शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
4
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
5
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
6
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
7
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
8
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
9
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
10
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
11
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
12
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
13
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
14
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
15
अन्वयार्थ: अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

उल्हासनगरातील कल्याण-अंबरनाथ रस्ता रुंदीकरणात १६ बांधकामाचा खोडा दुकानदारांची पर्यायी जागेची मागणी 

By सदानंद नाईक | Published: December 12, 2023 4:52 PM

उल्हासनगर महापालिकेने सन-२०१५ मध्ये कल्याण-अंबरनाथ रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण केले आहे.

उल्हासनगर : शहरातील कल्याण ते अंबरनाथ रस्त्याचे १०० फूटी रुंदीकरण होऊन रस्त्याची बांधणी झाली. मात्र पर्यायी जागेच्या मागणीसाठी न्यायालयात घाव घेतलेले १६ दुकाने रस्त्यात खोडा बनल्या असून रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न अध्यापही टांगला गेला आहे. 

उल्हासनगर महापालिकेने सन-२०१५ मध्ये कल्याण-अंबरनाथ रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण केले आहे. यामध्ये ९०० पेक्षा जास्त दुकाने व घरे बाधित झाले. तर काही दुकाने पूर्णतः बाधित झाले. यापैकी १६ दुकानदारांनी पर्यायी जागेची मागणी करीत न्यायालयात धाव घेतल्याने, या दुकानावर महापालिकेने पाडकाम कारवाई केली नाही?. तेंव्हा पासून या बांधकामाचा प्रश्न सुटला नाही. तत्कालीन आयुक्तांनी या दुकानदारा सोबत अनेकदा वाटाघाटी केल्या. मात्र त्या निष्फळ ठरल्या आहेत. या १६ बांधकामा बाबत तोडगा न निघाल्याने, ही बांधकामे रस्त्यातील खोडा बनून राहिली आहेत. रस्त्यातील अपघातास ही बांधकामे कारणीभूत ठरू शकतात. अशी शक्यता व्यक्त होत आहे.

शहरातील कल्याण-अंबरनाथ रस्त्याचे रुंदीकरण होऊन त्यानंतर रस्त्याची बांधणी झाली. तसेच रस्त्याच्यावर ५०० कोटी पेक्षा जास्त निधीतून उड्डाणफुल बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे पडून आहे. मात्र गेल्या ८ वर्षांपासून रस्त्यात खोडा ठरलेल्या १६ बांधकामाबाबत तोडगा निघत नसल्याने, सर्वस्तरातून टीकेची झोळ उठली आहे. महापालिका अधिकारी, स्थानिक नेत्यांनी या १६ दुकानदाराबाबत तोडगा काढवा, नाहीतर शासन दरबारी हा प्रश्न लावून धरावा. अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे. रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या दुकानदारांना कॅम्प नं-३ येथील इंदिरा गांधी भाजी मंडई ठिकाणी इमारत बांधून २०० फुटाचा पर्यायी गाळा बांधून देण्याचे आश्वासन महापालिकेच्या महासभेत विविध पक्षाच्या नगरसेवकांनी दिले होते. ते आश्वासन फक्त आश्वासन राहिले आहे.

दुकानाची प्रश्न न्यायालयात प्रलंबित...अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश शिंपी

सन-२०१५ साली कल्याण-अंबरनाथ रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण झाले असून यामध्ये ८५० पेक्षा जास्त दुकाने व घरे बाधित झाले. त्यापैकी १६ दुकानदारांनी न्यायालयात धाव घेऊन पर्यायी जागेची मागणी केली. मात्र बांधकामे अवैध असल्याने, पर्यायी जागा देता येत नाही. त्यामुळे याबाबत तोडगा निघाला नसून प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरkalyanकल्याण