शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

Maharashtra election 2019 : सत्ता दिली, तर जाब पण विचारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 6:15 AM

राज ठाकरेंचे आवाहन : विकासाच्या मुद्द्यावर सरकारवर घणाघाती टीका

डोंबिवली : स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधींच्या पॅकेजची निव्वळ आकडेमोड करणारे सरकार लोकांना पाणी, आरोग्यासारख्या मूलभूत सुविधाही देऊ शकले नाही. खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली असून, त्यामुळे लोकांचे नाहक बळी जात आहेत. सर्वत्र अत्यंत विदारक परिस्थिती असतानाही ज्याला बहुमताची सत्ता दिली, त्या सरकारला आपण जाब का विचारत नाही, असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी डोंबिवलीतील जाहीर सभेत मंगळवारी केला. मतदारांना जागरूक होण्याचे आवाहन करतानाच, त्यांनी राज्य सरकारवर कठोर शब्दांत टीकाही केली.

डोंबिवलीतील डीएनसी शाळेच्या मैदानात मनसेचे कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजू पाटील आणि डोंबिवलीचे उमेदवार मंदार हळबे यांची प्रचारसभा मंगळवारी सायंकाळी पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी सरकारच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. डोंबिवली हा संघाचा बालेकिल्ला समजला जातो. मग, डोंबिवलीच्या बकाल अवस्थेबाबत भाजपच्या कामगिरीचे संघ का मूल्यमापन करत नाही, असा सवाल ठाकरे यांनी केला. डोंबिवली हे सुशिक्षित लोकांचे बकाल शहर झाले आहे. या शहरातून चार्टर्ड अकाउंटंट होणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. या तरुणांनी शहराच्या परिस्थितीचे आॅडिट करावे. ६५०० कोटींच्या पॅकेजची घोषणा करणाºया सरकारला या शहरातील साधे खड्डेही बुजवता आले नाही. खड्ड्यांमुळे बळी गेलेल्या लोकांची यादी वाचून दाखवताना, लोकांना या भीषण परिस्थितीचा संताप का येत नाही, असा सवाल त्यांनी यावेळी केला. राज्यात सव्वा लाख विहिरी बांधल्याचा दावा सरकारकडून केला जातो. कदाचित, हा आकडा खड्ड्यांचा असावा, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना हाणला.

१४ वर्षे राम वनवासात होते. या काळात सेतू बांधण्यापासून कितीतरी मोठी कामं त्यांनी केली. इथे फक्त सी-लिंक बांधायला १४ वर्षे लागल्याचा चिमटाही त्यांनी सरकारला घेतला. महाराष्ट्राची अवस्था एवढी वाईट झाली आहे की, उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांतून येणारी मंडळीही महाराष्ट्राची तुलना त्यांच्या राज्यांशी करू लागली आहेत. हे चित्र बदलण्यासाठी राज्यात सक्षम विरोधी पक्षाची आवश्यकता असल्याचे सांगून, त्यांनी मनसेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी केले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेdombivali-acडोंबिवली