शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१९ पासून सोशल मीडियावर डॉक्टरांचं ब्रेनवॉश; व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्युल तपासात मोठा खुलासा
2
Baramati Nagar Parishad: "आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख देऊन फोडले", युगेंद्र पवारांच्या आरोपाने बारामतीत खळबळ
3
बाँड्समध्ये जास्त रिटर्न, पण जोखीम किती? FD मध्ये ₹५ लाखांची सुरक्षा; गुंतवणुकीचा योग्य फॉर्म्युला काय?
4
उत्तर प्रदेशमध्ये संशयित ४०० बँक खाती तपासली; जम्मू आणि काश्मीरमधील डॉक्टरांचे  लागेबांधे
5
लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मंधानाने अचानक इंस्टाग्रामवरून काढून टाकल्या 'या' खास पोस्ट
6
"जिथे जोगतीणींची लग्न लागतात तिथेच शूटिंग झालं...", मुक्ता बर्वेने सांगितला 'जोगवा'चा अनुभव, म्हणाली...
7
"अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारुन मी स्वतःची कबर खोदली"; बॉलिवूड अभिनेत्रीला होतोय पश्चाताप
8
Paytm च्या फाऊंडरचं बिल झालं व्हायरल; ₹४०,००० च्या जेवणावर वाचवले ₹१६,०००, कशी झाली ही कमाल
9
Astro Tips: कर्जाचा पहिला हप्ता मंगळवारीच का फेडावा? जाणून घ्या ज्योतिषीय आणि धार्मिक कारण!
10
पेशावर हादरलं! निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर मोठा आत्मघाती हल्ला; गोळीबारात तीन दहशतवादी ठार
11
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पंकजा मुंडेचे PA अनंत गर्जे यांना अटक, आज कोर्टात हजर करणार !
12
"गोंधळ घालायचा असेल तर येऊ नका...", कार्यक्रमात झालेल्या राड्यानंतर गौतमी पाटीलचं आवाहन
13
IND vs SA : गुवाहाटी कसोटी जिंकण्यासाठी शास्त्रींचा टीम इंडियाला 'अजब-गजब' सल्ला; म्हणाले...
14
अनपेड इंटर्नशिप ते कमी पगाराच्या पहिल्या नोकरीपर्यंत, नवीन लेबर कोडमुळे तरुणांचे बदलणार आयुष्य
15
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex १९५ अंकानी वधारला; Nifty २६,१०० च्या पार, 'या' शेअर्समध्ये तेजी
16
Sangli Accident: नशेत राँग साईडने निघाला, ६ गाड्या उडवल्या, अनेक जखमी; संतप्त लोकांनी स्कोडा कार फोडली
17
"मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, त्यानंतर..."; राज ठाकरेंचा 'मराठी माणसा'ला सावध राहण्याचा इशारा
18
म्युच्युअल फंडावर टॅक्स कसा लागतो? इक्विटी आणि डेट फंडसाठीचे नियम काय, टॅक्स वाचवण्याचे मार्ग जाणून घ्या
19
भारताच्या 'दुर्गा' सीमेचं रक्षण करणार, चीन सीमेवर महिला कमांडो; १० चौक्या उभ्या राहणार
20
"उदयपूरमध्येच आमची लव्हस्टोरी...", रणवीर सिंहने दीपिकासोबतच्या आठवणींना दिला उजाळा
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांतूनच ३१ हजार मूर्तींचे विसर्जन , जिल्ह्यात सर्वत्र विसर्जन घाटांवर सुसज्ज व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 02:49 IST

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत मंगळवारी बाप्पाला वाजतगाजत, मंगलमय वातावरणात निरोप दिला जाणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत ३१ हजारांहून अधिक बाप्पांचे विसर्जन होईल.

