शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

घोडबंदरच्या ६८ प्रकल्पांना ओसी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 2:46 AM

पाणीटंचाईचा संभाव्य धोका लक्षात घेऊन घोडबंदर भागातील नव्या बांधकामांना परवानगी देऊ नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

ठाणे : पाणीटंचाईचा संभाव्य धोका लक्षात घेऊन घोडबंदर भागातील नव्या बांधकामांना परवानगी देऊ नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार, सीसी आणि ओसीदेखील न देण्याचे आदेश आहेत. त्याबाबतची सुनावणी झाली असून यामध्ये घोडबंदर भागात मागील पाच वर्षांत किती बांधकामांना ओसी दिली आणि सध्या या बांधकामांना पाणीपुरवठा सुरळीत होत आहे का, याची माहिती तीन आठवड्यांत सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार, ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभाग आणि पाणीपुरवठा विभाग याबाबत एक संयुक्त मोहीम हाती घेणार असून पाच वर्षांत किती बांधकामांना ओसी दिली, याचा शोध सुरू केला आहे. परंतु, आतापर्यंत नव्याने सुरू असलेल्या ६८ प्रकल्पांना ओसी दिली नसल्याची माहिती पालिकेने दिली आहे.घोडबंदर भागात रहिवाशांना पुरेसे पाणी मिळेल की नाही, याचा विचार न करताच नव्या बांधकामांना परवानगी दिली जाते. त्यामुळेच आता नव्या बांधकामांना परवानगी नकोच, असे सांगून उच्च न्यायालयाने ९ जूनपर्यंत घोडबंदरमधील बांधकामांना कमेन्समेंट सर्टिफिकेट व भोगवटा प्रमाणपत्र न देण्याचे निर्देश ठाणे महापालिकेला दिले होते. दुसरीकडे ओसीदेखील न देण्याचे निर्देश दिल्याने त्याचा फटका येथील बांधकाम व्यावसायिकांना बसणार आहे. या बांधकामांना न्यायालयाचे पुढील निर्देश येईपर्यंत ओसी न देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तसेच या इमारतींना ओसी नाही म्हणून पाणी न देण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. त्यानंतरच्या सुनावणीत २०२५ सालापर्यंत वाढणाºया लोकसंख्येसाठी पाण्याचे नियोजन केले आहे, असेप्रतिज्ञापत्र पालिकेने कोर्टापुढे सादर केले. मात्र, त्यानंतरही अद्याप न्यायालयाने हे बंदी आदेश उठवले नाहीत. त्यामुळे या भागातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती.याची सुनावणी २८ जुलैला झाली असून न्यायालयाने पुढील तीन आठवड्यांपर्यंत स्थगिती देताना पालिकेने या भागात मागील पाच वर्षांत किती बांधकामांना ओसी दिली आहे आणि त्या बांधकामांना सुस्थितीत पाणीपुरवठा होतो आहे का, याची माहिती देण्यास सांगितले आहे. त्यानुसार, पालिकेच्या शहर विकास आणि पाणीपुरवठा विभागाने याबाबत आता शोध मोहीम सुरू करण्याचे ठरवले आहे.