शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ठाणे जिल्ह्यात नफरत छोडो संविधान बचाओ अभियान

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: November 24, 2022 17:18 IST

२८ नोव्हेंबरपासून सुरू होणार जनसंवाद यात्रा

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : देशभरातील जन आंदोलनांच्या वतीने नफरत छोड़ो संविधान बचाओ अभियाना अंतर्गत देशातील सुमारे ५०० जिल्ह्यात प्रत्येकी किमान ७५ कि.मी. पदयात्रा काढून जनसंवाद सुरू आहे. त्याच्याच एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्यात महात्मा फुले स्मृती दिन २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्ये पर्यंत नफरत छोड़ो संविधान बचाओ यात्रा काढण्यात येणार आहे. 

‘नफरत छोडो संविधान बचाओ’ या यात्रेचे ठाणे जिल्हा निमंत्रक जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया म्हणाले, आज देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर खुद्द सरकार कडूनच आघात केला जात आहे. कामगार वर्गाला देशोधडीला लावण्यासाठी कामगार कायदे बाद करून लेबर कोड आणले आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सवलती कमी केल्या जात आहेत. ईडी, सीबीआय आणि न्याय यंत्रणा आदी संस्थांचा गैरवापर करून विरोधी विचारांच्या कार्यकर्त्यांना जेल मध्ये कोंडले जात आहे. महिला व दलितांवरील अन्याय अत्याचार वाढत आहेत. 

बेरोजगारी ,महागाई प्रचंड गतीने वाढत आहे. देशात अप्रत्यक्षपणे हुकूमशाही गाजवली जात आहे, धर्मांध व सामाजिक सदभाव बिघडवण्यासाठी सत्तेचा गैरवापर हा लोकशाही व संविधानावर वर आघात आहे. अश्या परिस्थितीत सामाजिक जनसंघटनांची व जनतेची जबाबदारी वाढली असून समाजात सलोखा आणि एकजुटीने या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी ही यात्रा देशभर आयोजित करण्यात येत असून, ठाणे जिल्ह्यात होत असलेल्या या अभियानात जनतेने सहभागी व्हावे. असे आवाहन करण्यात येत आहे.

या वेळी बोलताना या यात्रेचे नेतृत्व ज्यांच्याकडे आहे ते ठाण्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ म्हणाले, ठाणे जिल्ह्यातील समतावादी पुरोगामी विचारांचा वारसा जपणार्‍या विविध संस्था - संघटना आणि राजकीय पक्षांनी एकत्र येऊन धर्म आणि जातीच्या नावाने नफरत पसरवणार्‍या प्रव्रत्तीना त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे. भारत हा विविध प्रकारच्या भाषा, धर्म, जाती प्रांत आदींनी नटलेला पण "विविधतेत एकता" दर्शवणारा देश आहे. ही एकता आणि संवैधानिक मूल्य जपणरा भारत आम्हाला हवा आहे.त्यासाठी जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधणे गरजेचे आहे, म्हणूनच देशात सर्वत्र कुठल्याही पक्षाचा झेंडा किंवा बॅनर न घेता हातात फक्त तिरंगा झेंडा आणि संविधानाची प्रत घेऊन जन संवाद यात्रा काढण्याचे आयोजन आहे. ठाणे जिल्ह्यातील यात्रेच्या नियोजनाची माहिती देताना त्यांनी सांगितले की ठाणे जिल्हयातील ही यात्रा महात्मा फुले स्मृतीदिन सोमवार २८ नोव्हेंबर रोजी भिवंडी येथील डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून जेष्ठ सामाजिक नेत्या मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत होणार्‍या जाहीर सभेने सुरू होईल. भिवंडी – महापोली – कासणे – शहापूर – मुरबाड – अंबरनाथ – वालधुनी – ठाणे या मार्गाने जाऊन यात्रेचा समारोप ठाणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाण दिनाच्या पूर्व संध्येला सोमवार दि. ५ डिसेंबर रोजी होईल. समारोपाच्या कार्यक्रमाला महात्मा गांधींचे पणतु व सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांना निमंत्रित केले आहे. 

या यात्रेत जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय(NAPM), आर.पी.आय.(सेक्युलर), आर.पी.आय., लेबर फ्रंट, श्रमिक मुक्ती संघटना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्र सेवा दल, समता विचार प्रसारक संस्था, अनुबंध, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, गावठाण कोळीवाडा संवर्धन समिती, स्वराज्य अभियान, श्रमिक जनता संघ, कायद्याने वागा लोक चळवळ अशा ठाणे जिल्ह्यातील अनेक संस्था संघटना सहभागी होत आहेत. या यात्रेत ठाणे जिल्ह्यातील श्यामदादा गायकवाड, राज असरोंडकर, इंदवी तुळपुळे, इफ्तिकार खान, डॉ. गिरीश साळगांवकर, मधुकर उबाळे, अभय भोसले, आत्माराम विशे, रमेश हनुमंते असे अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. पत्रकार परिषदेत ठाण्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे, ठाण्यातील राष्ट्रवादी कोंग्रेसचे नेते विक्रम खामकर, समता विचार प्रसारक संस्थेचे सुनील दिवेकर, मीनल उत्तुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :thaneठाणे