शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

रस्त्यावर उतरलात तर काम दिसेल; राष्ट्रवादीच्या आरोपावर शिवसेनेचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 16:58 IST

ठाण्यात महाविकास आघाडीत आणखी एक ठिणगी पडली असून महापौरांनी राष्ट्रवादीच्या आनंद परांजपेंना टोला लगावला आहे.

ठाणे  : एकीकडे कॉंग्रेसने काही दिवसांपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी आपल्याला विचारत घेत नसल्याचा आरोप केला असतांनाच आता राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी प्रशासन पालकमंत्र्यांची फसवणुक करत असून आता पालकमंत्र्यांनी रस्त्यावर उतरावे असे विधान केले आहे. परंतु परांजपे यांच्या या विधानाचा महापौर नरेश म्हस्के यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. पालकमंत्र्यांनी रस्त्यावर उतरून काम करावे म्हणणारे स्वत: करोनाचा उद्भव झाल्याच्या पहिल्या दिवसापासून घरात दडी मारून बसले आहेत. त्यामुळे पालकमंत्री केवळ रस्त्यावर उतरूनच नव्हे, तर प्रसंगी पीपीई किट घालून कोव्हिड रु ग्णालयांमध्ये जाऊन रु ग्णांची चौकशी करत असल्याचे त्यांना माहिती नाही. जे चित्र उभ्या महाराष्ट्राने पाहिले, ते राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर अध्यक्ष म्हणवणाऱ्या  व्यक्तीच्या गावीही नसावे, हे दुर्दैवी असल्याची टिका म्हस्के यांनी बुधवारी येथे केली.

मागील आठवडय़ात कॉंग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनी ठाण्यातील महत्वाच्या प्रश्नासंदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी विचारात घेत नसल्याचा आरोप केला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत विस्तव पडल्याचे दिसून आले. हा विस्तव शांत होत नाही तोच, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांचे हाल होत आहेत. मृतदेह बदलण्याचे प्रकार घडत आहेत. या सर्व प्रकाराला ठाणे  महापालिका प्रशासनच जबाबदार आहे. परंतु पालकमंत्री देखील थेट रस्त्यावर उतरत नसून प्रशासनावर विसंबून असल्याची टिका केली आहे. त्यांनी केलेल्या या टिकेनंतर महाविकास आघाडीत ठाण्यात विझत आलेला विस्तव पुन्हा एकदा पेटला आहे. महापौरांनी परांजपे यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक पहिल्या दिवसापासून रस्त्यावर उतरून काम करत आहेत. शिंदे यांनी वारंवार आढावा बैठका घेऊन प्रशासनाला आवश्यक ते निर्देश देण्याबरोबरच प्रत्यक्ष क्वारंटाइन सेंटर आणि कोवीड रु ग्णालयांना भेटी देऊन तेथील समस्या वेळोवेळी दूर केल्या. ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे पालकमंत्र्यांच्याच नेतृत्वाखाली अवघ्या 12 दिवसांत 1024 बेड्सचे अद्ययावत कोवीड रु ग्णालय देखील उभे राहिले.

लॉकडाउनच्या काळात गरजूंना घरोघरी धान्यवाटप करण्यापासून मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी वाहनांची विनामूल्य व्यवस्था करण्यापर्यंत पालकमंत्नी यांनी प्रत्येक बाबतीत पुढाकार घेऊन, रस्त्यावर उतरूनच काम केले आहे. परंतु, करोनाचा उद्भव झालेल्या दिवसापासून घरात दडी मारून बसलेल्यांना बाहेर काय चाललंय, याची कशी कल्पना असणार, असा टोलाही म्हस्के यांनी लगावला. त्यांच्या पक्षाचे 8क् वर्षांचे प्रमुख प्रसंगी स्वत: रस्त्यावर उतरताना दिसतात, करोनाची बाधा झालेले महाराष्ट्रातले अनेक मंत्री व नेते उपचार घेऊन पुन्हा लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरले; परंतु तरु ण नेतृत्व म्हणवणाऱ्या  ठाण्यातल्या नेत्यांचे नखही ठाणोकरांना गेल्या चार महिन्यांच्या काळात दिसलेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

एकूणच राज्यात महाविकास आघाडीत मागील काही दिवसापासून सुरु असलेली खलबते यावरुन भाजप चांगलेच तोंड सुख घेत आहे. राज्याचे सरकार महाविकास आघाडीतील अंतर्गत वादातूनच पडेल अशा टिकाही भाजपकडून केली जात आहे. असे असतांना याची सारवासारव करण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे वरीष्ठ मंडळी प्रयत्न करीत असतांना आता स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीत बिघाडी होताना दिसत आहे.

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाthaneठाणे