शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

उल्हासनगरात पती-पत्नीची आत्महत्या; हाताला काम नसल्याने आर्थिक परिस्थितीतून पाऊल उचलल्याची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 11:55 IST

हाताला काम नसल्याने आर्थिक परिस्थितीतून आत्महत्या केल्याचे  बोलले जात असून कालच ते कोकण मधील गावातून आले होते.

-सदानंद नाईक 

उल्हासनगर : कॅम्प नं-१ शहाड फाटक परिसरातील राजीव गांधीनगर मध्ये राहणाऱ्या सचिन सुतार व पत्नी शर्वरी यांनी शनिवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला. रविवारी सकाळी ५ ते ६ वर्षाची त्यांची मुले झोपेतून उठल्यावर त्यांनी घराचे दार उघडून झालेला प्रकार शेजारील नागरिकांना सांगितला. स्थानिक रहिवासी व मनसेचे माजी शहरजिल्हाध्यक्ष संजय घुगे यांनी याबाबतची माहिती उल्हासनगर पोलिसांना दिली. 

उल्हासनगर राजीव गांधीनगर परिसरात राहणारे सचिन सुरेश सुतार फर्निचरचे तर पत्नी शर्वरी घरकाम करीत होती. त्यांना पराग व यशार्थ असे दोन ५ ते ६ वर्षाची दोन मुले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना काम नसल्याने, घरात आर्थिक अडचण जाणवत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली. दरम्यान दिवाळी निमित्त कोकण रत्नागिरी येथील गावी गेलेले सुतार कुटुंब शनिवारी गावावरून परत आले. अशी प्राथमिक माहिती स्थानिक रहिवासी व मनसेचे माजी शहरजिल्हाध्यक्ष संजय घुगे यांनी दिली. शनिवारी मध्यरात्री मुले झोपल्यानंतर दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलीस व्यक्त करीत आहेत. रविवारी सकाळी दोन्ही मुले झोपेतून उठल्यावर आई-वडील लटकलेल्या अवस्थेत त्यांना दिसल्यावर, त्यांनी घराचे दार उघडून शेजाऱ्यांना सदर माहिती दिल्याने, परिसरात खळबळ उडाली. 

मनसेचे माजी शहाराध्यक्ष संजय घुगे यांनी दोन्ही मुलांना घराबाहेर ठेवून उल्हासनगर पोलिसांना झालेल्या प्रकारची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी घाव घेऊन पंचनामा करीत दोन्ही मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात उत्तर तपासणी साठी पाठविली. मयत सचिन सुतार यांचे आई-वडील व भाऊ डोंबिवली येथे राहत असून त्यांना सदर प्रकारा बाबत माहिती देऊन त्यांना बोलावून घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली. पती-पत्नीच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत असून दोन्ही मुले अनाथ झाली. आर्थिक विवेचनातून आत्महत्या केल्याचे बोलले जात असून अधिक तपास उल्हासनगर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरDeathमृत्यू