शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ; आतापर्यंत न्यूज नेटवर्क ठाणे जिल्ह्यात सरासरीच्या ७३.१३ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 8:22 PM

ठाणे जिल्ह्यात मागील २४ तासात एक हजार ९६.२० मिमी. पाऊस पडला. जिल्हा प्रशासनाने या पावसाची सरासरी १५६.६० मिमी. नोंद घेतली. आतापर्यंत ५११.८२ मिमी . पाउस झाला असून ठाण्यात सरासरीच्या ८३.५५ टक्के, कल्याणमध्ये ७७.१६ टक्के, मुरबाडमध्ये ५९.१८ टक्के, उल्हासनगरमध्ये ७८.१२ टक्के, अंबरनाथमध्ये ७२ टक्के. भिवंडीमध्ये ८५.८४ टक्के आणि शहापूरमध्ये ५६.०२ टक्के पाउस झाला आहे.

ठळक मुद्दे. रात्रभर पडलेल्या पावसामुळे धरणांमध्ये सुमारे ६ ते १२ टक्के पाणी साठा वाढलामोडकसागर १०० टक्के भरल्यामुळे त्यांचे दोन दरवाजे उघडण्यात आलेकल्याण - शिळ महामार्गावरील टाटा पॉवर येथील रस्ता देखील पाण्याखाली कल्याण - अहमदनगर रस्त्यावरील रायता पूलावरून पाणी

ठाणे : जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस मागील काही दिवसांपासून धरण क्षेत्रात ही पडत आहे. यामुळे धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. रात्रभर पडलेल्या पावसामुळे धरणांमध्ये सुमारे ६ ते १२ टक्के पाणी साठा वाढला. मोडकसागर १०० टक्के भरल्यामुळे त्यांचे दोन दरवाजे उघडण्यात आले. तानसाही भरण्याच्या स्थितीत आहे. ९१.५५ टक्के पाणीसाठा तयार झाला. रात्रभरात तो भरण्याची शक्यता आहे. जिल्ह्याभरात आतापर्यंत ७३.१३ टक्के पाऊस पडला. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणाी साठा वाढला असल्याचे आढळून आले आहे.भातसामध्ये रविवारी केवळ ५८ टक्के पाणी साठाहोता. तो ओज ६४ टक्के आहे. रात्रभरात ६ टक्के पाणी साठा सर्वाधिक मोठ्या असलेल्या भातसा धरणात वाढला आहे. या प्रमाणेच तानसामध्ये ९२ टक्के साठा असून रात्रभरात तो १२ टक्केने वाढला. या धरणात आज ९९ मिमी पाऊस पडला आहे. बारवी धरणातही १२ टक्के पाणी साठा वाढून तो ८२.१९ टक्के झाला. बारवीची पाण्याची पातळी सध्या ६६.४४ मीटर आहे. हे धरण भरण्यासाठी केवळ दीड मीटर पातळी बाकी आहे. रात्रभर पाऊस सुरू राहिल्यास बारवी भरण्याची शक्यता आहे. बारवी आत २०२ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी या धरणात ९५ टक्के पाणी साठा होता.उल्हासनदीला पाणी पुरवठा करणार आंध्रा धरणाची सध्या १६०.९० मीटर पातळी आहे. ४७.४४ टक्के पाणी साठा असलेल्या आंध्रामध्ये देखील रात्रभरात ४ टक्के पाणी साठा वाढला आहे. या धरणात आज ८० मिमी पाऊस पडला. तानसा धरण येत्या दोन दिवसांत भरून वाहू लागेल अशी परिस्थिती आहे. भातसामध्ये ७८ टक्के साठा झाल्यावर दरवाजे उघडण्याची प्रक्रि या होईल. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ७३.१३ टक्के पाऊस झाला असून धरणांमध्ये देखील ७३.२६ टक्के पाणीसाठा झाला आहे. सर्व प्रांत अधिकारी, तहसीलदार यांनी संबंधित यंत्रांच्या समन्वयाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सुचना ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी सांगितले.उल्हास नदीला पूर आलेला आहे. यामुळे कल्याण - अहमदनगर रस्त्यावरील रायता पूलावरून पाणी वाहत आहे. कल्याणच्या बाजूकडे पाण्याची पातळी वाढल्यामुळे या पुलावरून पाणी वाहू लागले. कल्याण - शिळ महामार्गावरील टाटा पॉवर येथील रस्ता देखील पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली. या महामार्गावरील वाहतूक गोवेली,टिटवाळा, आंबिवली आणि शहाड मार्गाने वळविली आहे. आणे व भिसोळ पुलावरून पाणी वाहात असल्याने तेथील वाहतूक देखील बंद करावी लागली. संततधार पावसामुळे धरणाचा पाणी साठा वाढत आहे. याच प्रमाणे बदलापूर बंधारा देखील धोक्याची पातळी ओलांडण्याच्या स्थितीत आहे. या बंधाऱ्याची धोका पातळी १७ मीटर असून असून आजची पातळी १६.८० मीटर झाली आहे. याप्रमाणेच मोहने बंधाºयाची धोका पातळी दहा मीटर असून आजची पातळी १०.१० मीटर झाली आहे. या बंधाºयाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. ं* *