शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पात समाजातील सर्व स्तरांचा समावेश-केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

By नितीन पंडित | Updated: February 4, 2024 18:41 IST

भिवंडी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वा खालील केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पात समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे.बदलत्या परिस्थितीचा ...

भिवंडी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वा खालील केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पात समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे.बदलत्या परिस्थितीचा अर्थसंकल्पात विचार केला असून, प्रत्येक नागरिकाचे जीवन संपन्न करण्याबरोबरच विकसित भारतासाठी दृढनिश्चय करण्यात आला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी आज येथे केले.केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतूदीं संदर्भात भिवंडीत रविवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय राज्यमंत्री श्री. पाटील बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत सामान्यांचे जीवनमान बदलले गेले.आयुष्मान भारत योजनेतून प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध झाले आहेत.तर यंदाच्या अर्थसंकल्पात अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांना सुध्दा आयुष्मान भारतचे कवच उपलब्ध झाले आहे.सोलार रुफटॉपच्या माध्यमातून एक कोटी कुटुंबांना ३०० युनिटपर्यंत वीज मोफत उपलब्ध होईल. तर त्यापुढील विजेची विक्री करून त्या कुटुंबांना वार्षिक १८ हजार रुपये मिळणार आहेत, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.या अर्थसंकल्पामुळे २०४७ मध्ये विकसित भारत साकारण्याकडे देशाची आत्मविश्वासपूर्ण वाटचाल सुरू होणार आहे.

तरुण,गरीब,महिला आणि शेतकऱ्यांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर कष्टकरी वर्गाबरोबरच बचत गटातील महिला,छोटे-मोठे उद्योग करणाऱ्या उद्योजकांसाठी तरतूद केली आहे. पायाभूत सुविधा व युवकांसाठी भरीव तरतूदी आहेत,असे कपिल पाटील यांनी सांगितले.

विकसित भारताच्या संकल्पनेला अर्थसंकल्पातून पाठबळ मिळत असून, देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांका वरून तिसऱ्या क्रमांकावर नक्की पोहचेल.पीएम आवास योजनेतून गरीबांसाठी आणखी २ कोटी घरे उपलब्ध होणार आहेत.बचत गटाच्या माध्यमा तून तीन कोटी महिला भगिनी लखपती बनविण्याचे ध्येय ठेवले आहे.या अर्थसंकल्पातून आत्मनिर्भर व विकसित भारताकडे वाटचाल सुरू झाली आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलBudgetअर्थसंकल्प 2024