शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Mira Bhayander: मीरा भाईंदर महापालिकेच्या पर्यावरण अहवालात सर्व काही छान छान, ध्वनी प्रदूषण मात्र वाढले

By धीरज परब | Updated: October 5, 2023 09:58 IST

Mira Bhayander Municipal Corporation: मीरा भाईंदर महापालिकेने बुधवारी शहराचा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल २०२२ - २०२३ प्रसिद्ध केला आहे . पालिकेच्या अहवालात हवा , पाणी , पर्यावरण आदी सर्वकाही छान छान असल्याचे म्हटले आहे . ध्वनी प्रदूषण मात्र वाढले असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय सुचवले आहेत.

- धीरज परबमीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने बुधवारी शहराचा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल २०२२ - २०२३ प्रसिद्ध केला आहे . पालिकेच्या अहवालात हवा , पाणी , पर्यावरण आदी सर्वकाही छान छान असल्याचे म्हटले आहे . ध्वनी प्रदूषण मात्र वाढले असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय सुचवले आहेत.

अहवालात महापालिकेच्या वृक्षा रोपं पासून विविध उपक्रमांची छायाचित्रे समाविष्ट केली आहेत . पर्यावरण अहवालाची पार्श्वभूमी , शहराची संक्षिप्त ओळख , माझी वसुंधरा अभियान , हवा - पाणी - ध्वनी च्या गुणवत्तेचे निरीक्षण आणि मूल्यांकन , घनकचरा व्यवस्थापन , आपत्ती व्यवस्थापन , स्वच्छ हवा कृती आराखडा अंतर्गत निधी चे विनियोजन , पर्यावरण संवर्धन आणि जागरूकता , पर्यावरणाची ठळक वैशिष्ठ्ये आदी प्रमुख मुद्दे निहाय माहिती अहवालात दिली गेली आहे.

शहराचे तापमान दरवर्षी ६ . ८ डिग्री सेल्सियस ने वाढत असून उन्हाळा अधिक उष्ण व तीव्र होत चालला आहे असे नमूद आहे. व्यावसायिक क्षेत्रातील कचरा ४० हजार ५०६ टन तर घरगुती कचरा २ लाख ८१ हजार ८१६ टन जमा झाला आहे . शहराच्या ६ हजार ४७९ हेक्टर पैकी निवासी क्षेत्रासाठी १५१२ हेक्टर अर्थात २३ . ३४ टक्के इतके क्षेत्र वापरणे प्रस्तावित आहे . तर नाविकास क्षेत्र म्हणून ३७६२ हेक्टर म्हणजेच ५८ टक्के ठेवले जाणार आहे. 

शहरातील १२ प्रमुख चौकातील हवेची गुणवत्ता तपासली असता ती समाधानकारक असल्याचे अहवालात नमूद आहे .  घोडबंदर आणि भाईंदर येथील खाड्यांच्या पाण्याची चाचणी केली असता ती सुद्धा गुणवत्ते नुसार योग्य असल्याचे म्हटले आहे . शहरात ध्वनी प्रदूषण मात्र असल्याचे अहवालात मान्य केले असून त्यासाठी १२ ठिकाणी च्या ध्वनी मापनाचे आकडे दिलेले आहेत . त्यामुळे ध्वनी प्रदूषण रोखण्या साठी काही उपाय सांगितले आहेत.

घनकचरा व्यवस्थापन च्या अनुषंगाने कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे . विविध प्रकल्प उभारले आहेत . एका वर्षात ३० हजार ४२२ झाडांची लागवड केली असून आणखी १ हजार वृक्षारोपण प्रस्तावित आहे . इलेक्ट्रिक बस येणार असून स्मशानभूमीतील प्रदूषण रोखण्यासाठी स्क्रबर खरेदी केले आहे . हवा शुद्ध करण्यासाठी फिरती वाहने आहेत.

८० पानाचा पर्यावरण अहवाल कल्याणच्या मनू सृष्टी ह्या पर्यावरण सल्लागार यांनी तयार केला आहे . विशेष म्हणजे आमच्या सर्व अपेक्षे प्रमाणे त्यांनी हा अहवाल तयार केला आहे असे खुद्द महापालिका प्रशासनानेच नमूद करत ठेकेदार संस्थेचे कौतुक केले आहे . उपायुक्त संजय शिंदे हे अहवालाचे संपादक तर सहायक आयुक्त योगेश गुणीजन हे प्रकाशक आहेत . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक