शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बेकायदा रिक्षाचालकांचा भिवंडीत उच्छाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 1:13 AM

दुप्पट भाडेवाढीने प्रवाशांचा खिसा रिकामा : सामान्यांची लूट

- नितीन पंडित लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : अनलाॅकमध्ये रिक्षांना काही बंधने घालून परवानगी देण्यात आली. मात्र, रिक्षाचालकांनी बंधने धुडकावून बेशिस्त वर्तनाचेच दर्शन घडवले आहे. काेराेना काळातील कसर भरून काढण्याचा चंग बांधून या रिक्षाचालकांनी सर्वसामान्य जनतेची लूट चालवली आहे. शहर आणि ग्रामीण भागात माेठ्या प्रमाणावर भाडेवाढ केली आहे. ग्रामीण भागात तर कहरच केला आहे. चार-पाच किमीच्या प्रवासासाठी प्रति माणसी १० वरून २० रुपये भाडेवाढ केली आहे. काही वेळा तर स्पेशल भाड्याच्या नावाखाली ८० ते १०० रुपये उकळले जात आहेत. 

कोरोनामुळे रिक्षात कमी प्रवासी बसविण्यात यावे असे निर्देश आहेत. मात्र भिवंडी शहर व ग्रामीण भागात चार प्रवासी आल्याशिवाय रिक्षा हलतच नाही. भिवंडीत जवळपास सर्वच रिक्षा सीएनजीवर चालतात. मात्र, पेट्रोल-डिझेल दरवाढीची बाब पुढे करून भिवंडीत रिक्षाचालकांकडून स्वयंघोषित भाडेवाढ प्रवाशांवर लादली आहे. भिवंडी ग्रामीण भागातील अंजुरफाटा ते वडघर डुंगे खारबाव हा चार ते पाच किलोमीटरचा प्रवास आहे. यासाठी प्रवाशांना २० रुपये मोजावे लागतात. शहरात अंजुरफाटा ते वंजारपट्टी नाका या सहा ते सात किलोमीटरच्या अंतरासाठी तीस रुपये माणसी मोजावे लागतात. 

काही दिवसांपूर्वी अंजुरफाटा येथून पायी जाताना एका रिक्षाचालकाने बेदरकारपणे धडक दिली. हा रिक्षाचालक मदत करण्याऐवजी मुजोरीने वागला आणि जखमी अवस्थेत मला साेडून पळून गेला.  रुग्णालयात उपचार घेताना पोलीस जबाबासाठी आले. पण त्यांनीही कारवाई केली नाही.- कविता जाधव-उबाळे, पूर्णागाव 

रिक्षा स्टॅंण्डवर २० ते २५ रिक्षा थांबण्याची परवानगी असते. शहरात २० ते २५ स्टॅण्ड आहेत. त्यामुळे हजारांच्या आतच अधिकृत रिक्षा असतील. मात्र शहरात पाच हजारहून अधिक रिक्षा रस्त्यावर धावत आहेत. त्या कोठेही उभ्या केल्या जात असल्याने कोंडीही वाढली आहे. - कल्याणजी घेटे, वाहतूक पोलीस निरीक्षक, नारपोली अंजुरफाटा शाखा