शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

बुद्धिमत्तेपेक्षा प्रयत्नांच्या चिकाटीला महत्व, डॉ. लहानेंनी सांगितला यशाचा कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 17:19 IST

मुद्दे लक्षात राहण्यासाठी कोणत्या रंगाच्या पेनाने ते अधोरेखित करावेत. विद्यार्थी व तरुण वर्गाकडून होणारा मोबाईलचा अतिवापर

मीरारोड – कोणाची बुद्धिमत्ता किती यापेक्षा, कोणाचे प्रयत्न किती हे महत्वाचे असते, असे मत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सह संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी भाईंदरच्या शंकर नारायण महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. प्रयत्नांची चिकाटी, प्रामाणिकपणा, कामावरील निष्ठा, आई - वडिलांचा आदर अशा मुल्यांचे आयुष्यातील महत्व सांगत अभ्यास करताना कोणत्या पद्धतीचा वापर करावा याचे मार्गदर्शनही डॉ. लहाने यांनी केले.  

मुद्दे लक्षात राहण्यासाठी कोणत्या रंगाच्या पेनाने ते अधोरेखित करावेत. विद्यार्थी व तरुण वर्गाकडून होणारा मोबाईलचा अतिवापर आणि जंकफूड सारख्या घटक गोष्टी टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले. आतापर्यंत एक लाख एकसष्ठ हजार ऑपरेशन न थकता, न सुट्टी घेता केली. बरा झाल्यावर पेशंटच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद हाच खरा आयुष्यातला ठेवा असतो. दुसऱ्यांसाठी काहीतरी निरपेक्ष काम करा तेच तुम्हाला जीवनात यशस्वी बनवेल, असा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. आपल्या संघर्षमय आयुष्याचे किस्से ऐकवताना त्यांनी प्रामाणिकपणा आवश्यक असल्याचे सांगितले. रक्तदानासाठी योगदान दिल्याबद्दल मुंबई विद्यापीठाच्या वतीने करण्यात आलेल्या गौरवाबद्दल डॉ. लहाने यांनी महाविद्यालयाचे आणि विद्यार्थ्यांचे कौतूक केले. 

दरम्यान, याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा मिरा भाईंदर मनपा सभागृह नेता रोहिदास पाटील, सचिव महेश म्हात्रे, प्राचार्य डॉ. विष्णु यादव आणि सर्व प्राध्यापक वर्ग या कार्यक्रमासाठी उपस्थित होता. निमेश पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.  

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयdoctorडॉक्टरMedicalवैद्यकीय