शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पात समाजातील सर्व स्तरांचा समावेश-केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

By नितीन पंडित | Updated: February 4, 2024 18:41 IST

भिवंडी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वा खालील केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पात समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे.बदलत्या परिस्थितीचा ...

भिवंडी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वा खालील केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पात समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे.बदलत्या परिस्थितीचा अर्थसंकल्पात विचार केला असून, प्रत्येक नागरिकाचे जीवन संपन्न करण्याबरोबरच विकसित भारतासाठी दृढनिश्चय करण्यात आला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी आज येथे केले.केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतूदीं संदर्भात भिवंडीत रविवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय राज्यमंत्री श्री. पाटील बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत सामान्यांचे जीवनमान बदलले गेले.आयुष्मान भारत योजनेतून प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध झाले आहेत.तर यंदाच्या अर्थसंकल्पात अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांना सुध्दा आयुष्मान भारतचे कवच उपलब्ध झाले आहे.सोलार रुफटॉपच्या माध्यमातून एक कोटी कुटुंबांना ३०० युनिटपर्यंत वीज मोफत उपलब्ध होईल. तर त्यापुढील विजेची विक्री करून त्या कुटुंबांना वार्षिक १८ हजार रुपये मिळणार आहेत, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.या अर्थसंकल्पामुळे २०४७ मध्ये विकसित भारत साकारण्याकडे देशाची आत्मविश्वासपूर्ण वाटचाल सुरू होणार आहे.

तरुण,गरीब,महिला आणि शेतकऱ्यांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर कष्टकरी वर्गाबरोबरच बचत गटातील महिला,छोटे-मोठे उद्योग करणाऱ्या उद्योजकांसाठी तरतूद केली आहे. पायाभूत सुविधा व युवकांसाठी भरीव तरतूदी आहेत,असे कपिल पाटील यांनी सांगितले.

विकसित भारताच्या संकल्पनेला अर्थसंकल्पातून पाठबळ मिळत असून, देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांका वरून तिसऱ्या क्रमांकावर नक्की पोहचेल.पीएम आवास योजनेतून गरीबांसाठी आणखी २ कोटी घरे उपलब्ध होणार आहेत.बचत गटाच्या माध्यमा तून तीन कोटी महिला भगिनी लखपती बनविण्याचे ध्येय ठेवले आहे.या अर्थसंकल्पातून आत्मनिर्भर व विकसित भारताकडे वाटचाल सुरू झाली आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलBudgetअर्थसंकल्प 2024