शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भिवंडीतील प्रदूषणाच्या समस्येकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:01 IST

भिवंडीतील डाइंग व सायझिंगमध्ये वापरण्यात येणारी रसायने, मोती कारखान्यात वापरण्यात येणारी रसायने अशा अनेक कारणांमुळे शहरातील प्रदूषण कमालीचे वाढले आहे.

- पंढरीनाथ कुंभार, भिवंडीभिवंडीतील डाइंग व सायझिंगमध्ये वापरण्यात येणारी रसायने, मोती कारखान्यात वापरण्यात येणारी रसायने अशा अनेक कारणांमुळे शहरातील प्रदूषण कमालीचे वाढले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिकेचा प्रदूषण नियंत्रण विभाग यांचे या परिस्थितीकडे साफ दुर्लक्ष सुरु आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास भिवंडीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.भिवंडीतील प्रदूषण वाढत असल्याने त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. प्रदूषणकारी कंपन्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाहीत. शहरात धाग्यावर व कापडावर प्रक्रिया करणारे सायझिंग व डार्इंग आहेत. त्यापैकी सायझिंगमधील बॉयलर गरम करण्याकरीता कोळशाचा वापर करणे गरजेचे असताना अनेक सायझिंगमध्ये लाकडांचा व टाकाऊ पदार्थांचा सर्रास वापर होत आहे. त्यामुळे निघणाऱ्या धुरामुळे हवेतील प्रदूषणात वाढ होत आहे. काही डार्इंगमध्ये विजेवरील बॉयलर चालू असल्याने त्याचे हवेतील प्रदूषण कमी असते. मात्र या बाबतची माहिती घेऊन कारवाई करण्यास मंडळाचे अधिकारी तयार नाहीत. प्रदूषण मंडळाच्या कल्याण कार्यालयाच्या क्षेत्रात भिवंडी तालुक्याचा समावेश असून मंडळाचे अधिकारी भिवंडीत फिरकतही नाहीत. डाइंग व सायझिंगमधून निघणारे दूषित पाणी प्रक्रिया करून न सोडल्याने त्याचा परिणामही नागरिकांना भोगावा लागतो. अनेकवेळा हे प्रदूषित पाणी गटारात सोडले जाते. त्या गटाराच्या शेजारी राहणाऱ्यांना वेगवेगळ्या आजारांची बाधा होते. या बाबत नागरिकांनी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार करूनही गटारात दूषित पाणी सोडण्यास मनाई केली जात नाही. ग्रामपंचायतीच्या हद्दीतील डार्इंग व सायझिंग मालकांचे स्थानिक पुढाऱ्यांचे अर्थपूर्ण संबध असल्याने त्यांच्याकडून दुर्लक्ष होते. हवेतील आणि पाण्यातील प्रदूषणाची पालिकेच्या प्रदूषण विभागाकडून वरचेवर चाचणी केली जात नाही.शहरात प्लास्टिक दाण्यांपासून मणी बनवणाºया कारखान्यांतून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. प्लास्टिक दाण्यापासून मणी बनवताना व बनवलेल्या मण्याला रंग देण्यासाठी करण्यात येणाºया प्रक्रियेदरम्यान विविध रसायनांचा वापर केला जातो. ही रसायने ज्वलनशील असल्याने त्यापासून आग लागण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. तरी देखील शहरात शेकडोच्या संख्येने मोती कारखाने सर्रास सुरू आहेत. या मोती कारखान्यांत काम करणाºया महिला व पुरूषांना रासायनिक प्रक्रियेमुळे विविध आजार होतात. परिसरांतील नागरिकांना दमा व फुफ्फुसाचे आजार होतात. प्लास्टिक मण्यांना रंग लावून झाल्यानंतर त्याची डाय पुन्हा वापरण्यासाठी त्याच्या वरचे रासायनिक थर उघड्या मैदानात नेऊन जाळले जातात. हे काम सुट्टीच्या दिवशी अथवा रात्रीच्या वेळी केले जात असल्याने कोणीही अधिकारी त्या ठिकाणी पोहोचत नाही. काही पोलीस ठाण्यांनी प्रदूषणकारी मोती कारखान्याच्या मालकांना शांतता व मोहल्ला कमिटीवर घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई होत नाही. शहरात कमी रकमेत मजूर मिळत नसल्याने काही मोती कारखान्यांच्या मालकांनी ग्रामीण भागात बस्तान बसवले आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणbhiwandiभिवंडी