शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पुराच्या पाण्यामुळे शेकडो वाहने झाली नादुरूस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 1:57 AM

इंजिनमध्ये गेले पाणी; उंदरांनी वायरही कुरतडल्या, गॅरेजचालकांची कामे दुपटीने वाढली

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांत आलेल्या पुराचा फटका शेकडो वाहनांना बसला आहे. दुचाकींच्या इंजिनमध्ये पाणी गेल्याने ती नादुरुस्त झाली असून, त्यामुळे गॅरेजचालकांची कामे दुपटीने वाढली आहेत. दोन-तीन दिवसांपासून दुचाकी मोठ्या प्रमाणात दुरुस्तीसाठी येत असल्याचे गॅरेजचालकांनी सांगितले.गेल्या आठवड्यात कल्याणमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सखल भाग जलमय झाला होता. या पुरामुळे जनजीवन ठप्प झाले होते. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला. सोबतच शहरातील शेकडो वाहने पुराच्या पाण्यामुळे नादुरुस्त झाली. ही वाहने दुरुस्तीसाठी शहरातील विविध गॅरेजमध्ये आणण्यात आली आहेत. त्यामुळे गॅरेजमध्ये काम दुपटीने वाढल्याचे गॅरेजमधील कर्मचाऱ्यांनी सांगितले.शहरातील वल्लीपीर रोड, बिर्ला महाविद्यालय, लालचौकी, खडकपाडा, बेतुरकरपाडा, रामबाग, पौर्णिमा टॉकीज, विठ्ठलवाडी परिसर, वालधुनी, खडेगोळवली, कर्णिक रोड, चक्कीनाका, सूचकनाका, मलंगरोड यासारख्या ठिकाणांसह अन्य गॅरेजमध्ये दोन-तीन दिवसांपासून ६० ते ७० दुचाकी दुरुस्तीसाठी येत आहेत.एरव्ही, दररोज १० ते १२ दुचाकी दुरुस्तीला येत होत्या. मात्र, आता पुरानंतर अशा वाहनांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. आमच्याकडे दररोज ३० पेक्षा जास्त दुचाकी येत आहेत, असे बेतुरकरपाडा येथील गॅरेजचालक दीपकने सांगितले. पुरामुळे नादुरुस्त झालेली ९० टक्के वाहने दुरुस्तीसाठी आमच्या गॅरेजमध्ये आली आहेत. पुरामुळे अनेक वाहने बुडाली होती, तर अनेक वाहने वाहून गेली होती. त्यामुळे इंजिनात पाणी जाणे, सायलेन्सर खराब होणे, इंजिन नादुरुस्त होणे अशा तक्रारी येत आहेत. त्यातच उंदरांनी दुचाकीची वायर कुरतडल्याने वाहनांचे नुकसान झाल्याचे गॅरेजचालक दिनेश याने सांगितले. पावसाळ्यात वाहने नादुरुस्त होत असतात. पण पुरामुळे नादुरुस्त वाहनांचे प्रमाण अधिक आहे. सध्या नादुरुस्त वाहने दुरुस्त करून देण्याच्या कामाला प्राधान्य देत असल्याचे गॅरेजचालक धिरज यांनी सांगितले.पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या दुचाकींचे मालक इन्शुरन्ससाठी येत असून ५0 टक्क्यांपर्यंत त्यांचा क्लेम मंजूर होत असल्याची माहिती एका इन्श्युरन्स एजंटने दिली. पूराच्या पाण्यामुळे माझ्या गाडीचे इंजिन खराब झाले होते. गॅरेजमध्ये दुचाकी दुरस्तीसाठी दिली असता, दुरु स्तीचा खर्च एक हजार रु पये आल्याचे एका दुचाकी चालकाने सांगितले.

टॅग्स :floodपूर