शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मी कोणत्याही वादात पडणार नाही’ - डॉ. किशोर सानप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 21:25 IST

वेगळ्य़ा विदर्भाचा मुद्दा, असहिष्णूता, लेखकांना घातल्या जाणा-या गोळ्य़ा या वेगवेगळ्य़ा वादात मी पडणार नाही. मला कोणत्याही वादात पडायचे नाही. मला वाद या शब्दापासून अॅलर्जी आहे.

कल्याण -  वेगळ्य़ा विदर्भाचा मुद्दा, असहिष्णूता, लेखकांना घातल्या जाणा-या गोळ्य़ा या वेगवेगळ्य़ा वादात मी पडणार नाही. मला कोणत्याही वादात पडायचे नाही. मला वाद या शब्दापासून अॅलर्जी आहे. वादापेक्षा माझा जास्तीत जास्त भर संवादावर आहे असे वक्तव्य बदोडा येथे होऊ घातलेल्या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. किशोर सानप यांनी आज येथे केले आहे.    मुंबईत अर्ज भरताना त्यांच्यासोबत कल्याण सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष व कवी साहित्यिक राजीव जोशी यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक नारायण लाळे हे देखील उपस्थित होते. अर्ज भरल्यानंतर त्यांनी सगळ्य़ात प्रथम कल्याण सार्वजनिक वाचनालयास भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना उपरोक्त मत व्यक्त केले. डॉ. सानप यांनी सांगितले की, वाद हा माझा विषय नाही. मी प्रतिभा आणि नैतिकता जपणारा सजर्नशील लेखक, कवी, कांदबरीकार आणि समीक्षक असल्याने मला कोणत्याही वादात पडायचे नाही. संत साहित्य ते आधुनिक साहित्यार्पयतचे सगळे विषय हाताळणारे लेखन मी केले आहे. माणसाची दु:खमुक्ती हा माङया लेखनाचा आणि चिंतनाचा विषय राहिला आहे. दु:ख मुक्तीचे साहित्य लेखन करणारे लेखक मला जास्त आवडतात. स्वांत सुखाय लेखन करणारे लेखक हे त्यांच्याच कोषात अडकून पडतात. महाभारतासारखे लेखन चिरकाल टिकते. ते अनादी काळापासून लोकप्रिय आजही लोकप्रिय आहे. याउलट आधुनिक साहित्याला मान सन्मान, पुरस्कार, प्रतिष्ठा जास्त मिळते. आधुनिक साहित्यिकांची कलाबाह्य दृष्टी जेव्हा हावी होते. तेव्हा लेखन राहत नाही. त्या लेखनाची गरजही मला वाटत नाही. हे एक सृजनाचे तत्व आदीम काळापासून चालत आहे. नव्या लेखकांवर लिहण्यासाठी कोणाला वेळ नाही. . कोणी लिहतही नाही. नव्या लेखकांवर लिहिले जात नाही. याविषयी मला काही बोलायचे नाही. मला देखील सगळ्य़ाच लेखकांवर लिहीता आलेले नाही. हे देखील मी मान्य करतो. खूप चांगले लेखक आहेत. त्यांच्यावर मी देखील लिहू शकलो नाही मला देखील मर्यादा आहेत, ही कबूली सानप यांनी  यावेळी दिली.     40 वर्षे लेखन कार्य करीत असताना 52 पुस्तकांचे लेखन व समीक्षा केली आहे. अनेक लेखकांच्या लेखनाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. माङो समकालीन साहित्यिक संमेलनाचे अध्यक्ष झालेले आहेत. 9क् व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी देखील मला विचारले होते. तसेच वसंत डहाके यांनीही चंद्रपूरच्या साहित्य संमेलनानंतर अध्यक्ष पदाच्या उमेदवारीच्या तयारीला लागा असे सांगितले होते. लेखन कार्यकाळात मला उसंतच मिळाली नाही. त्यामुळे आत्ता मला वाटले म्हणून मी संमेलनाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत उतरलो आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाने प्रतिवंतांच्या लेखनाची उलटतपासणी केली पाहिजे. कारण सृष्टीची नव्याने रचना करण्याची शक्यता प्रतिभावंताच्या लेखनातच असते. मी सन्मान पुरस्काराच्या मागे धावलो नाही. माझा लोकशाही प्रक्रियेवर विश्वास आहे. ज्यावेळा मी लोकशाही मानतो. त्यानुसार मला लोकशाही पद्धतीची निवडणूकीही मान्य आहे. मूळाच प्रतिभावंताला मते मागण्याची आवश्यकाच भासू नये. पण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी ते करावे लागते. अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत उतरची तयारी आधीच केलेली असल्याने गेल्या चार महिन्यात महाराष्ट्रभर दौरा झाला आहे. तसेच महाराष्ट्राबाहेर छत्तीसगढ, हैद्राबाद, कर्नाटक, बदोडा येथे जाऊन आलो आहे. मी अनेकांवर लिहिले आहे. त्यामुळे ते लोक मला मते देतील असा मला विश्वास आहे. 

टॅग्स :marathiमराठीMaharashtraमहाराष्ट्र