ठाणे : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत मंगळवारी बाप्पाला वाजतगाजत, मंगलमय वातावरणात निरोप दिला जाणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत ३१ हजारांहून अधिक बाप्पांचे विसर्जन होईल. दुपारनंतर घराघरांतील, सार्वजनिक मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघतील. त्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पण जिल्ह्यात ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य कायम असल्याने त्यातून वाट वाढत विसर्जन पार पाडावे लागणार आहे.यंदा अनंत चतुर्दशीला मंगळावर आल्याने बाप्पांच्या विसर्जनाचा उत्साह अधिक तरीही त्या वातावरणाला भावपूर्णतेची किनार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत ३१ हजार १५ बाप्पांना निरोप दिला जाणार आहे. यात ७११ सार्वजनिक, तर ३० हजार ३०४ घरगुती गणेशमूर्तींचा समावेश आहे. विसर्जनासाठी शहरांतील विसर्जनघाटही सज्ज आहेत. विसर्जन सुरळीत पार पाडावे, यासाठी पालिका प्रशासन आणि पोलीस सज्ज आहेत. परिमंडळ-१ अंतर्गत सार्वजनिक १०३, घरगुती ५४९०, परिमंडळ-२ अंतर्गत १३६ सार्वजनिक, २५६५ घरगुती, परिमंडळ-३ अंतर्गत १७२ सार्वजनिक, १० हजार ५५६ घरगुती, परिमंडळ-४ अंतर्गत १३८ सार्वजनिक, ६२४५ घरगुती, तर परिमंडळ-५ अंतर्गत १६२ सार्वजनिक व ५४४८ घरगुती बाप्पांचे विसर्जन होईल. ठाण्यात ११ हजार २०३ बाप्पांना निरोप दिला जाईल. नागरिकांना हा सोहळा पाहता यावा, यासाठी विशेष व्यवस्था केली आहे.बुजवण्याचे आदेश देऊनही सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य कायम -मागील काही दिवस पावसाने पुन्हा ठाण्याला चांगलेच झोडपून काढले आहे. त्यामुळे तात्पुरता मुलामा लावलेल्या रस्त्यांवर पुन्हा खड्ड्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ते दोन दिवसांत बुजवण्यात यावेत, असे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. असे असले तरी बाप्पांचे विसर्जन खड्ड्यांतूनच होणार असल्याचे सध्या तरी दिसत आहे. पालिकेच्या आकडेवारीवरून सध्या शहरात ३२० च्या आसपास खड्डे शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, प्रत्यक्षात ही संख्या दुप्पट असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे.उच्च न्यायालयाने सर्वच महापालिकांना शहरात पडणाºया रस्त्यांच्या मुद्यांवरून सुनावले असतानादेखील ठाणे महापालिका हद्दीत आजही विविध भागांत खड्डे आहेत. पावसाने तर पालिकेचा खड्डे बुजवण्याचा दावा फोल ठरवला आहे. मागील काही दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पुन्हा रस्त्यांवर खड्डेच खड्डे असे चित्र झाले आहे.पालिकेने आॅगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यातील खड्ड्यांची संख्या ४५१ असल्याचे सांगितले होते. घोडबंदर, कॅसल मिल, माजिवडा, कापूरबावडी, बाळकुम, ढोकाळी, कळवा, लोकमान्यनगर, वागळेचा काही भाग आदीसह इतर भागांतही खड्डेच खड्डे असे चित्र आहे.दरम्यान, पावसाची संततधार कमी झाल्यानंतर तातडीने खड्डे भरण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्यानंतर गेल्या दोन सुट्यांच्या दिवशीही ते भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, प्रभाग समिती स्तरावरील सर्व अधिकाºयांनी सुटीच्या दिवशीही प्रभागातच राहण्याचे आदेश देऊन गणेशोत्सव विसर्जनाच्या आधी शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरण्याचे आदेश सर्व संबंधित अधिकाºयांना दिले आहेत.परंतु, तरीदेखील शहरात पालिकेच्याच आकडेवारीनुसार ३२० खड्डे भरण्याचे अजून शिल्लक आहेत. ते विसर्जनाच्या दिवशी भरले जातील, असा दावाही पालिकेने केला आहे. असे असले तरी त्यांची संख्या दुप्पट असण्याची शक्यताही पालिकेनेच वर्तवली आहे. त्यामुळे यंदाही बाप्पांचे विसर्जन खड्ड्यांतूनच होणार असे दिसत आहे.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका