शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

उल्हासनगरात घर तेथे नळ, अवैध नळजोडणी होणार कारवाई

By सदानंद नाईक | Updated: October 29, 2022 13:38 IST

शहरातील पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त अजीज शेख घर तेथे नळ योजना राबविणार आहेत.

उल्हासनगर : शहरातील पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त अजीज शेख घर तेथे नळ योजना राबविणार आहेत. तसेच एक पेक्षा जास्त नळ जोडण्या असणाऱ्यावर कारवाई केली जाण्याचे संकेत आयुक्तांनी दिले असून नळ जोडण्याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. 

उल्हासनगर महापालिकेला एमआयडीसीकडून दररोज १४० एमएलडी पाणी पुरवठा होऊनही शहराच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाली. गेल्या महिन्यात शिवसेनेने महापालिकेवर मोर्चा काढून पाणी टंचाईची समस्या दूर करण्याची मागणी केली. सुभाष टेकडी भागातील ३० हजार पेक्षा जास्त लोकसंख्याला पाणी टंचाईचे चटके बसत आहेत. दररोज महापालिका पाणी पुरवठा विभागावर लहान-मोठे मोर्चे येत असल्याची माहिती विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश वानखडे यांनी दिली. सन २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ५ लाख असून नियमानुसार प्रत्येकी १३५ लिटर पाणी लागते. लोकसंख्येनुसार ८० एमएलडी पाणी पुरवठा शहराला पुरेसा आहे. यामध्ये २० एमएलडी पाणी गळतीचा समावेश केल्यास एकूण १०० एमएलडी पाणी पुरवठा शहराला लागतो. मात्र शहराला दररोज १४० एमएलडी पाणी पुरवठा एमआयडीसीकडून होऊनही शहरात पाणी टंचाई कायम आहे. 

शहरातील पाणी टंचाईची समस्या निकाली काढण्यासाठी महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी घर तेथे नळ योजना राबविणार आहेत. मात्र एका पेक्षा जास्त नळजोडण्या असणाऱ्या इमारती व घरावर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले. आयुक्तांच्या या निर्णयाने खळबळ उडाली असून घर तेथे नळ योजना राबविण्यापूर्वी घरघर व इमारती मध्ये जाऊन महापालिका कर्मचारी नळजोडणीचे सर्वेक्षण करणार आहेत. नळ जोडणी सर्वेक्षणापूर्वी नागरिकांनी व इमारातधारकांनी नियमानुसार जास्त नळजोडण्या घेतल्या असल्यास खंडित करण्याचे आवाहन आयुक्त शेख यांनी केले. शहरात अवैध नळ जोडणीमुळेच शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याचे बोलले जाते. निळ्या व जुन्या जलवाहिणीतून बहुतेक नागरिकांनी एक पेक्षा जास्त नळजोडण्या घेतल्याचे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळेच पाणी टंचाई निर्माण झाली.

पाणी गळतीचे प्रमाण ३० टक्के शहरात ४०० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना राबवूनही पाणी गळतीचे प्रमाण ३० टक्के असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी देत आहेत. ज्या भागात जुन्या जलवाहिन्या आहेत. त्या बदलणे आवश्यक असून त्याशिवाय पाणी टंचाई समस्या निकाली लागणार नसल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर