शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

रस्त्यावर उतरलात तर काम दिसेल; राष्ट्रवादीच्या आरोपावर शिवसेनेचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 16:58 IST

ठाण्यात महाविकास आघाडीत आणखी एक ठिणगी पडली असून महापौरांनी राष्ट्रवादीच्या आनंद परांजपेंना टोला लगावला आहे.

ठाणे  : एकीकडे कॉंग्रेसने काही दिवसांपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी आपल्याला विचारत घेत नसल्याचा आरोप केला असतांनाच आता राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी प्रशासन पालकमंत्र्यांची फसवणुक करत असून आता पालकमंत्र्यांनी रस्त्यावर उतरावे असे विधान केले आहे. परंतु परांजपे यांच्या या विधानाचा महापौर नरेश म्हस्के यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. पालकमंत्र्यांनी रस्त्यावर उतरून काम करावे म्हणणारे स्वत: करोनाचा उद्भव झाल्याच्या पहिल्या दिवसापासून घरात दडी मारून बसले आहेत. त्यामुळे पालकमंत्री केवळ रस्त्यावर उतरूनच नव्हे, तर प्रसंगी पीपीई किट घालून कोव्हिड रु ग्णालयांमध्ये जाऊन रु ग्णांची चौकशी करत असल्याचे त्यांना माहिती नाही. जे चित्र उभ्या महाराष्ट्राने पाहिले, ते राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर अध्यक्ष म्हणवणाऱ्या  व्यक्तीच्या गावीही नसावे, हे दुर्दैवी असल्याची टिका म्हस्के यांनी बुधवारी येथे केली.

मागील आठवडय़ात कॉंग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनी ठाण्यातील महत्वाच्या प्रश्नासंदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी विचारात घेत नसल्याचा आरोप केला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत विस्तव पडल्याचे दिसून आले. हा विस्तव शांत होत नाही तोच, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांचे हाल होत आहेत. मृतदेह बदलण्याचे प्रकार घडत आहेत. या सर्व प्रकाराला ठाणे  महापालिका प्रशासनच जबाबदार आहे. परंतु पालकमंत्री देखील थेट रस्त्यावर उतरत नसून प्रशासनावर विसंबून असल्याची टिका केली आहे. त्यांनी केलेल्या या टिकेनंतर महाविकास आघाडीत ठाण्यात विझत आलेला विस्तव पुन्हा एकदा पेटला आहे. महापौरांनी परांजपे यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक पहिल्या दिवसापासून रस्त्यावर उतरून काम करत आहेत. शिंदे यांनी वारंवार आढावा बैठका घेऊन प्रशासनाला आवश्यक ते निर्देश देण्याबरोबरच प्रत्यक्ष क्वारंटाइन सेंटर आणि कोवीड रु ग्णालयांना भेटी देऊन तेथील समस्या वेळोवेळी दूर केल्या. ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे पालकमंत्र्यांच्याच नेतृत्वाखाली अवघ्या 12 दिवसांत 1024 बेड्सचे अद्ययावत कोवीड रु ग्णालय देखील उभे राहिले.

लॉकडाउनच्या काळात गरजूंना घरोघरी धान्यवाटप करण्यापासून मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी वाहनांची विनामूल्य व्यवस्था करण्यापर्यंत पालकमंत्नी यांनी प्रत्येक बाबतीत पुढाकार घेऊन, रस्त्यावर उतरूनच काम केले आहे. परंतु, करोनाचा उद्भव झालेल्या दिवसापासून घरात दडी मारून बसलेल्यांना बाहेर काय चाललंय, याची कशी कल्पना असणार, असा टोलाही म्हस्के यांनी लगावला. त्यांच्या पक्षाचे 8क् वर्षांचे प्रमुख प्रसंगी स्वत: रस्त्यावर उतरताना दिसतात, करोनाची बाधा झालेले महाराष्ट्रातले अनेक मंत्री व नेते उपचार घेऊन पुन्हा लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरले; परंतु तरु ण नेतृत्व म्हणवणाऱ्या  ठाण्यातल्या नेत्यांचे नखही ठाणोकरांना गेल्या चार महिन्यांच्या काळात दिसलेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

एकूणच राज्यात महाविकास आघाडीत मागील काही दिवसापासून सुरु असलेली खलबते यावरुन भाजप चांगलेच तोंड सुख घेत आहे. राज्याचे सरकार महाविकास आघाडीतील अंतर्गत वादातूनच पडेल अशा टिकाही भाजपकडून केली जात आहे. असे असतांना याची सारवासारव करण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे वरीष्ठ मंडळी प्रयत्न करीत असतांना आता स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीत बिघाडी होताना दिसत आहे.

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाthaneठाणे