शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
5
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
6
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
8
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
9
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
10
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
11
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
12
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
13
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
14
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
15
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
16
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
17
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
18
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
19
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
20
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ

भारत आर्थिक मंदीच्या गर्तेत नाही - भातखळकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 23:52 IST

राज्यात युतीला २२० हून अधिक जागांवर विजय संपादित करण्यात यश मिळेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठाणे : जागतिक स्तरावर आर्थिक मंदी आल्याने त्याचा परिणाम भारतावरही झाला आहे. परंतु, भारत मंदीच्या गर्तेत सापडलेला नसल्याचा दावा भाजपचे प्रदेश महासचिव अतुल भातखळकर यांनी केला. तसेच केंद्रातील भाजप सरकारने देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे काही निर्णय घेतले आहेत, त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात युतीला २२० हून अधिक जागांवर विजय संपादित करण्यात यश मिळेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.भाजपच्या ठाणे-कोकण विभागाच्या मीडिया सेंटरचा शुभारंभ भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, गटनेते नारायण पवार, मिलिंद पाटणकर आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ठाणे आणि कोकण भागात सर्वच्या सर्व ३९ जागा जिंकू, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. सध्या मागील १०० दिवसांत भाजप आणि मित्रपक्षाने मिळून ज्या वेगाने मोदी सरकारने जनतेच्या हिताची कामे केली आहेत, त्याचा फायदा नक्कीच या निवडणुकीत मिळेल. तसेच जागतिक स्तरावर मंदी असल्याने त्याचा फटकाही भारताला बसला आहे. मात्र, आर्थिक मंदीच्या गर्तेत भारत अडकलेला नाही. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळातही विकासाचा स्तर हा चार ते साडेचार टक्के होता. आता मोदी सरकारच्या काळात स्तर चांगल्या म्हणजेच पाच टक्कयांवर असल्याचे त्यांनी सांगितले.कळवा-मुंब्रा किंवा भिवंडीतील मतदारसंघ असोत, या सर्वच ठिकाणी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या जागा वाढतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसेना आणि भाजपची युती होईल का, असा सवाल त्यांना विचारला असता, युती १०० टक्के होणार असून त्याची घोषणा लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे करतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.शरद पवारांना नैराश्यपुलवामा हल्ल्यासंदर्भात राष्टÑवादीचे प्रमुख शरद पवार यांनी पुन्हा वक्तव्य केले असल्याने त्याचा काय परिणाम होईल, असा सवाल त्यांना केला असता, पवार यांना नैराश्य आले असल्याने त्यांच्याकडून अशी वक्तव्ये केली जात असल्याचे भातखळकर यांनी सांगितले. येत्या काळात राष्टÑवादीचा पूर्णपणे सफाया झालेला असेल आणि तेच पक्षात शिल्लक राहिलेले असतील, असाही टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :BJPभाजपा