शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

Mira Bhayander: मीरा भाईंदर महापालिकेच्या पर्यावरण अहवालात सर्व काही छान छान, ध्वनी प्रदूषण मात्र वाढले

By धीरज परब | Updated: October 5, 2023 09:58 IST

Mira Bhayander Municipal Corporation: मीरा भाईंदर महापालिकेने बुधवारी शहराचा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल २०२२ - २०२३ प्रसिद्ध केला आहे . पालिकेच्या अहवालात हवा , पाणी , पर्यावरण आदी सर्वकाही छान छान असल्याचे म्हटले आहे . ध्वनी प्रदूषण मात्र वाढले असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय सुचवले आहेत.

- धीरज परबमीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने बुधवारी शहराचा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल २०२२ - २०२३ प्रसिद्ध केला आहे . पालिकेच्या अहवालात हवा , पाणी , पर्यावरण आदी सर्वकाही छान छान असल्याचे म्हटले आहे . ध्वनी प्रदूषण मात्र वाढले असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय सुचवले आहेत.

अहवालात महापालिकेच्या वृक्षा रोपं पासून विविध उपक्रमांची छायाचित्रे समाविष्ट केली आहेत . पर्यावरण अहवालाची पार्श्वभूमी , शहराची संक्षिप्त ओळख , माझी वसुंधरा अभियान , हवा - पाणी - ध्वनी च्या गुणवत्तेचे निरीक्षण आणि मूल्यांकन , घनकचरा व्यवस्थापन , आपत्ती व्यवस्थापन , स्वच्छ हवा कृती आराखडा अंतर्गत निधी चे विनियोजन , पर्यावरण संवर्धन आणि जागरूकता , पर्यावरणाची ठळक वैशिष्ठ्ये आदी प्रमुख मुद्दे निहाय माहिती अहवालात दिली गेली आहे.

शहराचे तापमान दरवर्षी ६ . ८ डिग्री सेल्सियस ने वाढत असून उन्हाळा अधिक उष्ण व तीव्र होत चालला आहे असे नमूद आहे. व्यावसायिक क्षेत्रातील कचरा ४० हजार ५०६ टन तर घरगुती कचरा २ लाख ८१ हजार ८१६ टन जमा झाला आहे . शहराच्या ६ हजार ४७९ हेक्टर पैकी निवासी क्षेत्रासाठी १५१२ हेक्टर अर्थात २३ . ३४ टक्के इतके क्षेत्र वापरणे प्रस्तावित आहे . तर नाविकास क्षेत्र म्हणून ३७६२ हेक्टर म्हणजेच ५८ टक्के ठेवले जाणार आहे. 

शहरातील १२ प्रमुख चौकातील हवेची गुणवत्ता तपासली असता ती समाधानकारक असल्याचे अहवालात नमूद आहे .  घोडबंदर आणि भाईंदर येथील खाड्यांच्या पाण्याची चाचणी केली असता ती सुद्धा गुणवत्ते नुसार योग्य असल्याचे म्हटले आहे . शहरात ध्वनी प्रदूषण मात्र असल्याचे अहवालात मान्य केले असून त्यासाठी १२ ठिकाणी च्या ध्वनी मापनाचे आकडे दिलेले आहेत . त्यामुळे ध्वनी प्रदूषण रोखण्या साठी काही उपाय सांगितले आहेत.

घनकचरा व्यवस्थापन च्या अनुषंगाने कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे . विविध प्रकल्प उभारले आहेत . एका वर्षात ३० हजार ४२२ झाडांची लागवड केली असून आणखी १ हजार वृक्षारोपण प्रस्तावित आहे . इलेक्ट्रिक बस येणार असून स्मशानभूमीतील प्रदूषण रोखण्यासाठी स्क्रबर खरेदी केले आहे . हवा शुद्ध करण्यासाठी फिरती वाहने आहेत.

८० पानाचा पर्यावरण अहवाल कल्याणच्या मनू सृष्टी ह्या पर्यावरण सल्लागार यांनी तयार केला आहे . विशेष म्हणजे आमच्या सर्व अपेक्षे प्रमाणे त्यांनी हा अहवाल तयार केला आहे असे खुद्द महापालिका प्रशासनानेच नमूद करत ठेकेदार संस्थेचे कौतुक केले आहे . उपायुक्त संजय शिंदे हे अहवालाचे संपादक तर सहायक आयुक्त योगेश गुणीजन हे प्रकाशक आहेत . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक