शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

भारत आर्थिक मंदीच्या गर्तेत नाही - भातखळकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 23:52 IST

राज्यात युतीला २२० हून अधिक जागांवर विजय संपादित करण्यात यश मिळेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठाणे : जागतिक स्तरावर आर्थिक मंदी आल्याने त्याचा परिणाम भारतावरही झाला आहे. परंतु, भारत मंदीच्या गर्तेत सापडलेला नसल्याचा दावा भाजपचे प्रदेश महासचिव अतुल भातखळकर यांनी केला. तसेच केंद्रातील भाजप सरकारने देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे काही निर्णय घेतले आहेत, त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात युतीला २२० हून अधिक जागांवर विजय संपादित करण्यात यश मिळेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.भाजपच्या ठाणे-कोकण विभागाच्या मीडिया सेंटरचा शुभारंभ भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, गटनेते नारायण पवार, मिलिंद पाटणकर आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ठाणे आणि कोकण भागात सर्वच्या सर्व ३९ जागा जिंकू, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. सध्या मागील १०० दिवसांत भाजप आणि मित्रपक्षाने मिळून ज्या वेगाने मोदी सरकारने जनतेच्या हिताची कामे केली आहेत, त्याचा फायदा नक्कीच या निवडणुकीत मिळेल. तसेच जागतिक स्तरावर मंदी असल्याने त्याचा फटकाही भारताला बसला आहे. मात्र, आर्थिक मंदीच्या गर्तेत भारत अडकलेला नाही. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळातही विकासाचा स्तर हा चार ते साडेचार टक्के होता. आता मोदी सरकारच्या काळात स्तर चांगल्या म्हणजेच पाच टक्कयांवर असल्याचे त्यांनी सांगितले.कळवा-मुंब्रा किंवा भिवंडीतील मतदारसंघ असोत, या सर्वच ठिकाणी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या जागा वाढतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसेना आणि भाजपची युती होईल का, असा सवाल त्यांना विचारला असता, युती १०० टक्के होणार असून त्याची घोषणा लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे करतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.शरद पवारांना नैराश्यपुलवामा हल्ल्यासंदर्भात राष्टÑवादीचे प्रमुख शरद पवार यांनी पुन्हा वक्तव्य केले असल्याने त्याचा काय परिणाम होईल, असा सवाल त्यांना केला असता, पवार यांना नैराश्य आले असल्याने त्यांच्याकडून अशी वक्तव्ये केली जात असल्याचे भातखळकर यांनी सांगितले. येत्या काळात राष्टÑवादीचा पूर्णपणे सफाया झालेला असेल आणि तेच पक्षात शिल्लक राहिलेले असतील, असाही टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :BJPभाजपा