शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
6
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
7
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
8
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
9
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
10
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
11
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
12
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
13
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
14
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
15
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
16
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
17
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
18
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
19
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
20
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ

माझ्याबद्दलची माहिती मंत्र्यानेच फोडली; प्रताप सरनाईकांचा राज्य सरकारवरच हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 08:22 IST

विहंग गार्डनमध्ये एक इंच जरी अनधिकृत बांधकाम असल्याचे सिद्ध  केले तर मी आमदारकीचा राजीनामा देईन, असे स्पष्ट केले.

ठाणे : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दंडमाफीचा प्रस्ताव गेला असता तो चर्चेला येण्याआधीच एका मंत्र्याने ही माहिती बाहेर फोडली, असा आरोप शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन केला. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळाने त्यास न जुमानता प्रस्ताव मंजूर केला. यामुळे हा मंत्री कोण, याबाबत चर्चा सुरू आहे.

विहंग गार्डनमध्ये एक इंच जरी अनधिकृत बांधकाम असल्याचे सिद्ध  केले तर मी आमदारकीचा राजीनामा देईन, असे स्पष्ट केले. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी सूडबुद्धीने या गृहसंकुलातील बांधकाम तांत्रिकदृष्ट्या बेकायदा ठरविले होते; परंतु सरकारने दंड माफ करून आम्हाला न्याय दिला.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगरविकास खाते होते, त्याचवेळेस विहंग गार्डनमध्ये कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम झाले नसल्याचे स्पष्ट केले होते. याबाबत महापालिका स्तरावर निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले होते. याबाबत किरीट सोमय्या यांना दंड किती होता हेदेखील माहिती नाही, अशी टीकाही केली.

आरक्षित भूखंड आणि तो विकसित करून दिल्यास टीडीआर देण्याची योजना अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना सुरू केली होती.  महापालिकेचे तत्कालीन आयुक्त नदंकुमार जंत्रे यांनी विकासकांना बोलावून त्यानुसार आरक्षित भूखंड देताना तो विकसित करून दिल्यास त्याचा टीडीआर दिला जाईल, असे स्पष्ट केले होते. आरक्षित भूखंडावर शाळेचे बांधकाम केले. मात्र, तत्कालीन आयुक्त राजीव यांनी शाळा पालिकेकडे हस्तांतरित न करता ‘विहंग’चे बांधकाम बेकायदा ठरविले. जितके चटई क्षेत्र होते, तितकेच बांधकाम केले आहे.

भ्रष्टाचार बाहेर काढल्याने कारवाईझोपडपट्टी भागात राहणाऱ्या नगरसेवकांचे पद रद्द करण्यासाठी राजीव यांनी नोटिसा काढल्या होत्या. त्याविरोधात भूमिका घेतल्याने व त्यांनी केलेला भ्रष्टाचार बाहेर काढला होता. त्यामुळेच माझ्यावर सूडबुद्धीने त्यांनी ही कारवाई केली होती, असेही ते म्हणाले.

‘मी कुठेही जाणार नाही’

मागील दोन वर्षांपासून सरनाईक पक्ष सोडणार असल्याच्या वावड्या उठविल्या जात आहेत. परंतु,मी कुठेही जाणार नसल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. तसेच भाजपबरोबर मिळतेजुळते घेण्याबाबत जे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले होते. त्यालादेखील आता वर्षाचा काळ लोटला असल्याने त्यावर बोलणे उचित ठरणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

विहंग गार्डन ही इमारत उभारताना महापालिकेने संपूर्ण सीसी दिली होती. त्यानुसारच हे बांधकाम केले आहे. त्यानुसारच स्टॅम्प ड्यूटी रजिस्ट्रेशन होत असते, हे कदाचित किरीट सोमय्या यांना माहीत नसेल, किमान त्याचा अभ्यास त्यांनी करायला हवा.  ३० दिवसांत माफी मागितली नाही तर त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशाराही सरनाईक यांनी दिला. तसेच येत्या काळात ठाण्यातील भाजप नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकShiv Senaशिवसेनाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी