शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

Maharashtra Election 2019 :भारत हिंदू राष्ट्र बनू देणार नाही - ओवेसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 5:55 AM

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील गोविंदवाडी मैदानात ओवेसी यांच्या जाहीर प्रचारसभेचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते.

कल्याण : भारतात अनेक जातीधर्मांचे लोक राहतात. एका जातीधर्माचा हा देश नाही. भारत कधीही हिंदू राष्ट्र नव्हता आणि कधीही बनणार नाही. यासाठीचे प्रयत्न हाणून पाडून भारताला हिंदू राष्ट्र बनू देणार नाही, असे आव्हान एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदूद्दीन ओवेसी यांनी रा.स्व. संघ व सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोमवारी जाहीर सभेत दिले.

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील गोविंदवाडी मैदानात ओवेसी यांच्या जाहीर प्रचारसभेचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. संघाच्या सरसंचालकांनी भारतात मुस्लिम खूश आहेत; कारण भारत हिंदू राष्ट्र आहे, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा ओवेसी यांनी समाचार घेतला. भारतात मुस्लिमबांधव खूश आहेत, ही संघाची मेहरबानी नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय घटनेत आम्हाला जगण्याचे मूलभूत अधिकार दिले आहे. त्यामुळे आम्ही संविधानाच्या जोरावर जिवंत आहोत. या देशात गंगा, यमुना व सिंधू नदीची संस्कृती आहे. भारत धर्मनिरपेक्ष असून, तीच त्याची खरी ओळख आहे. काही लोक त्याला एक धर्म व एका रंगाचा देश करू इच्छित आहेत. त्यांचा हा प्रयत्न कदापि यशस्वी होणार नाही. औरंगाबादच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांनी हिरव्या रंगावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना, भारताच्या राष्ट्रध्वजात हिरवा रंग आहे, याकडे ओवेसी यांनी लक्ष वेधले.

मोदी यांनी मुस्लिम महिलांसाठी तीन तलाक प्रतिबंधक कायदा केला आहे. या कायद्यामुळे मुस्लिम महिलांच्या समस्या वाढल्या आहेत. महाराष्ट्रात मराठी समाजाला आरक्षण दिले. मात्र, मुस्लिमांना आर्थिक मागासतत्त्वावर आरक्षण देण्याचा मुद्दा का घेतला नाही, असा सवाल करत मुस्लिमांनाही याआधारे आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली.

चंद्रापेक्षा पृथ्वीवरील खड्ड्यांची चिंता हवी!भारताच्या चांद्रमोहिमेत चंद्रावर उपग्रह उतरला नाही, याची चिंता मोदींना आहे. मात्र, ठाणे आणि कल्याणच्या रस्त्यावर किती खड्डे पडले आहेत, त्यामुळे सहा जणांचा मृत्यू झाला, याची चिंता त्यांना नाही. चंद्रावरील खड्ड्यांपेक्षा पृथ्वीवरील खड्ड्यांची चिंता त्यांना असली पाहिजे. चंद्रावर उपग्रह पाठवण्याचे तंत्रज्ञान भारताने विकसित केले, ही चांगली गोष्ट असली तरी, रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे तंत्रज्ञान तुमच्याकडे नाही का, असा सवाल ओवेसी यांनी केला.