शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नूतन विद्यालयात उपक्रमांमुळे वाढली पटसंख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 23:59 IST

साजरा होतो ‘विद्यार्थी दिन’; विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याची मिळते संधी

- जान्हवी मोर्येकल्याण : शाळेत विविध प्रकारचे साजरे होणारे दिन, वेगवेगळ्या स्पर्धांचे केले जाणारे आयोजन तसेच विविध उपक्रम यामुळे कल्याणच्या छत्रपती शिक्षण मंडळाच्या नूतन विद्यालय या मराठी शाळेची पटसंख्या वाढली आहे.शिक्षक, मातृ आणि पितृ दिनाबरोबरच शाळेत विद्यार्थी दिन साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थी अभ्यासएवजी काव्यवाचन, वक्तृत्व आणि निबंध अशा स्पर्धांमध्ये भाग घेतात. विद्यार्थ्यांचे कोडकौतुक केले जाते. अनेक शालेय उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेची गोडी वाढीस लागल्यामुळे शाळेची पटसंख्या ४५ ने वाढली आहे.१९६० मध्ये स्थापन झालेल्या छत्रपती शिक्षण मंडळाच्या नूतन विद्यालय या शाळेला ५७ वर्षे पूर्ण झाली आहेत. गोडबोले यांच्या छोट्याशा जागेत शाळा सुरू झाली. सुरुवातीला पाचवी आणि आठवी या दोन वर्गांनी प्रारंभ झाला. आज शाळेत पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक विभाग आहेत. कल्याणचे दानशूर व्यक्ती दिवंगत प्रभाकरपंत कर्णिक यांनी शाळेला जागा दिली. याच जागेत शाळेची इमारत उभी आहे. संस्थेत ‘मागेल त्याला शिक्षण’ या तत्त्वानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांतून बहुसंख्य पालक त्यांच्या मुलांच्या शालेय प्रवेशासाठी या शाळेस प्राधान्य देतात.माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक वेणुनाथ कडू म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ७ नोव्हेंबर रोजी प्रथम शाळेत गेलो होतो. त्यामुळे हा दिवस ‘विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा केला जातो. दहावीचा निकाल १०० टक्के लागावा, यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जादा तासिका, दत्तक पालक योजना राबवण्यात येते. आंतरराष्ट्रीय योग दिन, आषाढी एकादशीनिमित्त ग्रंथदिंडी, लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून घोषवाक्य स्पर्धा व टिळक पुण्यतिथीनिमित्त कथाकथन स्पर्धा घेतली जाते. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा होतो. वर्ग सजावट स्पर्धा घेतली जाते. संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधान प्रास्ताविकाचे वाचन केले जाते. तसेच परिसरात ‘संविधानयात्रा’ काढली जाते. केंद्रीय संचार राज्यमंत्री मनोज सिंह आयोजित ‘प्रिय बापू तुम्ही मला प्रेरित करता’ या विषयावर गांधीजींना पत्रलेखन स्पर्धा घेतली जाते. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या निबंध स्पर्धेत आठवीतील मयूर नागरे, इयत्ता नववीतील नेहा पाडवी यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे.वनविभाग परिसर संशोधन केंद्र, शहापूर येथे भेट दिली आहे. विद्यार्थ्यांना राजेश अडांगळे व मंगल टकले या राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली तंबू बांधणे, शिबिर विद्या या अभ्यासवर्गात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. २०१७-१८ मध्ये आठ स्काउटच्या मुलींची राज्य पुरस्कारांसाठी निवड झाली. यामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीmarathiमराठीEducationशिक्षण