवाल आम्हाला हवा. संबंधित अधिकारी तातडीने बदली करावा, वर्क फ्रॉम होम पूर्णपणे कोलमडले आहे, संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी, अशी मागणीही आमदार चव्हाण यांनी केली. 

दरम्यान, खंबालपाडा विभागात 7 ठिकाणी समस्या असल्याचे आढळून आले आहे, त्याबाबत गणेशोत्सव काळाच्या आत काम।पूर्ण करण्यात येणार आहे,  शुक्रवारी दिवसभर शटडाऊन घेण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण महावितरण अधिकाऱ्यांनी दिले

टॅग्स :thaneठाणेelectricityवीजMLAआमदारcorona virusकोरोना वायरस बातम्या