शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

साक्षरता काय कामाची? निरक्षरतेचा प्रचार हवा; डॉ. भालचंद्र नेमाडे यांचे उपरोधिक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 07:18 IST

ठाणे : आपल्याकडे रोज खून, बलात्कार, भ्रष्टाचार, शोषण, लूट, दुसऱ्याला फसवणे सुरू आहे. या गोष्टी अन्य कोणत्या राष्ट्रात नाहीत. ...

ठाणे : आपल्याकडे रोज खून, बलात्कार, भ्रष्टाचार, शोषण, लूट, दुसऱ्याला फसवणे सुरू आहे. या गोष्टी अन्य कोणत्या राष्ट्रात नाहीत. आदिवासी भागाला गरजेपुरतेही पाणी मिळत नाही आणि शहरी भागातील ७० टक्के पाणी वापरतात... असली साक्षरता काय कामाची, असा सवाल करीत आपला देश अशा साक्षरतेने बुडत चालला आहे, त्यामुळे निरक्षरतेचा प्रचार व प्रसार केला पाहिजे, असे उपरोधिक विधान ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी बुधवारी केले. 'ग्रंथाली'तर्फे वाचन दिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे सभागृहात नेमाडे यांचे चित्र चित्रकार विजयराज बोधनकर यांनी कॅनव्हासवर चितारले.

निरक्षरता पसरली तर काय होईल? 

यावेळी त्यांच्या भावमुद्रा बोधनकर यांना टिपता याव्या यासाठी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी नेमाडे यांना बोलते केले. 

नेमाडे यांच्या निरक्षरतेबाबतच्या विधानाचा संदर्भ पकडून केतकर म्हणाले की, पुन्हा निरक्षरता पसरली तर काय होईल? त्यावर नेमाडे म्हणाले की, जर-तरची भाषासुद्धा साक्षरतेचेच लक्षण आहे. 

जगभरात ज्या लोकांनी महान साहित्याची निर्मिती केली. ते कुठे साक्षर होते? बहिणाबाई यांचे इतके मोठे उदाहरण आहे.

कविता लिहिण्यासाठी अडाणी व्हावे लागते 

तब्बल ३० वर्षांनंतर 'सट्टक' नावाचा कविता संग्रह नेमाडे यांनी लिहिला. त्याबाबत नेमाडे म्हणाले की, कविता हा वाङ्ग्य प्रकार मला स्वतःला आवडतो. कविता लिहिण्यासाठी मला वेळ मिळाला नाही. कविता लिहिण्यासाठी अडाणी व्हावे लागते. ते 'अडाणी' नव्हेत बरे का, असे नेमाडे म्हणताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.

हिंदू हा शब्द इंग्रजांनी आणला

 जात हा फॅक्टर याआधी फारसा नव्हता. इंग्रजांनी त्याला खतपाणी घातले. हिंदू हा शब्द इंग्रजांनी आणला. सिंधू नदीच्या अलीकडे राहणारे लोक म्हणजे भारतीय. मात्र 'स'चा उच्चार 'ह' केला जात असल्याने उच्चार 'हिंदू' झाला. 

त्याचबरोबर दुष्ट आणि स्वार्थी लोकांनी त्यांच्या स्वार्थोंकरिता राष्ट्र निर्माण केली. ३०० वर्षांत या देशात एकही मोठा माणूस जन्माला आला नाही, अशी टिप्पणी नेमाडे यांनी केली. 

टॅग्स :thaneठाणे